शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

एकट्या ‘अदानी’ला शहरात ‘पाॅवर’ देण्यास ऊर्जा तज्ज्ञांचा विराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 07:45 IST

Nagpur News नागपूरमध्ये वीज वितरणाचे कंत्राट अदानी पाॅवरकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र ऊर्जा तज्ज्ञांनी या निर्णयाला विराेध दर्शविला आहे.

ठळक मुद्देकिमान दाेन कंपन्यांना मिळावे वीज वितरणाचे कंत्राटस्पर्धेतून ग्राहकांना मिळेल लाभ

आशिष राॅय

नागपूर : ऊर्जा मंत्रालयातर्फे नागपूरसह राज्यातील १६ शहरांमध्ये वीज वितरणाची जबाबदारी खासगी कंपन्यांना साेपविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूरमध्ये वीज वितरणाचे कंत्राट अदानी पाॅवरकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र ऊर्जा तज्ज्ञांनी या निर्णयाला विराेध दर्शविला आहे. त्यांच्या मते शासनाचा एकाधिकार खासगी कंपन्या घेऊ शकत नाहीत. एखाद्या कंपनीला एकाधिकार दिल्यास ग्राहकांना लाभ हाेणार नाही, असा दावा केला जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, माेबाईल कंपन्यांप्रमाणे वीज वितरणाची जबाबदारी तीन किंवा चार कंपन्यांकडे देणे आदर्श ठरेल, ज्यातून ग्राहक सर्वाेत्तम कंपनीची निवड करतील. किमान दाेन कंपन्या तरी असायला हव्यात. याचा अर्थ महावितरणकडून येथील जबाबदारी काढण्यात येऊ नये. अशाप्रकारची व्यवस्था मुंबई शहरात असून, येथे अदानी व टाटा पाॅवरमध्ये असलेल्या स्पर्धेतून ग्राहकांचा लाभ हाेईल.

विदर्भ इंडस्ट्रिज असाेसिएशनचे आर. जी. गाेयनका म्हणाले, खासगी कंपनीद्वारे महावितरणला बदलविणे याेग्य निर्णय ठरू शकत नाही. एकापेक्षा अधिक कंपन्या असाव्यात, जेणेकरून ग्राहक सर्वाेत्तमची निवड करतील. टेलिकाॅम क्षेत्रातील स्पर्धेमुळे ग्राहकांना लाभ मिळताे. बीएसएनएलचा एकाधिकार असलेल्या काळापेक्षा आज दर खूप कमी झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र शासनाने खासगी कंपन्यांबाबत गुजरात पॅटर्नचा स्वीकार करावा. गुजरातमध्ये सरकार विविध स्राेतांकडून वीज खरेदी करते आणि महागड्या दरात टाेरेन्ट पाॅवरला विकते, जिच्याकडे अहमदाबाद, गांधीनगर व सुरतचा वितरणाचा परवाना आहे. राज्याच्या कंपनीला शेतकऱ्यांना पुरवठा करावा लागताे, त्यामुळे स्वस्त वीज मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जर नागपूरमध्ये अदानीला एकाधिकार दिला, तर ग्राहकांना दरामध्ये फायदा मिळणार नाही. शासनाने कंपनीला कुठूनही स्वस्तात वीज खरेदी करण्याचा परवाना द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

ऊर्जा तज्ज्ञ महेंद्र जिचकार यांनीही नागपुरात एकापेक्षा अधिक कंपन्यांना वीज वितरणाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली. जर हे शक्य नसेल, तर कंपनीला महाजेनकाेकडूनच महागडी वीज खरेदी करण्याचेही बंधन नसावे. कंपनीला कुठूनही स्वस्त वीज खरेदीचा अधिकार मिळावा, जेणेकरून नागपूरकरांना स्वस्त वीज मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ए. पी. गांगुली यांच्या मते बहुकंपन्यांकडून वितरण ग्राहकांना फायदेशीर ठरते. मात्र नागपुरात एकापेक्षा अधिक खासगी कंपन्या वीज वितरणास तयार हाेतील का, हा प्रश्न आहे. शहरात माेठे उद्याेग नाहीत. कंपन्यांना समूहात माेठे ग्राहक हवे असतात, तेव्हाच एकापेक्षा अधिक कंपन्यांचा व्यवसाय मिळेल व तीन-चार कंपन्या तग धरू शकतील. हे माॅडेल मेट्राे शहरामध्ये कार्य करू शकतात, असे मत गांगुली यांनी व्यक्त केले.

टॅग्स :electricityवीज