शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

नागपुरात कापूस पिकावर देशभरातील तज्ज्ञांचे मंथन

By गणेश हुड | Updated: April 5, 2024 16:56 IST

नागपूर : जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात खुल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कापसासारख्या नगदी पिकाच्या ...

नागपूर : जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात खुल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कापसासारख्या नगदी पिकाच्या  उत्पादन वाढ व्हावी. यासाठी नागपुरात अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या दोन दिवसीय वार्षिक आढावा बैठकीचे वसंतराव नाईक प्रशिक्षण संस्था (वनामती), आयोजन करण्यात आले असून देशभरातील तज्ज्ञांचे मंथन सुरू आहे.  शुक्रवारी या बैठकीचे उदघाटन करण्यात आले. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व केंद्रिय कापुस संशोधन संस्था, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत देशभरातील २१अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पासह निमशासकीय, सहकारी, खाजगी तथा सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तथा प्रगतीशील शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.  बैठकीच्या उदघाटन प्रसंगी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे  उप महानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा, सहाय्यक महनिदेशक (बियाणे) डॉ. डी. के. यादवा, सहाय्यक महनिदेशक (व्यापारी पिके) डॉ. प्रसंता दाश, केंद्रिय कापुस संशोधन संस्था, नागपुरचे निदेशक डॉ. वाय. जी. प्रसाद, कृषि वैज्ञानिक भरती बोर्ड, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष तथा अखिल भारतीय समन्वित कापुस संशोधन प्रकल्पाच्या कार्यक्रम निरीक्षण आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबईचे निदेशक डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे,यांचे विशेष उपस्थितीसह केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ तथा अखिल भारतीय समन्वित कापूस संशोधन प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. जी.टी बेहेरे, कृषी महाविद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी डॉ. डी. के. यादवा, डॉ. प्रसंता दाश, डॉ. चारुदत्त मायी, डॉ. एस. के. शुक्ला, यांनी समायोचित मार्गदर्शन केले.डॉ. डॉ. विलास खर्चे यांनी स्वागतपर भाषण केले तर डॉ. गणेश बेहरे यांनी संशोधन उपलब्धीचे सादरीकरण केले. निदेशक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी देखील आपले विचार मांडले. उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ कापूस डॉ. सुरेंद्र देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवड पद्धतिसह यांत्रिकीकरण गरजेचे : डॉ. तिलकराज शर्मा

जागतिक हवामान बदलाच्या कालखंडात खुल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी कापसासारख्या नगदी पिकाला गंभीरतेने घेणे काळाची गरज असून कपाशीच्या अधिक उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवड पद्धतिसह यांत्रिकीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे  उपमहानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा यांनी उदघाटनपर संबोधनात  केले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि अनुभवाधारित मार्गदर्शनात शर्मा  यांनी अतिशय सुस्पष्ठ आणि परखड मत प्रदर्शित करीत देशांतर्गत सध्याची पीक पद्धती आणि कृषि संशोधकांची भूमिका अधोरेखित केली. काळसुसंगत पीक वाण,  सेंद्रिय - एकात्मिक अन्नद्रव्य तथा कीड रोग व्यवस्थापन, बाजारात अधिक स्थान असणाऱ्या  तंत्रज्ञानाचे सर्वदूर प्रशिक्षणे आणि प्रात्यक्षिके, उत्पादन तंत्रज्ञानासह सेंद्रिय तथा रंगीत कापुस पिकासाठी विविध पद्धतीवर सविस्तर मार्गदर्शन केले.  या दोन दिवसांच्या संमेलनातून देशांतर्गत शेती व्यवस्थेला सक्षम तंत्रज्ञान आणि शिफारशी देता येतील असा आशावाद  त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक प्रक्रिया उद्योगाची साखळी सर्वदूर कार्यान्वित होणे गरजेचे : कुलगुरू डॉ. शरद गडाखतर सध्याच्या हवामान आणि बाजारपेठांच्या अस्थिर आणि स्पर्धेच्या परिस्थितीत शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्य करणाऱ्या संस्थांसह प्रशासकीय विभागांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी काळाची गरज ओळखून सेंद्रिय पद्धतीने कापूस लागवडीचे तंत्रज्ञान सर्वदूर प्रसारित होण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची मोट बांधण्याचे महत्वपूर्ण आवाहन शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांना केले. शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार राष्ट्रीय संस्थाच्या सहयोगातून बीटी कापून वाण उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगत विदर्भाचा विचार करता कापूस प्रक्रिया उद्योगांचे जाळे अधिक घट्ट करण्याची गरज देखील त्यांनी अधोरेखित केली.

टॅग्स :cottonकापूसnagpurनागपूर