शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहित जमिनीच्या थकित मोबदल्यासाठी शेतकरी थेट रेल्वे राज्य मंत्र्यांच्या दालनात

By नरेश डोंगरे | Updated: February 13, 2024 01:05 IST

प्रशासनाकडून परवड होत असल्याने शेतकरी रडकुंडीला

नागपूर : सरकारी यंत्रणांचे वारंवार उंबरठे झिजवूनही अधिग्रहित जमिनीचा थकित मोबदला मिळत नसल्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांनी थेट दिल्ली गाठली. आपल्या मतदार संघाच्या खासदाराच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आणि आपले गाऱ्हाणे त्यांना ऐकवले. शेतकऱ्यांची परवड होत असल्याचे लक्षात येताच रेल्वे राज्य मंत्र्यांनीही तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा करून शक्य तेवढ्या लवकर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

प्रकरण आहे देवळी (जि. वर्धा) पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे. वर्धा - यवतमाळ - नांदेड या बहुचर्चित रेल्वे मार्गासाठी शासनाने देवळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची सुमारे १०० एकर पेक्षा जास्त शेती १० वर्षांपूर्वी अधिग्रहित केली. त्यावेळी केवळ ९.६० लाख रुपये हेक्टर या भावाने शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. तो अत्यंत कमी असल्याच्या भावनेमुळे शेतकऱ्यांनी अधिग्रहित जमिनीचा भाव वाढवून मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली. २०१९ मध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन अधिग्रहित जमिनीच्या मोबदल्यातील रकमेची (भावाची) जवळपास चार पट वाढ करून रक्कम देण्याचे आदेश दिले. तेव्हापासून वाढीव मोबदल्याची रक्कम पदरात पडावी म्हणून बिचारे शेतकरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र, वारंवार मागणी, अर्ज, विनंत्या करूनही जिल्हा प्रशासनाकडून थकित वाढीव मोबदल्याची रक्कम त्यांना मिळालेली नाही. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा मार सोसणारे शेतकरी त्यामुळे रडकुंडीला आले आहे.

या पार्श्वभूमीवर, देवळी भागातील शेतकरी विलास जोशी, जब्बारभाई तंवर, शैलेष पाळेकर, मोहन ठाकरे, अनिल क्षिरसागर, धनराज घुबडे आदींनी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या माध्यमातून शुक्रवारी थेट दिल्लीला धडक दिली. त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांंच्या दालनात जाऊन त्यांना आपली व्यथा ऐकवली. वेळोवेळी संकटाचा मार सोसणाऱ्या आम्हा शेतकऱ्यांच्या पदरात आमच्याच जमिनीचा मोबदला घालण्यासाठी सरकारी यंत्रणा का मागे-पुढे बघते, असा सवाल या शेतकऱ्यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना केला. चार वर्षांपासून शेतकऱ्यांची ससेहोलपट होत असल्याचे बघून दानवे यांनी तात्काळ वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना फोन लावून या प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यानंतर वाढीव मोबदला देण्यासंबंधाने तत्परतेने प्रक्रिया राबविण्याचेही निर्देश दिले.काय अडचण ते तपासू : जिल्हाधिकारीया संबंधाने जिल्हाधिकारी कर्डिले यांच्याकडे प्रस्तूत प्रतिनिधीने विचारणा केली असता त्यांनी रेल्वे राज्य मंत्र्यांकडून या प्रकरणाच्या संबंधाने सूचना आल्याचे मान्य केले. लवकरच आपण हे प्रकरण समजून घेऊ आणि काय अडचण आहे, ते तपासून पुढची आवश्यक प्रक्रिया राबवू, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेFarmerशेतकरी