शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
2
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
4
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
5
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
6
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
7
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
8
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
9
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
10
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
11
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
12
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
13
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
14
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
15
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
16
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
17
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
18
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
20
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण निकालाच्या प्रतीक्षेत अकरावीचे विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 22:27 IST

Eleven students awaiting for admission, nagpur news कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशिरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. ऑक्टोबर संपतोय तरी प्रवेशच झालेले नाहीत, अशात शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार, अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार, आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार, अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा कल

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशिरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. ऑक्टोबर संपतोय तरी प्रवेशच झालेले नाहीत, अशात शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार, अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार, आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार, अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. त्यापूर्वी अकरावीची पहिली फेरी आटोपली होती. त्यात शहरात १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षांनी कळविले होते की शासन स्तरावरून आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतरच ऑनलाईन प्रवेशाची पुढील कार्यवाही जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे

 ४५,७१६ जागा रिक्त

शहरातील जागा - ५९१७०

नोंदणी केलेल विद्यार्थी - ४०९९०

भाग १ भरलेले विद्यार्थी - ३४८७८

ऑप्शन फॉर्म भरलेले विद्यार्थी - २९१५९

पहिल्या फेरीनंतर प्रवेश घेतला - १३४५४

 ३० हजारावर जागा राहणार रिक्त

राज्यात पाच शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीमार्फत होत आहे. नागपूर जिल्ह्यात केवळ शहरासाठी ही मर्यादित आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना स्पॉट अ‍ॅडमिशन मिळत आहे. आरक्षणाच्या निकालामुळे शहरातील प्रवेश लांबल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळले आहे. त्यामुळे यंदा शहरातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहे. गेल्यावर्षी २१ हजार जागा रिक्त होत्या. यंदा ही आकडेवारी ३० हजारावर जाणार आहे. याच पटसंख्येवर संचमान्यता दिल्यास मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे.

 केंद्रीय प्रवेश पद्धतीने जेव्हापासून अकरावीच्या प्रवेशाला सुरूवात झाली तेव्हापासून कॉलेजमध्ये रिक्त जागांची संख्या वाढत आहे. मुख्याध्यापक स्तरावर प्रवेशाला परवानगी द्यावी, अशी आमची मागणीही होती. त्याला दुजोरा दिला नाही. यंदा तर मोठ्या संख्येने जागा रिक्त राहणार असल्याने, शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे.

डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा.

टॅग्स :Studentविद्यार्थीreservationआरक्षण