शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

पोलीस दल अधिक मजबूत करण्यावर भर : पालकमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:41 AM

पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देकपिलनगर, पारडी, वाठोडा पोलीस ठाण्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तांचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे. यासाठी पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.शहरातील उत्तर नागपुरात कपिलनगर, पूर्व नागपुरात पारडी व वाठोडा या तीन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) बी.जी.गायकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) निलेश भरणे, अपर पोलीस आयुक्त, (उत्तर विभाग) शशिकांत महावरकर, पोलीस उपआयक्त निर्मलादेवी, पोलीस उपायुक्त निलोत्पल, पोलीस उपआयुक्त (डीटेक्शन)गजानन राजमाने, पोलीस उपआयुक्त, (मुख्यालय) विक्रम साळी, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, पांडुरंग मेहर, बाल्या बोरकर, नगरसेविका चेतना टांक, पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, पोलिसांना देण्यात येणाऱ्या सुविधा, निवासस्थानांचे बांधकाम, पोलीस ठाण्यांच्या इमारतीची दुरुस्ती व अन्य कारणांसाठी मागील चार वर्षात शासनाने ९०० कोटी रुपये नागपूर पोलिसांना दिले असून आजपर्यंत पोलीस विभागाला एवढा निधी कधीच मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा निधी प्राप्त होऊ शकला, असेही त्यांनी स्पष्ट केले.जरीपटका पोलीस ठाण्यावर येणारा भार कमी करण्यासाठी कपिलनगर व कळमना पोलीस ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी पारडी आणि वाठोडा अशा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या तीनही पोलीस ठाण्यांना आवश्यक तेवढे पोलीस कर्मचारी देण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अनधिकृत वस्त्यांमधील घरे नियमित करूशहराला लागून असलेल्या पण एनएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या नागरिकांच्या अनधिकृत घरांचे नियमितीकरण एनएमआरडीएमार्फत करून देण्यात येईल. नागरिकांनी याबद्दल कोणतीही काळजी करू नये. एकही घर अनधिकृत राहणार नाही याची काळजी शासन घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी गोन्हीसिम येथे बोलताना केले.पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते बहादुरा, खरबी व गोन्हीसिम या तीनही ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPolice Stationपोलीस ठाणे