शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

१०० टक्के सफाईचा फोल दावा : कोट्यवधी खर्चुनही नद्या अस्वच्छच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:43 IST

मनपाचा दावा फोल : पावसाळ्यात नदीकाठच्या लोकांचे जीवन धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नदी स्वच्छतेच्या नावावर गेल्या ५ वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च झाले आहे. तरीही नद्या अस्वच्छच आहेत. यावर्षीही नदी सफाईवर सव्वाकोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने शहरातील तीनही नद्या १०० टक्के स्वच्छ झाल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र मनपाचा दावा फोल ठरतोय.

२०२० ते २०२४ या पाच वर्षांत नदी स्वच्छतेवर ५.६५ कोटी रुपये खर्च झाले. नद्यांची सफाई न केल्यास पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. त्यात नदी-नाल्यांच्या संरक्षण भिंती तुटल्या होत्या. त्या संरक्षण भिंती अजूनही उभ्या झाल्या नाहीत. त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना नद्यांच्या काठावर राहणाऱ्यांच्या जीवनाला धोका आहे.

शहरातून वाहणाऱ्या नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीची लांबी ४९.१७ आहे. मनपा प्रशासनाचा दावा आहे की, तीनही नद्यांची १०० टक्के सफाई झाली आहे. सफाईच्या नावावर नदीच्या पात्रातील माती काढून काठावर सोडून दिली आहे. नद्यांमध्ये अजूनही जलपर्णी व कचरा दिसून येत आहे. काही ठिकाणी वरवरच स्वच्छता केल्याचेही स्पष्ट दिसत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत आरोप केला होता की, मेट्रो रिजनअंतर्गत असलेल्या नद्यांच्या भागाची सफाई झालेली नाही. ३० जूनपर्यंत सफाईचे काम पूर्ण करावे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, नद्यांची १०० टक्के सफाई झालेली नाही. तरीही मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दावा केला की, नद्यांची सफाई पूर्ण झाली आहे. 

नदी स्वच्छतेला लोकसहभागातून झाली होती सुरुवात२०१३ मध्ये महापौर अनिल सोले यांनी नदी सफाईची संकल्पना लोकसहभागातून मांडली होती. दोन वर्षे या संकल्पनेतून नदीची सफाई झाली. त्यानंतर मात्र कंपनी व ठेकेदारांकडून यंत्रणा उपलब्ध झाली नाही. परिणामी महापालिकेने बजेटमध्ये नदी स्वच्छतेसाठी विशेष तरतूद केली. तेव्हापासून या तरतुदीअंतर्गत सफाई केली जात आहे.

'लोकमत'ने केली पोलखोलमहापालिकेने न्यायालयांमध्ये शहरातील नद्या ९५ ते १०० टक्के स्वच्छ झाल्याचा दावा केला होता. मनपाच्या दाव्यानुसार 'लोकमत'ने शहरातील नद्यांच्या अवस्थेवर मालिका प्रसिद्ध केली. या वृत्तांमधून प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली.

टॅग्स :nagpurनागपूरriverनदी