शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भविष्यात हवामान विम्याचा शेतकऱ्यांना आधार : सुधीर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:34 IST

वैश्विकस्तरावर शेतकऱ्यांना वैभवसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पीक विम्याबरोबर शेतकऱ्यांना ‘हवामान विम्या’ची सुविधा येणाऱ्या काळात देण्याचा मानस आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळून आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीयदृष्ट्या स्वत:चा पर्यायाने देशाचा विकास घडवू शकतील. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास राष्ट्र्संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. सुधीर मेश्राम यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे‘ग्लोबल फ्युचरिस्टीक ट्रेंड्स इन लाईफ सायन्स’ आंतरराष्ट्रीय परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वैश्विकस्तरावर शेतकऱ्यांना वैभवसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पीक विम्याबरोबर शेतकऱ्यांना ‘हवामान विम्या’ची सुविधा येणाऱ्या काळात देण्याचा मानस आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळून आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीयदृष्ट्या स्वत:चा पर्यायाने देशाचा विकास घडवू शकतील. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास राष्ट्र्संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. सुधीर मेश्राम यांनी व्यक्त केला.ग्लोबल बायोटेक फोरम आणि राष्ट्र्संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राच्या वतीने मंगळवारी एक दिवसीय ‘ग्लोबल फ्युचरिस्टीक ट्रेंड्स इन लाईफ सायन्स’ आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.कार्यक्र माच्या उद्घाटनाप्रसंगी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय प्रमुख वक्ते म्हणून कोरिया मेरिटाईम ओशन युनिव्हर्सिटी, बुसान दक्षिण कोरियाचे प्रा. कीम युन हैए, सीईटीवायएस विद्यापीठ मेक्सिको येथील शिक्षण विभागाचे अधिष्ठाता प्रा.स्कॉट वेनेझयिा, एनओएए को-आॅपरेटिव्ह रिमोट सेंन्सिंग सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी केंद्र युएसएचे प्रा.तारेंद्र लाखनकर, टोकुशिमा विद्यापीठाचे डॉ. पंकज कोईनकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय प्राध्यापक आणि टाटा कॉफी लिमिटेड बंगळुरु चे संचालक प्रा. पी. जी. चेनगप्पा, परिसंवादाचे संयोजक डॉ.अशोक डोंगरे उपस्थित होते.सुधीर मेश्राम यांनी २१ व्या शतकातील आव्हानांचा उल्लेख करीत लोकसंख्येच्या तुलनेत जमिनीची उपलब्धता कमी होत आहे. कमी जमिनीवर अधिक उत्पादनाची पद्धती ही केवळ प्रयोगशाळेपुरतीच मर्यादित आहे. ही पद्धती येत्या काळात प्रयोगशाळेबाहेर आणणे. याशिवाय वनस्पती, प्राणी व अन्य संसाधनाचा वापर करु न जमिनीचा कस वाढवण्यावर भर देणार आहेत. विदेशी विमा कंपन्यांनी पुढाकार घेत येणाऱ्या काळात विविध देशातील ४०० दशलक्ष शेतकऱ्यांना ‘हवामान विम्या’चा लाभ देण्याची तयारी दर्शविली आहे. २०२० पर्यत शेतकरी हा केवळ पीक विमाच नव्हे तर हवामान विम्याचा लाभ घेत बदलत्या वातावरणात सर्वच पिकांचे रक्षण करु शकेल. आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून बौद्धिक संपदाचे जतन करु न येथील विचार भारतासह अन्य देशांपर्यत पोहोचिवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.डॉ. नरेंद्र चौधरी यांनी विज्ञानाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला थेट कंपन्यापर्यत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे. ज्याप्रमाणे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयोग करण्यात आला त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात शेतीवर प्रयोग करणाऱ्या प्रयोगशाळांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.प्रा. पी. जी. चेनगप्पा यांनी देखील विज्ञानाच्या वापराने विकास ही संकल्पना अमलात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना विज्ञानाचा योग्य वापर करण्याची शिकवण देण्याचे आवाहन केले. उपस्थित वक्त्यांनी यावेळी विचार व्यक्त करीत परिसंवाद आयोजकांचे आभार व्यक्त केले. कार्यक्र माचे उद्घाटन दीपप्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आले. कार्यक्र माचे संचालन प्रा. चित्रा लाडे यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर