शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

रात्रीचे ओलीत करायला गेला अन् जीवच गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 18:37 IST

रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा शेतातील विहिरीत पडून करुण अंत झाला. मोहदी (धोत्रा) शिवारात मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देमोहदी (धोत्रा) शिवारात शेतमजुराचा विहिरीत पडून मृत्यू

नागपूर : महावितरणकडून कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा केला जातो. अशात रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा शेतातील विहिरीत पडून करुण अंत झाला. शिवलाल जंगी उईके (३५, रा. रमना) असे मृताचे नाव आहे. नरखेड तालुक्यातील मोहदी (धोत्रा) शिवारात मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली.

ईर्शाद पठाण. (रा. नरखेड) यांनी मोहदी (धोत्रा) शिवारात ४.३० एकर शेती ठेक्याने वहिवाटीसाठी घेतली आहे. शिवलाल हा त्यांच्या शेतात काम करत होता. रविवारी रात्री ९ वाजता विद्युत पुरवठा सुरू होणार असल्यामुळे तो शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. मात्र दोन दिवस होऊनही तो घरी परत आला नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीने व भावाने त्याचा शोध घेतला. मात्र कुठेही शोध लागला नाही. मंगळवारी ईर्शाद पठाण सकाळी ७.३० वाजता शेतात गेले असता, शिवलाल याचा मृतदेह त्यांना शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती नरखेड पोलिसांना दिली. माहिती मिळताच नरखेड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह विहिरीबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला.

अंधारामुळे गेला तोल

शिवलाल याला रात्री मोटार पंप सुरू करतेवेळी अंधार असल्यामुळे विहिरीचा अंदाज घेता आला नसावा. त्यामुळे त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आसावा, असा प्राथमिक अंदाज नरखेड पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस नायक दिनेश वरठी व दिगंबर राठोड करीत आहेत.

आणखी किती दिवस रात्रीचे सिंचन?

शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता नियमित विद्युत पुरवठा मिळत नाही. याकरिता आपला जीव धोक्यात टाकावा लागत आहे. महावितरणच्या वेळापत्रकानुसार तालुक्यात बुधवार ते शुक्रवारी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत, रविवार व सोमवार रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत, शनिवारी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत व रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा केला जात आहे. मंगळवारी पूर्ण दिवस पुरवठा बंद असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू, चणा, संत्रा, मोसंबी, भाजीपाल्यास पाणी देण्याकरिता जिवावर उदार होऊन रात्री कडाक्याच्या थंडीत शेतात जावे लागते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूFarmerशेतकरीagricultureशेती