शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

शेतकरयांचे मृत्यू कीटकनाशकामुळे झालेच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 7:47 PM

यवतमाळ जिल्ह्यात एकाही शेतकरयांचा मृत्यू कीटकनाशकामुळे झाला नाही, असा दावा नवी दिल्ली येथील क्रॉप केयर फेडरेशन आॅफ इंडियाने केला आहे.

ठळक मुद्देउत्पादकांचा दावा : हायकोर्टातील प्रकरणात मध्यस्थी अर्ज

आॅनलाईन लोकमतनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात एकाही शेतकरयांचा मृत्यू कीटकनाशकामुळे झाला नाही, असा दावा नवी दिल्ली येथील क्रॉप केयर फेडरेशन आॅफ इंडियाने केला आहे. ही  संघटना कीटकनाशके उत्पादकांची आहे.यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित असून त्यात स्वत:ला प्रतिवादी करून घेण्यासाठी संघटनेने अर्ज दाखल केला आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे. कीटकनाशके वापरामध्ये भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. त्यावरून भारतात कीटकनाशकाचा अतिरिक्त उपयोग केला जात नसल्याचे स्पष्ट होते. बाजारात विकल्या जाणारया कीटकनाशकासोबत संबंधित कीटकनाशक कसे वापरायचे याची माहिती पुस्तिका दिली जाते. त्यामुळे कीटकनाशक उत्पादकांवर निष्काळजीपणाचा आरोप केला जाऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या शेतकरी मृत्यूस कीटकनाशक कारणीभूत असल्याचा एकही वैद्यकीय पुरावा अद्याप पुढे आलेला नाही. परिणामी शेतकरयांचे मृत्यू कीटकनाशकामुळे झाले , असे म्हणणे चुकीचे आहे. राज्यात कीटकनाशक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा दावाही निराधार आहे असे फेडरेशनने अर्जात म्हटले आहे.कापुस उत्पादनात यवतमाळ आघाडीवरराज्यामध्ये कापुस उत्पादनात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. राज्यात ४ मिलियन हेक्टर्समध्ये कापसाचे पिक घेतले जाते. त्यापैकी ०.५ मिलियन हेक्टर शेती एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. जगातील कापुस उत्पादनात भारताचा वाटा २६ टक्के आहे. २००० ते २०१६ या काळात भारतातील कापसाचे उत्पादन २५० टक्क्यांनी वाढले आहे. जगात एकाही देशाला अशी प्रगती करता आलेली नाही  , अशी माहिती फेडरेशनच्या अर्जात देण्यात आली आहे.काय म्हटलेय जनहित याचिकेतयासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. शेतकºयांच्या मृत्यूंची न्यायिक आयोग किंवा विशेष तपास पथकाद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी व कंपन्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, मयत शेतकरयांच्या कुटुंबीयांना २० लाख तर, प्रभावित शेतकरयांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. के. वाघमारे कामकाज पहात आहेत.