शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

परीक्षा विद्यार्थी अन् शाळांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST

कोराडी/पारशिवनी/कळमेश्वर/रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी शाळांना सुरुवात झाली. मात्र शाळेचे सत्र नियमित सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, ...

कोराडी/पारशिवनी/कळमेश्वर/रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी शाळांना सुरुवात झाली. मात्र शाळेचे सत्र नियमित सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाला अधिक सजग राहावे लागणार आहे. शाळेत कुणालाही कोरोनाची लागण होणार नाही, यासाठी प्रत्येकाचे प्रबोधन आवश्यक आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर कोरोनाचे संक्रमण टाळण्यात महत्त्वाची भूमिका वठवितात. ही सवय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंगवळणी पाडून देण्याचे काम शिक्षकांना करावयाचे आहे. ग्रामीण भागात आजही अनेक गावात मास्कचा वापर होत नसल्याचे चित्र आहे.

कामठी तालुक्यातील महादुला व कोराडी परिसरातील सर्व शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळात १० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ९०० पैकी २०० विद्यार्थी तर सरस्वती भवन्स कॉन्व्हेंटमध्ये १४२ पैकी ६०, प्रागतिक विद्यालयात ९४० पैकी ६० विद्यार्थी, विद्यामंदिर हायस्कूल येथे ६६७ पैकी ७२ विद्यार्थी, पद्मश्री स्मिता पाटील विद्यालयात ९१ पैकी १२ विद्यार्थी, तेजस्विनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७७७ पैकी १२३, सेवानंद विद्यालयात १४७ पैकी १५ तर भांगे पब्लिक स्कूलमध्ये ५७ पैकी १० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून आली. केसरीमल पालीवाल विद्यालयात मुख्याध्यापिका प्रभावती कोलते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे व त्यांच्या चमूने तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. यासोबतच मौदा तालुक्यातील अरोली येथील समर्थ रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक त्या उपाययोजना करीत वर्ग सुरू करण्यात आले. प्राचार्या नंदा कुंभलकर, संस्थाध्यक्ष शिवाजीराव कुंभलकर यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना केल्या.

न.प. शाळाही दक्ष

कळमेश्वर तालुक्यात नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला आजपासून सुरुवात झाली. सोमवारी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात आले होते. उद्या इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले आहे. येथे दिवसाआड दोन वर्ग राहणार आहे. या शाळेतील दहावीतील २५६ विद्यार्थ्यांपैकी ८३ विद्यार्थी उपस्थित होते तर बारावीच्या २२९ पैकी ७७ विद्यार्थी उपस्थित होते.