शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातदार भारत होतोय आयातदार ! सरकारी धोरणांमुळे कापसाचा उलटा प्रवास सुरू

By सुनील चरपे | Updated: February 10, 2026 13:33 IST

Nagpur : बीटी बियाण्यांमुळे सन २००४-०५ पासून भारतातील कापसाचे उत्पादन वाढायला सुरुवात झाली. २००५-०६ पर्यंत कापसाचा आयातदार असलेला भारत २००७-०८ पासून निर्यातदार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीटी बियाण्यांमुळे सन २००४-०५ पासून भारतातील कापसाचे उत्पादन वाढायला सुरुवात झाली. २००५-०६ पर्यंत कापसाचा आयातदार असलेला भारत २००७-०८ पासून निर्यातदार झाला. सन २०२३-२४ मध्ये भारताने सर्वाधिक म्हणजे ११८.८१ लाख गाठी कापूस निर्यात केला. सन २०२२-२३ पासून कापसाची निर्यात कमी व आयात वाढत आहे. सरकारी धोरणांमुळे कापसाला खर्च भरून निघेल एवढाही दर मिळत नसल्याने पेरणी क्षेत्र व उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे.

सुरुवातीला देशात कापसाचे पेरणी क्षेत्र सरासरी ४४ ते ६५ लाख हेक्टर होते, ते सन १९९० च्या दशकात ८५ लाख, २००० च्या दशकात १०० लाख तर सन २०१० नंतर १२५ ते १३४.७७ लाख हेक्टरपर्यंत कापसाचे पेरणी क्षेत्र वाढत गेले. हेक्टरवर कापसाची पेरणी केली जायची. सन १९७० पर्यंत कापसाचे सरळवाण तर त्यानंतर हायब्रीड तसेच २००२ पासून हायब्रीड बीटी वाण वापरायला सुरुवात झाली. पेरणी क्षेत्रासोबत देशातील कापसाचे उत्पादनही वाढत गेले.

सन १९४७ ते १९७० पर्यंत देशातील कापसाचे उत्पादन ४४.२४ ते ५६.६४ लाख गाठींपर्यंत होते. १९८० व १९९० या तीन दशकात ते ७८ ते ११७लाख गाठी आणि बीटी वाण आल्यानंतर १४० लाखांवरून ३९० लाख गाठींपर्यंत पोहोचले. पेरणी क्षेत्र वाढायला दर आणि उत्पादन वाढायला बीटी वाण कारणीभूत ठरले.

२००४-०५ पर्यंत भारताची कापूस आयात ही निर्यातीपेक्षा अधिक होती. या काळात सरासरी १२ ते २२ लाख गाठी कापसाची आयात तर ०.६० ते ९.१४ लाख गाठींची निर्यात केली जायची. २००७-०८ नंतर कापसाच्या निर्यातीत आमूलाग्र वाढ होऊन आयात ही ६.३८ ते २०.४० लाख गाठींच्या दरम्यान राहिली. २०२४-२५ पासून कापसाची आयात ४१ ते ५० लाख गाठींवर पोहोचली असून, निर्यात मात्र १८ लाख गाठींपर्यंत खाली आली आहे.

सर्वाधिक आयात व निर्यात

कापसाची सर्वाधिक ५० लाख गाठी कापसाची आयात २०२५-२६ मध्ये करण्यात आली असून, त्यात सप्टेंबरपर्यंत आणखी वाढ होणार आहे. २०१३-१४ मध्ये सर्वाधिक ११८.८१ लाख गाठींची निर्यात करण्यात आली असून, यातील ६५ टक्के कापूस चीनने खरेदी केला होता.अमेरिकेसोबतचे ट्रेड डील, २ शुल्कमुक्त आयात, वाढता खर्च, मिळणारा कमी दर व बियाण्यांच्या खालावलेल्या गुणवत्तेचा कापसाची आयात-निर्यात व उत्पादनावर परिणाम होत आहे.

कापसाचा असा आहे लेखाजोखावर्ष                              उत्पादन                   आयात                  निर्यात (लाख गाठी)१९४७ ते १९६०         ३३.३६ ते ६०.१२                    -                                -१९६० ते १९८०         ५६.६४ ते ७८.००                   -                                -१९८० ते २०००         ८०.०० ते १४०,००                   -                                -२००० ते २०१०         १४०.०० ते ३०५.००         २.३८ ते २२.१३              ०.६० ते ८८.५०२०१० ते २०२०         ३३९.०० ते ३६५.००         २.३८ ते ३०.९४             ७६.५० ते ११८.८१२०२० ते २०२५        ३५२.४८ ते ३३३.२५         ११.०३ ते २०.४०            १५.८९ ते ७७.५९

 

English
हिंदी सारांश
Web Title : India Transforming: Cotton Exporter Becomes Importer Due to Government Policies

Web Summary : India's cotton story reverses. Once an exporter, government policies now push India towards increased cotton imports, impacting production and farmer income. BT cotton initially boosted yields, but changing trade dynamics are reshaping the industry.
टॅग्स :nagpurनागपूरcottonकापूसFarmerशेतकरी