शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना नाही; कालव्यांची कामे अजूनही प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 14:36 IST

गोसेखुर्दच्या कामात विशेष काही परिवर्तन झालेले नाही. कालव्यात पाणी भरले आहे. पण शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचलेले नाही.

ठळक मुद्देगोसीखुर्द म्हणजे १८ हजार कोटी खर्चून ३४ वर्षांत बांधलेले एक मोठं डबकं

नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला १९८३ मध्ये मंजुरी मिळाली व १९८८ मध्ये भूमिपूजन झाले. आज गोसेखुर्द प्रकल्पाचा ३४ वर्षाचा काळ लोटला आहे. ३७२ कोटींचा प्रकल्प आजच्या घडीला २१ हजार कोटींवर गेला आहे. १८ हजार कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. या ३४ वर्षात धरण बनले, पाणी जमा झाले. पण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. येथील प्रकल्पग्रस्तांचे दु:ख अजूनही निवारले नाही. पण या प्रकल्पाने सत्ताधारी, अधिकारी आणि कंत्राटदारांना मालामाल बनविले.

जनमंचच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सिंचन शोध यात्रा आयोजित करण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली. या सिंचन शोध यात्रेदरम्यान उजव्या कालव्याला भेट दिली. उजव्या कालव्यातून ९९ किलोमीटर पाणी सोडायचे होते. उजव्या कालव्याचे अनेक ठिकाणी अस्तरीकरण झालेले नाही. सप्टेंबर २०१० मध्ये कालव्याची भिंत वाहून गेली होती. तेव्हापासून कालव्याच्या रिटर्निंग वॉल बांधण्यात आल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचविण्यासाठी वितरिका बांधण्यात आल्या नाहीत. उजवा कालवा हा मुख्य कालवा असून, १.५ लाख हेक्टर जमीन त्यामुळे सिंचनाखाली येणार होती. पण कालव्याचे काम अपूर्ण आहे.

उजव्या कालव्याच्या अनेक भागात अस्तरीकरण करण्यातच आले नाही

- कंत्राटदाराने काम सोडले तरी ७ कोटीचे पेमेंट दिले

उजव्या कालव्यावर ४ गेट होते. ते काम १५ कोटी ३० लाख रुपयांचे होते. २०१४ मध्ये कामाचे टेंडर निघाले. कंत्राटदाराला ३ वेळा मुदतवाढ दिली. पण कंत्राटदाराने काम सोडले. त्याने सोडलेल्या अर्धवट कामाचे ७ कोटी रुपये पेमेंट झाले आहे. कंत्राटदारावर १० टक्के पेनॉल्टी लावण्याचा अधिकार असताना केवळ १ हजार रुपये प्रतिदिवस पेनॉल्टी वसूल केली जात आहे. कंत्राटदारावर मेहेरबानी का दाखविली जात आहे, असा सवाल जनमंचच्या सदस्यांनी केला.

- घोडाझरी शाखा कालव्याला रेल्वेचा अडसर

घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द प्रकल्पाचा भाग असून, या कालव्यामुळे ५५.५५ किलोमीटरपर्यंतचे सिंचन होणार आहे. या कालव्याची सिंचन क्षमता २८२३५ हेक्टर आहे. ११९ गावात पाणी पोहचणार आहे. या कालव्याचे २०१६ मध्ये काम सुरू झाले. पण रेल्वेमुळे हे काम अजूनही रखडलेले आहे. घोडाझरी शाखा कालव्याचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके यांनी सांगितले की कोरोनामुळे दोन वर्षे काम झाले नाही सोबतच रेल्वे व वनविभागाच्या मंजुरीमुळे हे काम रखडले आहे.

- सिंचन यात्रेत सहभागी तज्ज्ञ

जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी आयोजित केलेल्या या सिंचन यात्रेत सल्लागार शरद पाटील, रमेश बोरकुटे, गोविंदराव भेंडाळकर, प्रा. मिलिंद राऊत, प्रमोद पांडे, प्रमोद रामेकर, दादा झोड, श्रीकांत दौड, प्रदीप निनावे, श्रीकांत देवळे, किशोर गुल्हाने, राम जावळकर, राम आखरे, प्रशांत तारणिक, प्रशांत मोरे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पVidarbhaविदर्भagricultureशेतीFarmerशेतकरी