शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी व्हावे : भीमराव कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:40 IST

शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्दे वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल :‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर चर्चासत्रात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. शिक्षित होऊन शेती करण्यासह उत्पादित मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी स्वत: व्यापारी होऊन विक्रीवर लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रगत संत्रा उत्पादक भीमराव कडू यांनी चर्चासत्रात ‘संत्रा विक्रीची व्यवस्था’, या विषयावर बोलताना व्यक्त केले.शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत: संत्रा विक्रीसाठी पुढे यावे. राज्य शासनाने विक्रीची व्यवस्था केली आहे. ते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे मोठे साधन आहे. याकरिता थोडेफार प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आता स्वत:च बाजारात संत्री विकत असल्यामुळे अडीच पट उत्पन्न मिळत आहे. उदाहरण देताना कडू म्हणाले, कळमना बाजारात दोन हजार रुपये टन भावाने संत्री विकली जातात. त्याकरिता तीन हजार रुपये टन वाहतूक खर्च येतो. पण भावाला पुणे येथे पाठवून संत्रा विक्रीचा गट तयार केला. २० हजार रुपये टन किमतीचा संत्रा पुणे येथे पाठवितो. त्याकरिता ८ हजार रुपये वाहतूक खर्च येतो. हा संत्रा राज्य पणन महासंघाने उभ्या केलेल्या आठवडी बाजारात ५० हजार रुपये टनापर्यंत विकला जातो. या प्रक्रियेत मला २० हजार आणि भावाला २२ हजार रुपये मिळतात. सर्व उत्पन्न घरातच आहे. कडू यांची कळमेश्वर तालुक्यात पारडी-देशमुख येथे २० एकरवर संत्र्याची बाग आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलसारखे माध्यम संत्रा उत्पादकांना लोकमतने उपलब्ध करून दिले आहे. पण चर्चासत्रात शेतकऱ्यांची हजेरी कमी असल्यावर त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरFarmerशेतकरी