शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

फॅशन, प्रसिद्धीसाठी कुठलेही सेवाकार्य नको - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 12:47 IST

ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण

नागपूर : कुणाचीही सेवा किंवा सेवाकार्य करताना त्यात आपलेपणाची भावना असणे आवश्यक असते. सेवेतूनच जिव्हाळा व आपुलकी वाढते. त्यामुळे सेवा करताना त्यातून काही मिळेल, असा विचारही मनात यायला नको. फॅशन व प्रसिद्धीसाठी कुठलेही सेवाकार्य नको, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. शुक्रवारी ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला समाजसेवक डॉ. विकास आमटे, तेलंगणा येथील उद्योजक कोठा जयपाल रेड्डी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. वा. द. भाके, सचिव डॉ. दीपक कडू प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्य व जानवरांमध्ये मोठा फरक असतो. तरीदेखील पशू एकत्रित असतानादेखील आजारी असलेल्याची काळजी करतात. अनेक लोक सेवाकार्य करताना कार्यक्रमांना प्रसिद्ध लोकांना बोलवितात. त्यापेक्षा त्या कार्याशी संबंधित व त्याला पुढे नेणाऱ्या लोकांना बोलविले पाहिजे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तर सामाजिक कार्यात विशेष पुढाकार घेतला पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले. डॉ. भाके यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. दीपक कडू यांनी आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पोलीस, वकील, डॉक्टर वाढणे हे समाजाच्या अनारोग्याचे लक्षण यावेळी डॉ. विकास आमटे यांनी परखड शब्दांत आपले मत मांडले. समाजात पोलीस, वकील, डॉक्टर यांची संख्या वाढणे हे समाजाच्या अनारोग्याचे निदर्शक आहे. न्यायालयांची, कारागृहांची संख्या वाढणे हे भूषणावह नाहीच. आम्ही आनंदवनात कार्य करतो, मात्र हे आनंदवन बंद करणे हेच आमचे मिशन आहे. तेथील कुष्ठरोग पाहता आनंदवनाचे कार्य वाढणे हे भूषणावह राहूच शकत नाही. देशातील सव्वा कोटी कुष्ठरोग्यांकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे. मात्र देशातील ११९ कायदे कुष्ठरोग्यांच्या विरोधातील आहे. त्यावर काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बाबा आमटेंनी घेतले होते पिस्तूल

यावेळी सरसंघचालक डॉ. भागवत यांनी बाबा आमटेंबाबत एक माहिती दिली. त्यांना संघाचे तत्कालीन प्रचारक यादवराव जोशी यांनी ही माहिती दिली होती. इंग्रजांशी संघर्ष सुरू असताना बाबा आमटे यांनी पिस्तूल घेतले होते. ही बाब तत्कालीन सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना कळली, तेव्हा त्यांनी आमटे यांच्याशी संवाद साधला. आमटे तुमची भावना चांगली आहे, मात्र याच्या परिणामांचादेखील विचार करा, असे ते म्हणाले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकMohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर