शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

गोकुळाष्टमीनिमित्त उपराजधानीतील बाजारात उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:16 IST

गोकुळाष्टमी सण पारंपरिकरीत्या यावर्षी शनिवारी आणि रविवारी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त बाजारात उत्साह आहे.

ठळक मुद्दे सजावटीच्या वस्तू महागल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्मसोहळ्याचा उत्सव. गोकुळाष्टमी सण पारंपरिकरीत्या यावर्षी शनिवारी आणि रविवारी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त बाजारात उत्साह आहे. मूर्तिकारांपासून ते सजावटीच्या वस्तू विक्रेत्यांमध्ये आनंद आहे. महागाईनंतरही भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.मूर्तिकार विनोद सूर्यवंशी यांनी सांगितले की, यावर्षी रंग, माती आणि वाहतुकीचे दर वाढल्यामुळे मूर्तींच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. मूर्ती आकारानुसार ५०० ते ५ हजारांपर्यंत आहेत. नागपुरात अनेकांच्या घरी परंपरेनुसार हा सण दोन, तीन आणि पाच दिवस साजरा करण्यात येतो. लोक मूर्तिकारांकडे मातीच्या मूर्तीसाठी पूर्वीच नोंदणी करतात. शनिवारी सायंकाळी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना होणार असल्यामुळे लोकांची लगबग वाढली आहे. प्रदूषण वाढविणाऱ्या पीओपी मूर्तीची विक्री प्रशासनाने बंद करावी, असे सूर्यवंशी म्हणाले.सजावटीच्या वस्तूंचे विक्रेते श्रीधर शास्त्रकार म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तीच्या सजावटीच्या वैविध्यपूर्ण वस्तू बाजारात आल्या आहेत. शिवाय दरही वाढले आहेत. १० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. सण साजरा करणारा सामान्य माणूस जुन्याच वस्तूने सजावट करीत असल्यामुळे तो नवीन वस्तू फार कमी खरेदी करतो. यावर्षी बाजारात चीनच्या वस्तूंची रेलचेल आहे. या वस्तू स्वस्त आणि दिसायला सुंदर आहेत.महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, तुलनात्मकरीत्या यावर्षी पूजेच्या फुलांच्या किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक येथील फुले मुंबई आणि नागपुरात विक्रीसाठी जातात. पण या ठिकाणी यावर्षी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे फुलांच्या उत्पादनांवर परिणाम झाला आहे. याशिवाय विदर्भात पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे लागवडही उशिरा झाली. त्यामुळे उत्पादन गणेशोत्सवानंतर येण्याची अपेक्षा आहे. बाजारात अन्य जिल्ह्यातून आणि काही स्थानिक उत्पादकांकडून कमी आवक आहे. लाल व पिवळ्या झेंडूची फुले ८० ते १२० रुपये किलो, हैदराबादी लाल गुलाब १५० ते २०० रुपये किलो, निशिगंधा २०० ते ३०० रुपये, जाईजुई ५०० ते ७०० रुपये किलो आहे. पूजेसाठी या फुलांना जास्त मागणी आहे.रणनवरे म्हणाले, समारंभात कृत्रिम फुलांची सजावट करण्यात येत असल्यामुळे कट फ्लॉवरची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कारागीर बेकार झाले आहेत. शासनाने यावर प्रतिबंध आणावा. असोसिएशनने याची तक्रार प्रदूषण मंडळाकडे केली आहे.

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमी