शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना नाही; कालव्यांची कामे अजूनही प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 14:36 IST

गोसेखुर्दच्या कामात विशेष काही परिवर्तन झालेले नाही. कालव्यात पाणी भरले आहे. पण शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचलेले नाही.

ठळक मुद्देगोसीखुर्द म्हणजे १८ हजार कोटी खर्चून ३४ वर्षांत बांधलेले एक मोठं डबकं

नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला १९८३ मध्ये मंजुरी मिळाली व १९८८ मध्ये भूमिपूजन झाले. आज गोसेखुर्द प्रकल्पाचा ३४ वर्षाचा काळ लोटला आहे. ३७२ कोटींचा प्रकल्प आजच्या घडीला २१ हजार कोटींवर गेला आहे. १८ हजार कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. या ३४ वर्षात धरण बनले, पाणी जमा झाले. पण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. येथील प्रकल्पग्रस्तांचे दु:ख अजूनही निवारले नाही. पण या प्रकल्पाने सत्ताधारी, अधिकारी आणि कंत्राटदारांना मालामाल बनविले.

जनमंचच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सिंचन शोध यात्रा आयोजित करण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली. या सिंचन शोध यात्रेदरम्यान उजव्या कालव्याला भेट दिली. उजव्या कालव्यातून ९९ किलोमीटर पाणी सोडायचे होते. उजव्या कालव्याचे अनेक ठिकाणी अस्तरीकरण झालेले नाही. सप्टेंबर २०१० मध्ये कालव्याची भिंत वाहून गेली होती. तेव्हापासून कालव्याच्या रिटर्निंग वॉल बांधण्यात आल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचविण्यासाठी वितरिका बांधण्यात आल्या नाहीत. उजवा कालवा हा मुख्य कालवा असून, १.५ लाख हेक्टर जमीन त्यामुळे सिंचनाखाली येणार होती. पण कालव्याचे काम अपूर्ण आहे.

उजव्या कालव्याच्या अनेक भागात अस्तरीकरण करण्यातच आले नाही

- कंत्राटदाराने काम सोडले तरी ७ कोटीचे पेमेंट दिले

उजव्या कालव्यावर ४ गेट होते. ते काम १५ कोटी ३० लाख रुपयांचे होते. २०१४ मध्ये कामाचे टेंडर निघाले. कंत्राटदाराला ३ वेळा मुदतवाढ दिली. पण कंत्राटदाराने काम सोडले. त्याने सोडलेल्या अर्धवट कामाचे ७ कोटी रुपये पेमेंट झाले आहे. कंत्राटदारावर १० टक्के पेनॉल्टी लावण्याचा अधिकार असताना केवळ १ हजार रुपये प्रतिदिवस पेनॉल्टी वसूल केली जात आहे. कंत्राटदारावर मेहेरबानी का दाखविली जात आहे, असा सवाल जनमंचच्या सदस्यांनी केला.

- घोडाझरी शाखा कालव्याला रेल्वेचा अडसर

घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द प्रकल्पाचा भाग असून, या कालव्यामुळे ५५.५५ किलोमीटरपर्यंतचे सिंचन होणार आहे. या कालव्याची सिंचन क्षमता २८२३५ हेक्टर आहे. ११९ गावात पाणी पोहचणार आहे. या कालव्याचे २०१६ मध्ये काम सुरू झाले. पण रेल्वेमुळे हे काम अजूनही रखडलेले आहे. घोडाझरी शाखा कालव्याचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके यांनी सांगितले की कोरोनामुळे दोन वर्षे काम झाले नाही सोबतच रेल्वे व वनविभागाच्या मंजुरीमुळे हे काम रखडले आहे.

- सिंचन यात्रेत सहभागी तज्ज्ञ

जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी आयोजित केलेल्या या सिंचन यात्रेत सल्लागार शरद पाटील, रमेश बोरकुटे, गोविंदराव भेंडाळकर, प्रा. मिलिंद राऊत, प्रमोद पांडे, प्रमोद रामेकर, दादा झोड, श्रीकांत दौड, प्रदीप निनावे, श्रीकांत देवळे, किशोर गुल्हाने, राम जावळकर, राम आखरे, प्रशांत तारणिक, प्रशांत मोरे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पVidarbhaविदर्भagricultureशेतीFarmerशेतकरी