शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

महाकुंभात कुटुंबीयांचे ‘बिछडना’ अन काही तासांतच ‘मिलना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 05:30 IST

‘खोया-पाया’ केंद्रांची तत्परता : २२ हजारांहून अधिक बेपत्ता भाविकांचा शोध

- योगेश पांडेप्रयागराज : हिंदी चित्रपट व विविध कथांच्या माध्यमातून कुंभमेळा म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे ‘बिछडना’ आणि त्यानंतर वर्षानुवर्षे त्यांचा शोध असे अनेकांच्या मनावर कोरले गेले आहे. मात्र १४४ वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभाने हा समज खोडून काढला आहे. ६० कोटींहून अधिक भाविकांच्या गर्दीत जवळपास २२ हजारांहून अधिक भाविक आप्तस्वकीयांपासून दुरावल्या तर गेले. मात्र तंत्रज्ञान व प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यातील बहुतांश जणांचा शोध लावण्यातदेखील यश आले. जागोजागी उभारण्यात आलेल्या ‘खोया-पाया’ केंद्रांनाच याचे क्रेडिट देण्यात येत आहे.

महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये देशविदेशातून भाविक पोहोचत असून अखेरच्या आठवड्यात तर हे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले. सर्वच ठिकाणी पाय ठेवायलादेखील जागा नसल्याचे चित्र आहे. या गर्दीत एकदा हात सुटला की सोबतचे कधीही दुरावतील अशीच स्थिती आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध लागावा यासाठी दरवेळेप्रमाणे यंदादेखील प्रयागराजमध्ये ‘खोया-पाया’ केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यंदा यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीदेखील मदत घेण्यात येत आहे. आतापर्यंत २२ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या व त्यातील बहुतांश जणांचा २४ तासांच्या आत शोध घेण्यात प्रशासनाला यश आले.

तंत्रज्ञान आणि पारंपरिक तंत्राची जोडमहाकुंभ क्षेत्रात दहाहून अधिक ‘खोया-पाया’ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. ही प्रामुख्याने महाकुंभातील विविध सेक्टर तसेच संगम, झुंसी, अरैल घाट, फाफामऊ, प्रयागराज रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात आहेत. ही केंद्र संगणकीकृत आहेत. तेथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित फेस रेकग्निशन सिस्टम, मशीन लर्निंगचादेखील वापर करण्यात येत आहे. सर्व केंद्र एकमेकांशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे हरविलेल्या व्यक्तीला शोधणे सोपे होत असल्याची माहिती केंद्राचे सल्लागार विनयकुमार दुबे यांनी ‘लोकमत’ला दिली.

विविध भाषांमध्ये होते अनाउन्समेन्ट‘खोया-पाया’ केंद्रामध्ये देशाच्या विविध भागांतील नागरिक हरविल्याच्या तक्रारी येत आहेत. काहींना हिंदी नीट पद्धतीने समजत नाही. अशा लोकांसाठी मराठी, तेलुगू, गुजराती अशा विविध भाषांमध्येदेखील उद्घोषणा करण्यात येत आहे. हरविलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी कुठल्या जागेवर यावे याची माहितीदेखील देण्यात येते. तसेच जागोजागी लागलेल्या एलईडी स्क्रीन्सवर फोटोदेखील ‘डिस्प्ले’ करण्यात येतात. तसेच सोशल माध्यमांचादेखील उपयोग करण्यात येत आहे.

कुटुंबीयांना दिला जातोय ‘आधार’विशेष म्हणजे या ‘खोया-पाया’ केंद्रांवर हरविलेला व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबीयांना आधारदेखील दिला जातो. त्यांच्या तात्पुरत्या निवासाचीदेखील सोय करण्यात आली आहे. महिलांसाठीदेखील वेगळी सोय करण्यात आली आहे.

हरविणाऱ्यांमध्ये ‘बीपीएल’ नागरिकांचे प्रमाण जास्तमहाकुंभात येणाऱ्या बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन्स किंवा साधा मोबाइल फोन तरी आहे. मात्र गरीब लोकांकडे असे चित्र नसते. त्यामुळे बेपत्ता झाल्यावर ते लगेच शोध घेऊ शकत नाहीत. शिवाय शिक्षण नसल्याने अनेकांना ओळखीच्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांकदेखील लक्षात नसतो. अशा लोकांकडे फोटोदेखील नसल्याने ‘फेस रिकग्निशन कॅमेरे’देखील कामात येत नाहीत, अशी माहिती इन्टिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे इन्चार्ज व आयपीएस अधिकारी अमित कुमार यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :Prayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळा