शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भावनिक आरोग्यासाठी मनावर नियंत्रण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:44 IST

प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयातर्फे विश्वशांती सरोवर, जामठा येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘भावनिक आरोग्य’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्याला शारीरिक आरोग्य माहीत आहे, मात्र भावनिक आरोग्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्याचे आकलन स्वत: करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे मार्गदर्शन : विश्वशांती सरोवरात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयातर्फे विश्वशांती सरोवर, जामठा येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘भावनिक आरोग्य’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्याला शारीरिक आरोग्य माहीत आहे, मात्र भावनिक आरोग्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्याचे आकलन स्वत: करणे गरजेचे आहे. सुखी जीवनासाठी भावनिक आरोग्य सुदृढ असणेही तेवढेच आवश्यक आहे. आपल्या आत जेवढा अहंकार असेल तेवढे भावनिक आरोग्य कमी असते. अपेक्षाही भावनिक आरोग्याशी जोडल्या जाऊ शकतात. आपण विचार करतो तसेच व्हावे, ही अपेक्षा व्यर्थ आहे. आपल्या दु:खाचे कारण दुसऱ्याला मानले जाते. वर्तमान काळात थकलेल्या मनाने लोक मोठेमोठे कार्य करतात. त्यामुळे तणाव ही नित्याची गोष्ट झाली असून यामुळे भावनिक आरोग्य प्रभावित होत आहे. यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्या मनात कचरा पसरू देऊ नये. मन स्वच्छ ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे. मनावर नियंत्रण राहील तर भावनिक आरोग्य सुदृढ राहील, असा संदेश त्यांनी दिला.शिवानी दीदी पुढे म्हणाल्या, मनावर कंट्रोल नसेल तर मुलांना संस्कार देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे जीवन संयम आणि सन्मानाने भरलेले असावे. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी घरातील वातावरण आध्यात्मिक असणे आवश्यक आहे. गरजू व गरजवंतांच्या मदतीसाठी हात पुढे केल्यास त्याचे समाधान आपल्या जीवनात लाभते. आपल्याला आयुष्यात जे शिखर गाठायचे आहे त्यानुसार वाचन व मनन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे वाचन सात्विक असणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या संचालिका ब्रह्माकुमारी रजनी दीदी यांनी स्वागत भाषण केले. रंजना अग्रवाल व नीलिमा दिवटे यांनी त्यांचे स्वागत केले. संचालन ब्रह्माकुमारी मनिषा दीदी यांनी केले. यावेळी जवळपास ५००० लोकांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेतला.

टॅग्स :nagpurनागपूर