शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णांकडून जादा बिल वसुली; खासगी रुग्णालये १५२, माहिती दिली फक्त २२ जणांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 08:22 IST

Nagpur News विमा असलेल्या रुग्णावर करण्यात आलेले उपचार यासंदर्भात शहरातील १५२ रुग्णालयांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत २२ रुग्णालयांनीच माहिती दिल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी शुक्रवारी ऑनलाईन मनपा सभागृहात दिली.

ठळक मुद्देसंकटकाळात मनपा प्रशासन व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. यामुळे रुग्णसंख्या कमी झाली. दररोज ४०० मृत्यूचा दावा चुकीचा आहे. एप्रिल महिन्यात ७,५०० मृत्यू झाले. त्यामुळे कोविड मृत्यूचे आकडे अधिक नसल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. दिव्यांगांना स्टॉल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड रुग्णावर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी मनमानी बिल वसुली केल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मनपा प्रशासनाने २० मे रोजी यासंदर्भात खासगी रुग्णालयांना पत्र पाठवून आरक्षित ८० टक्के बेडवरील भरती रुग्ण, अनारक्षित २० टक्के बेड व विमा असलेल्या रुग्णावर करण्यात आलेले उपचार यासंदर्भात शहरातील १५२ रुग्णालयांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु रुग्णालयांनी याला विरोध दर्शविला. प्रकरण न्यायालयात गेले. आतापर्यंत २२ रुग्णालयांनीच माहिती दिल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी शुक्रवारी ऑनलाईन मनपा सभागृहात दिली.

काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी कोविड रुग्णालयाच्या मनमानी कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. ८० टक्के बेडवर भरती रुग्णांकडून जादा बिल वसूल केल्याच्या तक्रारींची माहिती देण्याची मागणी केली. तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांना मनपाने रामभरोसे सोडल्याचा आरोप केला. प्रवीण दटके यांनीही बिलाचा प्रश्न उपस्थित केला. खासगी रुग्णालयाकडून माहिती देण्याला टाळाटाळ केली जात आहे. परंतु न्यायालयाने रुग्णालयांना माहिती देण्याचे निर्देश दिले आहे. लवकरच माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती जलज शर्मा यांनी दिली.

कचरा संकलन, पाच सदस्यीय समिती गठित

कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांच्या मनमानीचा प्रश्न विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्थगनच्या माध्यमातून उपस्थित केला. यावर महापौरांनी चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्याची घोषणा केली. कचरा संकलन करणाऱ्या कंपन्या माती मिसळून वजन वाढवीत असल्याचा आरोप वनवे यांनी केला. काही भागात कचरा उचलला जात नसल्याचे निदर्शनास आणले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस