शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
2
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
3
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
4
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
5
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
6
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
7
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
8
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
9
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
10
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
11
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
12
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
13
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
14
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
15
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
16
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
17
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
18
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
19
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
20
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
Daily Top 2Weekly Top 5

मेल्यानंतरही यातना संपेना ! नागपूर जिल्ह्यातील २०४ गावांत स्मशानभूमीच नाही; न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका केली दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:31 IST

Nagpur : पाऊस आल्यास मृतदेह पूर्णपणे जळत नाही. परिणामी, मृतदेहाचा अवमान होतो. तसेच, काही गावांतील नागरिकांना अंत्यविधीसाठी दुसऱ्या गावात जावे लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील तब्बल २०४ गावांमध्ये विकसित स्मशानभूमीच नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी ग्रामविकास विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून दहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. स्मशानभूमी नसलेल्या गावांतील मृत नागरिकांवर सध्या मोकळ्या ठिकाणी अंत्यविधी करावे लागत आहेत. दरम्यान, पाऊस आल्यास मृतदेह पूर्णपणे जळत नाही. परिणामी, मृतदेहाचा अवमान होतो. तसेच, काही गावांतील नागरिकांना अंत्यविधीसाठी दुसऱ्या गावात जावे लागते. त्यामुळे नातेवाईक व गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.

पीडित कुटुंबियांवर जास्तीचा आर्थिक भुर्दंड बसतो. गावकऱ्यांनी यासंदर्भात तहसील कार्यालयापासून जिल्हा परिषदेपर्यंत तक्रारी केल्या आहेत, पण अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. अॅड. यश वेंकटरमण यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : No crematoriums in 204 Nagpur villages; court files public interest litigation.

Web Summary : Nagpur's 204 villages lack crematoriums, forcing undignified open-air funerals. High Court intervened, issuing notices to officials. Relatives face hardship and expense due to lack of facilities.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर