शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना नाही; कालव्यांची कामे अजूनही प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 14:36 IST

गोसेखुर्दच्या कामात विशेष काही परिवर्तन झालेले नाही. कालव्यात पाणी भरले आहे. पण शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचलेले नाही.

ठळक मुद्देगोसीखुर्द म्हणजे १८ हजार कोटी खर्चून ३४ वर्षांत बांधलेले एक मोठं डबकं

नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला १९८३ मध्ये मंजुरी मिळाली व १९८८ मध्ये भूमिपूजन झाले. आज गोसेखुर्द प्रकल्पाचा ३४ वर्षाचा काळ लोटला आहे. ३७२ कोटींचा प्रकल्प आजच्या घडीला २१ हजार कोटींवर गेला आहे. १८ हजार कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. या ३४ वर्षात धरण बनले, पाणी जमा झाले. पण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. येथील प्रकल्पग्रस्तांचे दु:ख अजूनही निवारले नाही. पण या प्रकल्पाने सत्ताधारी, अधिकारी आणि कंत्राटदारांना मालामाल बनविले.

जनमंचच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सिंचन शोध यात्रा आयोजित करण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली. या सिंचन शोध यात्रेदरम्यान उजव्या कालव्याला भेट दिली. उजव्या कालव्यातून ९९ किलोमीटर पाणी सोडायचे होते. उजव्या कालव्याचे अनेक ठिकाणी अस्तरीकरण झालेले नाही. सप्टेंबर २०१० मध्ये कालव्याची भिंत वाहून गेली होती. तेव्हापासून कालव्याच्या रिटर्निंग वॉल बांधण्यात आल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचविण्यासाठी वितरिका बांधण्यात आल्या नाहीत. उजवा कालवा हा मुख्य कालवा असून, १.५ लाख हेक्टर जमीन त्यामुळे सिंचनाखाली येणार होती. पण कालव्याचे काम अपूर्ण आहे.

उजव्या कालव्याच्या अनेक भागात अस्तरीकरण करण्यातच आले नाही

- कंत्राटदाराने काम सोडले तरी ७ कोटीचे पेमेंट दिले

उजव्या कालव्यावर ४ गेट होते. ते काम १५ कोटी ३० लाख रुपयांचे होते. २०१४ मध्ये कामाचे टेंडर निघाले. कंत्राटदाराला ३ वेळा मुदतवाढ दिली. पण कंत्राटदाराने काम सोडले. त्याने सोडलेल्या अर्धवट कामाचे ७ कोटी रुपये पेमेंट झाले आहे. कंत्राटदारावर १० टक्के पेनॉल्टी लावण्याचा अधिकार असताना केवळ १ हजार रुपये प्रतिदिवस पेनॉल्टी वसूल केली जात आहे. कंत्राटदारावर मेहेरबानी का दाखविली जात आहे, असा सवाल जनमंचच्या सदस्यांनी केला.

- घोडाझरी शाखा कालव्याला रेल्वेचा अडसर

घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द प्रकल्पाचा भाग असून, या कालव्यामुळे ५५.५५ किलोमीटरपर्यंतचे सिंचन होणार आहे. या कालव्याची सिंचन क्षमता २८२३५ हेक्टर आहे. ११९ गावात पाणी पोहचणार आहे. या कालव्याचे २०१६ मध्ये काम सुरू झाले. पण रेल्वेमुळे हे काम अजूनही रखडलेले आहे. घोडाझरी शाखा कालव्याचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके यांनी सांगितले की कोरोनामुळे दोन वर्षे काम झाले नाही सोबतच रेल्वे व वनविभागाच्या मंजुरीमुळे हे काम रखडले आहे.

- सिंचन यात्रेत सहभागी तज्ज्ञ

जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी आयोजित केलेल्या या सिंचन यात्रेत सल्लागार शरद पाटील, रमेश बोरकुटे, गोविंदराव भेंडाळकर, प्रा. मिलिंद राऊत, प्रमोद पांडे, प्रमोद रामेकर, दादा झोड, श्रीकांत दौड, प्रदीप निनावे, श्रीकांत देवळे, किशोर गुल्हाने, राम जावळकर, राम आखरे, प्रशांत तारणिक, प्रशांत मोरे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पVidarbhaविदर्भagricultureशेतीFarmerशेतकरी