शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना नाही; कालव्यांची कामे अजूनही प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 14:36 IST

गोसेखुर्दच्या कामात विशेष काही परिवर्तन झालेले नाही. कालव्यात पाणी भरले आहे. पण शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचलेले नाही.

ठळक मुद्देगोसीखुर्द म्हणजे १८ हजार कोटी खर्चून ३४ वर्षांत बांधलेले एक मोठं डबकं

नागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला १९८३ मध्ये मंजुरी मिळाली व १९८८ मध्ये भूमिपूजन झाले. आज गोसेखुर्द प्रकल्पाचा ३४ वर्षाचा काळ लोटला आहे. ३७२ कोटींचा प्रकल्प आजच्या घडीला २१ हजार कोटींवर गेला आहे. १८ हजार कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. या ३४ वर्षात धरण बनले, पाणी जमा झाले. पण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. येथील प्रकल्पग्रस्तांचे दु:ख अजूनही निवारले नाही. पण या प्रकल्पाने सत्ताधारी, अधिकारी आणि कंत्राटदारांना मालामाल बनविले.

जनमंचच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सिंचन शोध यात्रा आयोजित करण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली. या सिंचन शोध यात्रेदरम्यान उजव्या कालव्याला भेट दिली. उजव्या कालव्यातून ९९ किलोमीटर पाणी सोडायचे होते. उजव्या कालव्याचे अनेक ठिकाणी अस्तरीकरण झालेले नाही. सप्टेंबर २०१० मध्ये कालव्याची भिंत वाहून गेली होती. तेव्हापासून कालव्याच्या रिटर्निंग वॉल बांधण्यात आल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचविण्यासाठी वितरिका बांधण्यात आल्या नाहीत. उजवा कालवा हा मुख्य कालवा असून, १.५ लाख हेक्टर जमीन त्यामुळे सिंचनाखाली येणार होती. पण कालव्याचे काम अपूर्ण आहे.

उजव्या कालव्याच्या अनेक भागात अस्तरीकरण करण्यातच आले नाही

- कंत्राटदाराने काम सोडले तरी ७ कोटीचे पेमेंट दिले

उजव्या कालव्यावर ४ गेट होते. ते काम १५ कोटी ३० लाख रुपयांचे होते. २०१४ मध्ये कामाचे टेंडर निघाले. कंत्राटदाराला ३ वेळा मुदतवाढ दिली. पण कंत्राटदाराने काम सोडले. त्याने सोडलेल्या अर्धवट कामाचे ७ कोटी रुपये पेमेंट झाले आहे. कंत्राटदारावर १० टक्के पेनॉल्टी लावण्याचा अधिकार असताना केवळ १ हजार रुपये प्रतिदिवस पेनॉल्टी वसूल केली जात आहे. कंत्राटदारावर मेहेरबानी का दाखविली जात आहे, असा सवाल जनमंचच्या सदस्यांनी केला.

- घोडाझरी शाखा कालव्याला रेल्वेचा अडसर

घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द प्रकल्पाचा भाग असून, या कालव्यामुळे ५५.५५ किलोमीटरपर्यंतचे सिंचन होणार आहे. या कालव्याची सिंचन क्षमता २८२३५ हेक्टर आहे. ११९ गावात पाणी पोहचणार आहे. या कालव्याचे २०१६ मध्ये काम सुरू झाले. पण रेल्वेमुळे हे काम अजूनही रखडलेले आहे. घोडाझरी शाखा कालव्याचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके यांनी सांगितले की कोरोनामुळे दोन वर्षे काम झाले नाही सोबतच रेल्वे व वनविभागाच्या मंजुरीमुळे हे काम रखडले आहे.

- सिंचन यात्रेत सहभागी तज्ज्ञ

जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी आयोजित केलेल्या या सिंचन यात्रेत सल्लागार शरद पाटील, रमेश बोरकुटे, गोविंदराव भेंडाळकर, प्रा. मिलिंद राऊत, प्रमोद पांडे, प्रमोद रामेकर, दादा झोड, श्रीकांत दौड, प्रदीप निनावे, श्रीकांत देवळे, किशोर गुल्हाने, राम जावळकर, राम आखरे, प्रशांत तारणिक, प्रशांत मोरे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पVidarbhaविदर्भagricultureशेतीFarmerशेतकरी