शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मराठा विद्यार्थीं परदेशात शिक्षणास जाणार तरी कधी?, अटी व शर्तीमुळे ५० टक्के विद्यार्थी मुकणार

By आनंद डेकाटे | Updated: October 13, 2023 14:27 IST

अंतिम यादी अद्याप लागलेली नाही

नागपूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली. परंतु ही योजना आठ महिने मंत्रालयातच धुळखात पडली. नंतर राज्याशासनाचे परिपत्र निघायलाच उशीर झाला. अर्ज प्रक्रियेसाठी सारथीने महिनाभराचा कालावधी घेतला. परदेशातील विद्यापीठे सुरू झाली आहेत. परंतु शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्यांची अंतिम यादी मात्र अजुनही लागलेली नाही. तेव्हा मराठा समाजातील विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणार तरी कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही, हीच बाब लक्षात घेता या समाजातील विद्यार्थ्यांची अडचण सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून “क्यू-एस वर्ल्ड रँकिंग” मध्ये २०० च्या आत मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमधील विविध कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अंतर्गत दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. योजनेसाठी पहिल्या वर्षासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.

सुरुवातीला ही योजनाच मंत्रालयात आठ महिने धुळखात पडली होती. नंतर जी.आर. काढायला उशीर झाला. आता सारथीकडून प्रक्रिया राबविण्यात उशीर होत आहे. अंतिम यादी अजुनही लागलेली नाही. यातच ७५ जागांसाठी केवळ ८५ अर्ज आले आहेत. योजनेनुसार पदवीला ७५ टक्के मार्क्स, परदेशातील प्रवेशाची सर्व रक्कम विद्यार्थ्यांनी भरलेली असावी. शैक्षणिक शुल्क ३० लाख रूपयापर्यंत मर्यादित आहेत. या अटीमुळे ५० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

एकीकडे एससी, ओबीसी सारखी योजना सुरू केल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे जाचक अटी घालून द्यायचे. असा हा प्रकार आहे. योजना सुरु केली मात्र ती राबविताना पाहिजे तशी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही. जणजागृतीचा अभावुद्धा आहे. सारथीचा एकुणच भोंगळ कारभार असल्याचे दिसून येते.

- अॅड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टूडंट हेल्पींग हँड्स

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी