शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रत्येक पाकिस्तानीला भारत सोडावाच लागेल : महसूलमंत्री बावनकुळे

By कमलेश वानखेडे | Updated: April 26, 2025 14:33 IST

Nagpur : महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे समर्थन

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्यासाठी केंद्र सरकारने डेडलाईन दिलेली आहे. त्यांना भारत देश सोडावाच लागेल. जो आश्रय या देशात मिळतो तो मिळू नये. या देशात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणे चालणार नाही. जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा इकडे फटाके फोडतात, अशी ही वृत्ती मोडून काढली पाहिजे, पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतात पाकिस्तानचे झेंडे फडकवणे हे भारताला मान्य नाही, म्हणून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान के लोक चले जाव ची भूमिका घेतली ती योग्य आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

बावनकुळे शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांनी अशी वक्तव्य करू नये. ज्यांच्या घरी जीव गेला त्यांच्याशी भेट घ्यावी. एवढा मोठा राष्ट्रावर आघात झाला आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्या तेव्हा त्या कुटुंबाला काय विचारलं, हे पहावं, एकातरी कुटुंबियांशी शरद पवार हे भेटले आहेत का, त्यांना विचारले का काय झाले म्हणून, मतांच्या लांगूलचालनाकरिता शरद पवारांनी अशी वक्तव्य करू नये, असे परखड मत बावनकुळे यांनी मांडले.

राज-उद्धव युतीचा आम्हाला काही प्रश्न नाहीराज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जर त्यांची युती केली, तर तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची माफी मागावीराहुल गांधी जेव्हा सावरकरांविषयी बोलतात त्या उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला. आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारतात. आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर राहुल गांधींचे डोकं ठिकाणावर आले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय, हे त्यांना कळले पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

महामंडळ व समित्यांवर दोन महिन्यात नियुक्त्याया महिन्यात आमचे जिल्हाध्यक्ष, १२८० मंडळ घटित होतील. राज्य सरकारचे १०८ महामंडळ, ७६५ अशासकीय सदस्य, वेगवेगळ्या महामंडळावर जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कमिटी यावर महायुतीतील तीन ते पाच हजार कार्यकर्ते मे व जून या दोन महिन्यात विविध पदावर येऊ शकतात यासाठी महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकारी एकत्र बसून या दोन महिन्यात सर्व शासकीय समित्या महामंडळ केंद्रीय भाजपच्या परवानगीने करणार आहोत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर