शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शेतकऱ्यांचे कापसाचे कोट्यवधीचे चुकारे पचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:19 IST

काटोल तालुक्यातील येनवा येथील मे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे पचविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे इतर दोन भागीदार यांनाही अटक करून, शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ मिळावेत, अशी मागणी पीडित कापूस उत्पादक संयोजन समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देमे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् कंपनीच्या दोन संचालकांना अटकचुकारे लवकरात लवकर मिळावे शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल तालुक्यातील येनवा येथील मे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे चुकारे पचविल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे इतर दोन भागीदार यांनाही अटक करून, शेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ मिळावेत, अशी मागणी पीडित कापूस उत्पादक संयोजन समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी पत्रपरिषदेत केली.काटोल परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मे. साई युथ अ‍ॅग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपनीला कापूस विकला. कंपनीने सर्व शेतकऱ्यांना धनादेश दिले. परंतु शेतकऱ्यांचे धनादेश वटलेच नाही. दुसऱ्यांदा पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले. तेसुद्धा वटले नाही. त्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलावून एकूण रकमेच्या ५० व २५ टक्के रकमेचे चेक दिले. त्याचीही रक्कम बॅँकेतून मिळाली नाही. जवळपास १०१ शेतकऱ्यांचे १ कोटी ९४ लाख रुपयांचे चुकारे अडकून असल्याचा आरोप समितीचे संयोजक सुरेंद्र रेवतकर यांनी केला.या संपूर्ण प्रकरणाची तक्रार शेतकऱ्यांनी बाजार समितीचे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी २३ जानेवारीला बैठक घेऊन संचालकाला बोलाविले. संचालकाने ३१ जानेवारीपर्यंत चुकारे देण्याचे मान्य केले. परंतु दिलेली तारीखही त्यांनी पाळली नाही. शेवटी शेतकऱ्यांनी कंपनीचे संचालक राजेश लाखेकर, वर्षा लाखेकर, राहुल साठोने, राजेश साठोने यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला. अखेर पोलिसांनी राजेश लाखेकर व राहुल साठोने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु वर्षा लाखेकर व रमेश साठोने यांच्यावर कारवाई केली नाही. या दोन्ही संचालकांना अटक करावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांच्या समितीने केली आहे. तसेच संचालकांची संपत्ती विकण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. पत्रपरिषदेला गजानन बोंद्रे, बालाजी ढाले, अनिल लाड, रामेश्वर पाटील, नेकचंद चोरघडे, ज्ञानेश्वर धुंदे, कृष्णराव बावीस्कर, नंदकिशोर मुरोडिया, हेमकांत चिवडे, अखिलेश चपट, चंद्रशेखर गाखरे, नितीन नखाते, सुखदेव वाघे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMediaमाध्यमे