शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:30 PM

नागपूर शहर हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित होत असून गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

ठळक मुद्देसदर उड्डाण पुलाचे लोकार्पण, वाहतूक कोडींतून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पायाभूत सुविधांच्या विकासासोबत रस्ते, रेल्वे, मेट्रो उड्डाणपूल जागतिक दर्जाचे विमानतळ तसेच विविध शैक्षणिक सुविधांच्या विकासामुळे नागपूर शहर हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित होत असून गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

लिबर्टी टॉकीज ते जुना काटोल नाका चौक व प्रादेशिक मानसिक रुग्णालय या दरम्यान असलेल्या सदर उड्डाणपुलाचे लोकार्पण शुकवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र्र फडणवीस, महापौर संदीप जोशी, खा. डॉ.विकास महात्मे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.जोगेंद्र कवाडे, आ. प्रा.अनिल सोले, आ. गिरीश व्यास,आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार सुधाकर देशमुख उपस्थित होते.नितीन गडकरी यांनी यावेळी गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार आणि मागच्या भाजपच्या राज्य सरकारने नागपूर व विदर्भात केलेल्या व सुरू असलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून सांगितला. मागील पाच वर्षात तब्बल ७० ते ७५ हजार कोटी रुपयांची विकास कामे झाली अजूनही सुरू आहेत कामाची ही गती अशीच सुरू राहील. नागपूर शहर प्रदूषणमुक्त व अपघातमुक्त बनविण्याचा प्रयत्न असून यासाठी वाहतूक व दळणवळण यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. शहरातील ५० हजार युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न असून, यासाठी माहिती व तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रातील उद्योग येथे सुरु झाले आहेत. नागपूर मेट्रोचे काम लवकरच पूर्ण होईल, तसेच दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात होईल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. 
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना राजकीय चिमटा काढला. ते म्हणाले. पूर्वी एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन एक सरकार करायचे. त्यानंतर दोन-तीन सरकार झाल्यावर त्या प्रकल्पाचे उद्घाटन होत असे. परंतु नितीन गडकरी यांनी ज्या-ज्या कामांचे भूमिपूजन केले, त्याचे उद्घाटनही तेच करताहेत. त्यांच्यामुळेच आज नागपूर शहराचे चित्र पालटले आहे.प्रास्ताविक नरेश वडेट्टीवार यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. किशोर जिचकार यांनी आभार मानले.वाहतुकीची कोंडी सुटणारसदर ते मानकापूर आणि काटोल रोडला जोडणाºया ३.९८ किलोमिटर लांबीच्या उड्डाणपुलामुळे सदरयेथील वाहतुकीची मोठी कोंडी सुटणार आहे. हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग ४७ वर असून २४ महिन्याच्या कालावधीत पूर्ण झाला आहे. हा उड्डाण पूल लिबर्टी सिनेमा ते मानकापूर चौक तसेच लिबर्टी सिनेमा ते जुना काटोल नाका चौकापर्यंत असल्यामुळे या मार्गातील वाहतूक सुरळीत होणार आहे. यावर २१८.११ कोटी रूपये खर्च आला आहे.सिग्नल व्यवस्था आणखी मजबूत करणारगडकरी यांनी सांगितले की, त्यांनी या उड्डाणपुलाचे निरीक्षण केले. तव्हा या उड्डाणपुलावर रिजर्व्ह बँक चौकात उतरायच्या पॉइंटवर अघताची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या सूचना मागवल्या जात असून त्यांच्यानुसार वाहतूक सिग्नल व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल.मेट्रो रेल्वेचा होणार विस्तारगडकरी यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वेचा विस्तार आणखी वाढवून पारडीच्या पुढे आणि वर्धा रोडवर मिहानपुढे बुटीबोरीपर्यंत नेले जाईल. यासोबतच ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत रामटेक-बडनेरा, सावनेरसह नागभिड आणि इतर परिसरालाही जोडून पूर्व विदर्भाला जोडण्याची योजना आहे.पालकमंत्री- गृहमंत्री गैरहजरसदर उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या शासकीय निमंत्रण पत्रिकेमध्ये नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनी केदार यांच्यासह पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांचेही नाव होते. परंतु हे सर्व कार्यक्रमात गैरहजर होते, असे असले तरी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या पीआरपीचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे मात्र उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर