शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

घामाचे दाम मिळत नसल्याने जमिनदाराकडे केली चोरी, छत्तीसगडमधील कुटुंबिय नागपुरात जेरबंद 

By नरेश डोंगरे | Updated: December 23, 2024 19:22 IST

Nagpur Crime News: अंगभर कष्ट करून घेणारा जमिनदार घामाचे दाम देण्यासाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या मजूर कुटुंबाने त्याच्या घरात चोरी केली. चोरीचा ऐवज घेऊन ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

- नरेश डोंगरे नागपूर - अंगभर कष्ट करून घेणारा जमिनदार घामाचे दाम देण्यासाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या मजूर कुटुंबाने त्याच्या घरात चोरी केली. चोरीचा ऐवज घेऊन ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

जीआरपी सूत्रांच्या माहितीनुसार, ईश्वर (४३), अनिता (३८) आणि त्यांची दोन मुले अभय (१९) आणि अंकित (वय १८) अशी या चाैघांची नावे आहेत. मुळचे छत्तीसगडमधील रहिवासी असलेले अत्यंत गरिब आहे. कामाच्या शोधात चार वर्षांपूर्वी ते तामिळनाडूत गेले होते. तेथे एका जमिनदाराकडे ते काम करीत होते. रात्रंदिवस शेतात राबवून घेणारा जमिनदार त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मात्र देत नव्हता. पैसे मागितल्यास तो त्यांना मारहाण करायचा. त्यामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागविणे दूर, पोटभर खायलाही मिळत नव्हते. त्यामुळे हे बिचारे चांगलेच वैतागले होते. अशात शेतमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्यांनी १९ डिसेंबरला त्याच्या घरातून सोन्याचांदीचे दागिने आणि सुमारे २० हजार रोख असा एकूण ४ लाख, ८२ हजारांचा ऐवज चोरला. तो घेऊन ही मंडळी ट्रेन नंबर १२६२५ केरला एक्सप्रेसने छत्तीसगडकडे जाण्यासाठी निघाली.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी या चोरीची तक्रार पुदुमंड (जि. निलगिरी, तामिळनाडू) पोलीस ठाण्यात नोंदली गेली. पोलिसांनी चाैकशी केली असता हे चाैघे केरला एक्सप्रेसने नागपूरकडे जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी नागपूर रेल्वे सुरक्षा दलाला कळविले. पोलिस निरीक्षक सत्येंद्र यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच कारवाईचा पवित्रा घेतला. ही गाडी शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता नागपूर स्थानकावर पोहचताच आरपीएफच्या जवानांनी संशयीतांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सोन्याचांदीचे हार, कर्णफुल, बिछूवे, बांगड्या, अंगठ्या आणि रोख १९,२६५ रुपये ताब्यात घेतले. ही माहिती तामिळनाडू पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार रविवारी तामिळनाडू पोलिसांचे पथक नागपुरात पोहचले. त्यांनी आरपीएफच्या ताब्यातून उपरोक्त चाैघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यामागचे कारण जाणून सारेच झाले शांतधाडसी चोरी करून एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात पळून जाणारे आरोपी सराईत असावे, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चाैकशी केली. त्यांनी चोरीमागची हतबलता, वैताग स्पष्ट करताच तपास करणारी मंडळीही काही वेळेसाठी स्तब्ध झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूChhattisgarhछत्तीसगडnagpurनागपूर