शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तर नागपूर शहरासाठी कन्हानमधून अतिरिक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 20:22 IST

अपुरा पाऊस आणि पेंच जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे उपलब्ध जलसाठ्यानुसार नागपूर शहरासाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पाणी आरक्षणात करण्यात आलेली कपात विचारात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य उपाययोजना राबविण्याला सुरुवात केली आहे. आरक्षित कोट्यावरील भार कमी करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण कें द्रातून अधिक क्षमतेने पाणी उपसण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे.

ठळक मुद्देसंभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनामनपा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ४० ते ५० एमएलडीने वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपुरा पाऊस आणि पेंच जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे उपलब्ध जलसाठ्यानुसार नागपूर शहरासाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पाणी आरक्षणात करण्यात आलेली कपात विचारात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य उपाययोजना राबविण्याला सुरुवात केली आहे. आरक्षित कोट्यावरील भार कमी करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण कें द्रातून अधिक क्षमतेने पाणी उपसण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे.कन्हान जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता दररोज २५० एमएलडी आहे. परंतु पूर्ण क्षमतेने पाणी उचलले जात नाही. सध्या येथून १९० एमएलडी पाणी उचलले जाते. केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी नवीन पाईपलाईनची जोडणी केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे यांनी दिली. संभाव्य जलसंकट लक्षात घेता पिण्याचा पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने करा, सोबतच नवीन जलस्रोत निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिले होते. त्यानुसार जलप्रदाय विभाग कामाला लागला आहे. पाणी बचतीसोबतच बोअरवेल, सार्वजनिक विहिरीतील पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.पेंच प्रकल्पांतर्गत असलेल्या तीन धरणांमध्ये महापालिकेसाठी दरवर्षी १९० दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवले जात होते. परंतु यावर्षी धरणात केवळ २८३.६६८ दश लक्ष घन मीटर म्हणजे २२.४८ टक्के साठा उपलब्ध असल्याने महापालिकेचे आरक्षण १५५ दलघमी करण्यात आले आहे.नागपूर शहरासाठी पेंच जलाशयातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा बघता कन्हानमधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची व्यवस्था करणे तसेच कन्हान-कोलार नदीवर प्रकल्प बांधून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पर्याय म्हणून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.सार्वजनिक ५४३ विहिरींचा वापर करणारउन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेता शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. शहरात ७८४ सार्वजनिक विहिरी आहेत. यातील ५४३ वापरण्यायोग्य आहेत. यातील ४२५ विहिरींची स्वच्छता करण्याचे प्रस्ताव आले होते. यातील ३४३ विहिरींची सफाई करण्यात आली आहे. १०१ विहिरींवर मोटरपंप लावण्याचे प्रस्ताव आले होते. यातील ५२ विहिरीवल पंप लावण्यात आले. उर्वरित विहिरीवर लवकरच पंप बविण्यात येणार आहेत.३४७ बोअरवेल खोदण्याचे प्रस्तावितगेल्या वर्षी नागपूर शहरासाठी ९ कोटी ४२ लाखांचा पाणीटंचाई कृ ती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ३४७ विंधन विहिरी(बोअरवेल) प्रस्तावित होत्या. मात्र हा प्रस्ताव कार्यान्वित झाला नव्हता. यावर्षी परिस्थिती बिकट असल्याने या बोअरवेलची कामे हाती घेतली जाणार आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. शासनाकडून यासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे.

टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका