शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

परीक्षा विद्यार्थी अन् शाळांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST

कोराडी/पारशिवनी/कळमेश्वर/रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी शाळांना सुरुवात झाली. मात्र शाळेचे सत्र नियमित सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, ...

कोराडी/पारशिवनी/कळमेश्वर/रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी शाळांना सुरुवात झाली. मात्र शाळेचे सत्र नियमित सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाला अधिक सजग राहावे लागणार आहे. शाळेत कुणालाही कोरोनाची लागण होणार नाही, यासाठी प्रत्येकाचे प्रबोधन आवश्यक आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर कोरोनाचे संक्रमण टाळण्यात महत्त्वाची भूमिका वठवितात. ही सवय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंगवळणी पाडून देण्याचे काम शिक्षकांना करावयाचे आहे. ग्रामीण भागात आजही अनेक गावात मास्कचा वापर होत नसल्याचे चित्र आहे.

कामठी तालुक्यातील महादुला व कोराडी परिसरातील सर्व शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळात १० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ९०० पैकी २०० विद्यार्थी तर सरस्वती भवन्स कॉन्व्हेंटमध्ये १४२ पैकी ६०, प्रागतिक विद्यालयात ९४० पैकी ६० विद्यार्थी, विद्यामंदिर हायस्कूल येथे ६६७ पैकी ७२ विद्यार्थी, पद्मश्री स्मिता पाटील विद्यालयात ९१ पैकी १२ विद्यार्थी, तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७७७ पैकी १२३, सेवानंद विद्यालयात १४७ पैकी १५ तर भांगे पब्लिक स्कूलमध्ये ५७ पैकी १० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून आली. केसरीमल पालीवाल विद्यालयात मुख्याध्यापिका प्रभावती कोलते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे व त्यांच्या चमूने तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. यासोबतच मौदा तालुक्यातील अरोली येथील समर्थ रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक त्या उपाययोजना करीत वर्ग सुरू करण्यात आले. प्राचार्या नंदा कुंभलकर, संस्थाध्यक्ष शिवाजीराव कुंभलकर यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना केल्या.

न.प. शाळाही दक्ष

कळमेश्वर तालुक्यात नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला आजपासून सुरुवात झाली. सोमवारी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आले होते. उद्या इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले आहे. येथे दिवसाआड दोन वर्ग राहणार आहे. या शाळेतील दहावीतील २५६ विद्यार्थ्यांपैकी ८३ विद्यार्थी उपस्थित होते तर बारावीच्या २२९ पैकी ७७ विद्यार्थी उपस्थित होते.