शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घामाचे दाम मिळत नसल्याने जमिनदाराकडे केली चोरी, छत्तीसगडमधील कुटुंबिय नागपुरात जेरबंद 

By नरेश डोंगरे | Updated: December 23, 2024 19:22 IST

Nagpur Crime News: अंगभर कष्ट करून घेणारा जमिनदार घामाचे दाम देण्यासाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या मजूर कुटुंबाने त्याच्या घरात चोरी केली. चोरीचा ऐवज घेऊन ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

- नरेश डोंगरे नागपूर - अंगभर कष्ट करून घेणारा जमिनदार घामाचे दाम देण्यासाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या मजूर कुटुंबाने त्याच्या घरात चोरी केली. चोरीचा ऐवज घेऊन ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

जीआरपी सूत्रांच्या माहितीनुसार, ईश्वर (४३), अनिता (३८) आणि त्यांची दोन मुले अभय (१९) आणि अंकित (वय १८) अशी या चाैघांची नावे आहेत. मुळचे छत्तीसगडमधील रहिवासी असलेले अत्यंत गरिब आहे. कामाच्या शोधात चार वर्षांपूर्वी ते तामिळनाडूत गेले होते. तेथे एका जमिनदाराकडे ते काम करीत होते. रात्रंदिवस शेतात राबवून घेणारा जमिनदार त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मात्र देत नव्हता. पैसे मागितल्यास तो त्यांना मारहाण करायचा. त्यामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागविणे दूर, पोटभर खायलाही मिळत नव्हते. त्यामुळे हे बिचारे चांगलेच वैतागले होते. अशात शेतमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्यांनी १९ डिसेंबरला त्याच्या घरातून सोन्याचांदीचे दागिने आणि सुमारे २० हजार रोख असा एकूण ४ लाख, ८२ हजारांचा ऐवज चोरला. तो घेऊन ही मंडळी ट्रेन नंबर १२६२५ केरला एक्सप्रेसने छत्तीसगडकडे जाण्यासाठी निघाली.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी या चोरीची तक्रार पुदुमंड (जि. निलगिरी, तामिळनाडू) पोलीस ठाण्यात नोंदली गेली. पोलिसांनी चाैकशी केली असता हे चाैघे केरला एक्सप्रेसने नागपूरकडे जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी नागपूर रेल्वे सुरक्षा दलाला कळविले. पोलिस निरीक्षक सत्येंद्र यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच कारवाईचा पवित्रा घेतला. ही गाडी शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता नागपूर स्थानकावर पोहचताच आरपीएफच्या जवानांनी संशयीतांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सोन्याचांदीचे हार, कर्णफुल, बिछूवे, बांगड्या, अंगठ्या आणि रोख १९,२६५ रुपये ताब्यात घेतले. ही माहिती तामिळनाडू पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार रविवारी तामिळनाडू पोलिसांचे पथक नागपुरात पोहचले. त्यांनी आरपीएफच्या ताब्यातून उपरोक्त चाैघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यामागचे कारण जाणून सारेच झाले शांतधाडसी चोरी करून एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात पळून जाणारे आरोपी सराईत असावे, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चाैकशी केली. त्यांनी चोरीमागची हतबलता, वैताग स्पष्ट करताच तपास करणारी मंडळीही काही वेळेसाठी स्तब्ध झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूChhattisgarhछत्तीसगडnagpurनागपूर