शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

आरक्षण निकालाच्या प्रतीक्षेत अकरावीचे विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 22:27 IST

Eleven students awaiting for admission, nagpur news कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशिरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. ऑक्टोबर संपतोय तरी प्रवेशच झालेले नाहीत, अशात शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार, अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार, आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार, अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा कल

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशिरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. ऑक्टोबर संपतोय तरी प्रवेशच झालेले नाहीत, अशात शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार, अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार, आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार, अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. त्यापूर्वी अकरावीची पहिली फेरी आटोपली होती. त्यात शहरात १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षांनी कळविले होते की शासन स्तरावरून आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतरच ऑनलाईन प्रवेशाची पुढील कार्यवाही जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे

 ४५,७१६ जागा रिक्त

शहरातील जागा - ५९१७०

नोंदणी केलेल विद्यार्थी - ४०९९०

भाग १ भरलेले विद्यार्थी - ३४८७८

ऑप्शन फॉर्म भरलेले विद्यार्थी - २९१५९

पहिल्या फेरीनंतर प्रवेश घेतला - १३४५४

 ३० हजारावर जागा राहणार रिक्त

राज्यात पाच शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीमार्फत होत आहे. नागपूर जिल्ह्यात केवळ शहरासाठी ही मर्यादित आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना स्पॉट अ‍ॅडमिशन मिळत आहे. आरक्षणाच्या निकालामुळे शहरातील प्रवेश लांबल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळले आहे. त्यामुळे यंदा शहरातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहे. गेल्यावर्षी २१ हजार जागा रिक्त होत्या. यंदा ही आकडेवारी ३० हजारावर जाणार आहे. याच पटसंख्येवर संचमान्यता दिल्यास मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे.

 केंद्रीय प्रवेश पद्धतीने जेव्हापासून अकरावीच्या प्रवेशाला सुरूवात झाली तेव्हापासून कॉलेजमध्ये रिक्त जागांची संख्या वाढत आहे. मुख्याध्यापक स्तरावर प्रवेशाला परवानगी द्यावी, अशी आमची मागणीही होती. त्याला दुजोरा दिला नाही. यंदा तर मोठ्या संख्येने जागा रिक्त राहणार असल्याने, शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे.

डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा.

टॅग्स :Studentविद्यार्थीreservationआरक्षण