शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

प्रत्येक पाकिस्तानीला भारत सोडावाच लागेल : महसूलमंत्री बावनकुळे

By कमलेश वानखेडे | Updated: April 26, 2025 14:33 IST

Nagpur : महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे समर्थन

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्यासाठी केंद्र सरकारने डेडलाईन दिलेली आहे. त्यांना भारत देश सोडावाच लागेल. जो आश्रय या देशात मिळतो तो मिळू नये. या देशात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणे चालणार नाही. जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा इकडे फटाके फोडतात, अशी ही वृत्ती मोडून काढली पाहिजे, पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतात पाकिस्तानचे झेंडे फडकवणे हे भारताला मान्य नाही, म्हणून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान के लोक चले जाव ची भूमिका घेतली ती योग्य आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

बावनकुळे शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांनी अशी वक्तव्य करू नये. ज्यांच्या घरी जीव गेला त्यांच्याशी भेट घ्यावी. एवढा मोठा राष्ट्रावर आघात झाला आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्या तेव्हा त्या कुटुंबाला काय विचारलं, हे पहावं, एकातरी कुटुंबियांशी शरद पवार हे भेटले आहेत का, त्यांना विचारले का काय झाले म्हणून, मतांच्या लांगूलचालनाकरिता शरद पवारांनी अशी वक्तव्य करू नये, असे परखड मत बावनकुळे यांनी मांडले.

राज-उद्धव युतीचा आम्हाला काही प्रश्न नाहीराज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जर त्यांची युती केली, तर तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची माफी मागावीराहुल गांधी जेव्हा सावरकरांविषयी बोलतात त्या उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला. आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारतात. आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर राहुल गांधींचे डोकं ठिकाणावर आले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय, हे त्यांना कळले पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

महामंडळ व समित्यांवर दोन महिन्यात नियुक्त्याया महिन्यात आमचे जिल्हाध्यक्ष, १२८० मंडळ घटित होतील. राज्य सरकारचे १०८ महामंडळ, ७६५ अशासकीय सदस्य, वेगवेगळ्या महामंडळावर जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कमिटी यावर महायुतीतील तीन ते पाच हजार कार्यकर्ते मे व जून या दोन महिन्यात विविध पदावर येऊ शकतात यासाठी महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकारी एकत्र बसून या दोन महिन्यात सर्व शासकीय समित्या महामंडळ केंद्रीय भाजपच्या परवानगीने करणार आहोत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर