शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

तर नागपूर शहरासाठी कन्हानमधून अतिरिक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 20:22 IST

अपुरा पाऊस आणि पेंच जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे उपलब्ध जलसाठ्यानुसार नागपूर शहरासाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पाणी आरक्षणात करण्यात आलेली कपात विचारात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य उपाययोजना राबविण्याला सुरुवात केली आहे. आरक्षित कोट्यावरील भार कमी करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण कें द्रातून अधिक क्षमतेने पाणी उपसण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे.

ठळक मुद्देसंभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनामनपा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ४० ते ५० एमएलडीने वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपुरा पाऊस आणि पेंच जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे उपलब्ध जलसाठ्यानुसार नागपूर शहरासाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पाणी आरक्षणात करण्यात आलेली कपात विचारात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य उपाययोजना राबविण्याला सुरुवात केली आहे. आरक्षित कोट्यावरील भार कमी करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण कें द्रातून अधिक क्षमतेने पाणी उपसण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे.कन्हान जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता दररोज २५० एमएलडी आहे. परंतु पूर्ण क्षमतेने पाणी उचलले जात नाही. सध्या येथून १९० एमएलडी पाणी उचलले जाते. केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी नवीन पाईपलाईनची जोडणी केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे यांनी दिली. संभाव्य जलसंकट लक्षात घेता पिण्याचा पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने करा, सोबतच नवीन जलस्रोत निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिले होते. त्यानुसार जलप्रदाय विभाग कामाला लागला आहे. पाणी बचतीसोबतच बोअरवेल, सार्वजनिक विहिरीतील पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.पेंच प्रकल्पांतर्गत असलेल्या तीन धरणांमध्ये महापालिकेसाठी दरवर्षी १९० दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवले जात होते. परंतु यावर्षी धरणात केवळ २८३.६६८ दश लक्ष घन मीटर म्हणजे २२.४८ टक्के साठा उपलब्ध असल्याने महापालिकेचे आरक्षण १५५ दलघमी करण्यात आले आहे.नागपूर शहरासाठी पेंच जलाशयातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा बघता कन्हानमधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची व्यवस्था करणे तसेच कन्हान-कोलार नदीवर प्रकल्प बांधून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पर्याय म्हणून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.सार्वजनिक ५४३ विहिरींचा वापर करणारउन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेता शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. शहरात ७८४ सार्वजनिक विहिरी आहेत. यातील ५४३ वापरण्यायोग्य आहेत. यातील ४२५ विहिरींची स्वच्छता करण्याचे प्रस्ताव आले होते. यातील ३४३ विहिरींची सफाई करण्यात आली आहे. १०१ विहिरींवर मोटरपंप लावण्याचे प्रस्ताव आले होते. यातील ५२ विहिरीवल पंप लावण्यात आले. उर्वरित विहिरीवर लवकरच पंप बविण्यात येणार आहेत.३४७ बोअरवेल खोदण्याचे प्रस्तावितगेल्या वर्षी नागपूर शहरासाठी ९ कोटी ४२ लाखांचा पाणीटंचाई कृ ती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ३४७ विंधन विहिरी(बोअरवेल) प्रस्तावित होत्या. मात्र हा प्रस्ताव कार्यान्वित झाला नव्हता. यावर्षी परिस्थिती बिकट असल्याने या बोअरवेलची कामे हाती घेतली जाणार आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. शासनाकडून यासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे.

टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका