शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

घामाचे दाम मिळत नसल्याने जमिनदाराकडे केली चोरी, छत्तीसगडमधील कुटुंबिय नागपुरात जेरबंद 

By नरेश डोंगरे | Updated: December 23, 2024 19:22 IST

Nagpur Crime News: अंगभर कष्ट करून घेणारा जमिनदार घामाचे दाम देण्यासाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या मजूर कुटुंबाने त्याच्या घरात चोरी केली. चोरीचा ऐवज घेऊन ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

- नरेश डोंगरे नागपूर - अंगभर कष्ट करून घेणारा जमिनदार घामाचे दाम देण्यासाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या मजूर कुटुंबाने त्याच्या घरात चोरी केली. चोरीचा ऐवज घेऊन ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

जीआरपी सूत्रांच्या माहितीनुसार, ईश्वर (४३), अनिता (३८) आणि त्यांची दोन मुले अभय (१९) आणि अंकित (वय १८) अशी या चाैघांची नावे आहेत. मुळचे छत्तीसगडमधील रहिवासी असलेले अत्यंत गरिब आहे. कामाच्या शोधात चार वर्षांपूर्वी ते तामिळनाडूत गेले होते. तेथे एका जमिनदाराकडे ते काम करीत होते. रात्रंदिवस शेतात राबवून घेणारा जमिनदार त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मात्र देत नव्हता. पैसे मागितल्यास तो त्यांना मारहाण करायचा. त्यामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागविणे दूर, पोटभर खायलाही मिळत नव्हते. त्यामुळे हे बिचारे चांगलेच वैतागले होते. अशात शेतमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्यांनी १९ डिसेंबरला त्याच्या घरातून सोन्याचांदीचे दागिने आणि सुमारे २० हजार रोख असा एकूण ४ लाख, ८२ हजारांचा ऐवज चोरला. तो घेऊन ही मंडळी ट्रेन नंबर १२६२५ केरला एक्सप्रेसने छत्तीसगडकडे जाण्यासाठी निघाली.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी या चोरीची तक्रार पुदुमंड (जि. निलगिरी, तामिळनाडू) पोलीस ठाण्यात नोंदली गेली. पोलिसांनी चाैकशी केली असता हे चाैघे केरला एक्सप्रेसने नागपूरकडे जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी नागपूर रेल्वे सुरक्षा दलाला कळविले. पोलिस निरीक्षक सत्येंद्र यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच कारवाईचा पवित्रा घेतला. ही गाडी शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता नागपूर स्थानकावर पोहचताच आरपीएफच्या जवानांनी संशयीतांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सोन्याचांदीचे हार, कर्णफुल, बिछूवे, बांगड्या, अंगठ्या आणि रोख १९,२६५ रुपये ताब्यात घेतले. ही माहिती तामिळनाडू पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार रविवारी तामिळनाडू पोलिसांचे पथक नागपुरात पोहचले. त्यांनी आरपीएफच्या ताब्यातून उपरोक्त चाैघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यामागचे कारण जाणून सारेच झाले शांतधाडसी चोरी करून एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात पळून जाणारे आरोपी सराईत असावे, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चाैकशी केली. त्यांनी चोरीमागची हतबलता, वैताग स्पष्ट करताच तपास करणारी मंडळीही काही वेळेसाठी स्तब्ध झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूChhattisgarhछत्तीसगडnagpurनागपूर