शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शेतकऱ्यांचे कापसाचे कोट्यवधीचे चुकारे पचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:19 IST

काटोल तालुक्यातील येनवा येथील मे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे पचविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे इतर दोन भागीदार यांनाही अटक करून, शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ मिळावेत, अशी मागणी पीडित कापूस उत्पादक संयोजन समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देमे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् कंपनीच्या दोन संचालकांना अटकचुकारे लवकरात लवकर मिळावे शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल तालुक्यातील येनवा येथील मे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे पचविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे इतर दोन भागीदार यांनाही अटक करून, शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ मिळावेत, अशी मागणी पीडित कापूस उत्पादक संयोजन समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली.काटोल परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीला कापूस विकला. कंपनीने सर्व शेतकऱ्यांना धनादेश दिले. परंतु शेतकऱ्यांचे धनादेश वटलेच नाही. दुसऱ्यांदा पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले. तेसुद्धा वटले नाही. त्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलावून एकूण रकमेच्या ५० व २५ टक्के रकमेचे चेक दिले. त्याचीही रक्कम बॅँकेतून मिळाली नाही. जवळपास १०१ शेतकऱ्यांचे १ कोटी ९४ लाख रुपयांचे चुकारे अडकून असल्याचा आरोप समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी केला.या संपूर्ण प्रकरणाची तक्रार शेतकऱ्यांनी बाजार समितीचे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी २३ जानेवारीला बैठक घेऊन संचालकाला बोलाविले. संचालकाने ३१ जानेवारीपर्यंत चुकारे देण्याचे मान्य केले. परंतु दिलेली तारीखही त्यांनी पाळली नाही. शेवटी शेतकऱ्यांनी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर, वर्षा लाखेकर, राहुल साठोने, राजेश साठोने यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला. अखेर पोलिसांनी राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु वर्षा लाखेकर व रमेश साठोने यांच्यावर कारवाई केली नाही. या दोन्ही संचालकांना अटक करावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांच्या समितीने केली आहे. तसेच संचालकांची संपत्ती विकण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. पत्रपरिषदेला गजानन बोंद्रे, बालाजी ढाले, अनिल लाड, रामेश्वर पाटील, नेकचंद चोरघडे, ज्ञानेश्वर धुंदे, कृष्णराव बावीस्कर, नंदकिशोर मुरोडिया, हेमकांत चिवडे, अखिलेश चपट, चंद्रशेखर गाखरे, नितीन नखाते, सुखदेव वाघे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMediaमाध्यमे