शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

भावनिक आरोग्यासाठी मनावर नियंत्रण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:44 IST

प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयातर्फे विश्वशांती सरोवर, जामठा येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘भावनिक आरोग्य’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्याला शारीरिक आरोग्य माहीत आहे, मात्र भावनिक आरोग्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्याचे आकलन स्वत: करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे मार्गदर्शन : विश्वशांती सरोवरात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयातर्फे विश्वशांती सरोवर, जामठा येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘भावनिक आरोग्य’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्याला शारीरिक आरोग्य माहीत आहे, मात्र भावनिक आरोग्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्याचे आकलन स्वत: करणे गरजेचे आहे. सुखी जीवनासाठी भावनिक आरोग्य सुदृढ असणेही तेवढेच आवश्यक आहे. आपल्या आत जेवढा अहंकार असेल तेवढे भावनिक आरोग्य कमी असते. अपेक्षाही भावनिक आरोग्याशी जोडल्या जाऊ शकतात. आपण विचार करतो तसेच व्हावे, ही अपेक्षा व्यर्थ आहे. आपल्या दु:खाचे कारण दुसऱ्याला मानले जाते. वर्तमान काळात थकलेल्या मनाने लोक मोठेमोठे कार्य करतात. त्यामुळे तणाव ही नित्याची गोष्ट झाली असून यामुळे भावनिक आरोग्य प्रभावित होत आहे. यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्या मनात कचरा पसरू देऊ नये. मन स्वच्छ ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे. मनावर नियंत्रण राहील तर भावनिक आरोग्य सुदृढ राहील, असा संदेश त्यांनी दिला.शिवानी दीदी पुढे म्हणाल्या, मनावर कंट्रोल नसेल तर मुलांना संस्कार देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे जीवन संयम आणि सन्मानाने भरलेले असावे. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी घरातील वातावरण आध्यात्मिक असणे आवश्यक आहे. गरजू व गरजवंतांच्या मदतीसाठी हात पुढे केल्यास त्याचे समाधान आपल्या जीवनात लाभते. आपल्याला आयुष्यात जे शिखर गाठायचे आहे त्यानुसार वाचन व मनन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे वाचन सात्विक असणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या संचालिका ब्रह्माकुमारी रजनी दीदी यांनी स्वागत भाषण केले. रंजना अग्रवाल व नीलिमा दिवटे यांनी त्यांचे स्वागत केले. संचालन ब्रह्माकुमारी मनिषा दीदी यांनी केले. यावेळी जवळपास ५००० लोकांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेतला.

टॅग्स :nagpurनागपूर