शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

एकट्या ‘अदानी’ला शहरात ‘पाॅवर’ देण्यास ऊर्जा तज्ज्ञांचा विराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 07:45 IST

Nagpur News नागपूरमध्ये वीज वितरणाचे कंत्राट अदानी पाॅवरकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र ऊर्जा तज्ज्ञांनी या निर्णयाला विराेध दर्शविला आहे.

ठळक मुद्देकिमान दाेन कंपन्यांना मिळावे वीज वितरणाचे कंत्राटस्पर्धेतून ग्राहकांना मिळेल लाभ

आशिष राॅय

नागपूर : ऊर्जा मंत्रालयातर्फे नागपूरसह राज्यातील १६ शहरांमध्ये वीज वितरणाची जबाबदारी खासगी कंपन्यांना साेपविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूरमध्ये वीज वितरणाचे कंत्राट अदानी पाॅवरकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र ऊर्जा तज्ज्ञांनी या निर्णयाला विराेध दर्शविला आहे. त्यांच्या मते शासनाचा एकाधिकार खासगी कंपन्या घेऊ शकत नाहीत. एखाद्या कंपनीला एकाधिकार दिल्यास ग्राहकांना लाभ हाेणार नाही, असा दावा केला जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, माेबाईल कंपन्यांप्रमाणे वीज वितरणाची जबाबदारी तीन किंवा चार कंपन्यांकडे देणे आदर्श ठरेल, ज्यातून ग्राहक सर्वाेत्तम कंपनीची निवड करतील. किमान दाेन कंपन्या तरी असायला हव्यात. याचा अर्थ महावितरणकडून येथील जबाबदारी काढण्यात येऊ नये. अशाप्रकारची व्यवस्था मुंबई शहरात असून, येथे अदानी व टाटा पाॅवरमध्ये असलेल्या स्पर्धेतून ग्राहकांचा लाभ हाेईल.

विदर्भ इंडस्ट्रिज असाेसिएशनचे आर. जी. गाेयनका म्हणाले, खासगी कंपनीद्वारे महावितरणला बदलविणे याेग्य निर्णय ठरू शकत नाही. एकापेक्षा अधिक कंपन्या असाव्यात, जेणेकरून ग्राहक सर्वाेत्तमची निवड करतील. टेलिकाॅम क्षेत्रातील स्पर्धेमुळे ग्राहकांना लाभ मिळताे. बीएसएनएलचा एकाधिकार असलेल्या काळापेक्षा आज दर खूप कमी झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र शासनाने खासगी कंपन्यांबाबत गुजरात पॅटर्नचा स्वीकार करावा. गुजरातमध्ये सरकार विविध स्राेतांकडून वीज खरेदी करते आणि महागड्या दरात टाेरेन्ट पाॅवरला विकते, जिच्याकडे अहमदाबाद, गांधीनगर व सुरतचा वितरणाचा परवाना आहे. राज्याच्या कंपनीला शेतकऱ्यांना पुरवठा करावा लागताे, त्यामुळे स्वस्त वीज मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जर नागपूरमध्ये अदानीला एकाधिकार दिला, तर ग्राहकांना दरामध्ये फायदा मिळणार नाही. शासनाने कंपनीला कुठूनही स्वस्तात वीज खरेदी करण्याचा परवाना द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

ऊर्जा तज्ज्ञ महेंद्र जिचकार यांनीही नागपुरात एकापेक्षा अधिक कंपन्यांना वीज वितरणाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली. जर हे शक्य नसेल, तर कंपनीला महाजेनकाेकडूनच महागडी वीज खरेदी करण्याचेही बंधन नसावे. कंपनीला कुठूनही स्वस्त वीज खरेदीचा अधिकार मिळावा, जेणेकरून नागपूरकरांना स्वस्त वीज मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ए. पी. गांगुली यांच्या मते बहुकंपन्यांकडून वितरण ग्राहकांना फायदेशीर ठरते. मात्र नागपुरात एकापेक्षा अधिक खासगी कंपन्या वीज वितरणास तयार हाेतील का, हा प्रश्न आहे. शहरात माेठे उद्याेग नाहीत. कंपन्यांना समूहात माेठे ग्राहक हवे असतात, तेव्हाच एकापेक्षा अधिक कंपन्यांचा व्यवसाय मिळेल व तीन-चार कंपन्या तग धरू शकतील. हे माॅडेल मेट्राे शहरामध्ये कार्य करू शकतात, असे मत गांगुली यांनी व्यक्त केले.

टॅग्स :electricityवीज