शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा विद्यार्थी अन् शाळांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST

कोराडी/पारशिवनी/कळमेश्वर/रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी शाळांना सुरुवात झाली. मात्र शाळेचे सत्र नियमित सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, ...

कोराडी/पारशिवनी/कळमेश्वर/रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी शाळांना सुरुवात झाली. मात्र शाळेचे सत्र नियमित सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाला अधिक सजग राहावे लागणार आहे. शाळेत कुणालाही कोरोनाची लागण होणार नाही, यासाठी प्रत्येकाचे प्रबोधन आवश्यक आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर कोरोनाचे संक्रमण टाळण्यात महत्त्वाची भूमिका वठवितात. ही सवय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंगवळणी पाडून देण्याचे काम शिक्षकांना करावयाचे आहे. ग्रामीण भागात आजही अनेक गावात मास्कचा वापर होत नसल्याचे चित्र आहे.

कामठी तालुक्यातील महादुला व कोराडी परिसरातील सर्व शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळात १० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ९०० पैकी २०० विद्यार्थी तर सरस्वती भवन्स कॉन्व्हेंटमध्ये १४२ पैकी ६०, प्रागतिक विद्यालयात ९४० पैकी ६० विद्यार्थी, विद्यामंदिर हायस्कूल येथे ६६७ पैकी ७२ विद्यार्थी, पद्मश्री स्मिता पाटील विद्यालयात ९१ पैकी १२ विद्यार्थी, तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७७७ पैकी १२३, सेवानंद विद्यालयात १४७ पैकी १५ तर भांगे पब्लिक स्कूलमध्ये ५७ पैकी १० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून आली. केसरीमल पालीवाल विद्यालयात मुख्याध्यापिका प्रभावती कोलते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे व त्यांच्या चमूने तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. यासोबतच मौदा तालुक्यातील अरोली येथील समर्थ रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक त्या उपाययोजना करीत वर्ग सुरू करण्यात आले. प्राचार्या नंदा कुंभलकर, संस्थाध्यक्ष शिवाजीराव कुंभलकर यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना केल्या.

न.प. शाळाही दक्ष

कळमेश्वर तालुक्यात नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला आजपासून सुरुवात झाली. सोमवारी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आले होते. उद्या इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले आहे. येथे दिवसाआड दोन वर्ग राहणार आहे. या शाळेतील दहावीतील २५६ विद्यार्थ्यांपैकी ८३ विद्यार्थी उपस्थित होते तर बारावीच्या २२९ पैकी ७७ विद्यार्थी उपस्थित होते.