शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठा विद्यार्थीं परदेशात शिक्षणास जाणार तरी कधी?, अटी व शर्तीमुळे ५० टक्के विद्यार्थी मुकणार

By आनंद डेकाटे | Updated: October 13, 2023 14:27 IST

अंतिम यादी अद्याप लागलेली नाही

नागपूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली. परंतु ही योजना आठ महिने मंत्रालयातच धुळखात पडली. नंतर राज्याशासनाचे परिपत्र निघायलाच उशीर झाला. अर्ज प्रक्रियेसाठी सारथीने महिनाभराचा कालावधी घेतला. परदेशातील विद्यापीठे सुरू झाली आहेत. परंतु शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्यांची अंतिम यादी मात्र अजुनही लागलेली नाही. तेव्हा मराठा समाजातील विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणार तरी कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही, हीच बाब लक्षात घेता या समाजातील विद्यार्थ्यांची अडचण सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून “क्यू-एस वर्ल्ड रँकिंग” मध्ये २०० च्या आत मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमधील विविध कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अंतर्गत दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. योजनेसाठी पहिल्या वर्षासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.

सुरुवातीला ही योजनाच मंत्रालयात आठ महिने धुळखात पडली होती. नंतर जी.आर. काढायला उशीर झाला. आता सारथीकडून प्रक्रिया राबविण्यात उशीर होत आहे. अंतिम यादी अजुनही लागलेली नाही. यातच ७५ जागांसाठी केवळ ८५ अर्ज आले आहेत. योजनेनुसार पदवीला ७५ टक्के मार्क्स, परदेशातील प्रवेशाची सर्व रक्कम विद्यार्थ्यांनी भरलेली असावी. शैक्षणिक शुल्क ३० लाख रूपयापर्यंत मर्यादित आहेत. या अटीमुळे ५० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

एकीकडे एससी, ओबीसी सारखी योजना सुरू केल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे जाचक अटी घालून द्यायचे. असा हा प्रकार आहे. योजना सुरु केली मात्र ती राबविताना पाहिजे तशी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही. जणजागृतीचा अभावुद्धा आहे. सारथीचा एकुणच भोंगळ कारभार असल्याचे दिसून येते.

- अॅड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टूडंट हेल्पींग हँड्स

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी