शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
3
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
4
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
5
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
6
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
7
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
8
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
9
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
10
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
11
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
12
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
13
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
14
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
15
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
16
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
17
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
18
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
19
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
20
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांचा दररोज मृत्यूशी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:03 IST

पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते.

ठळक मुद्देप्राणाची बाजी लावत काम करतात महावितरणचे जनमित्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दररोज प्रत्यक्ष मृत्यूला सामोरे जाण्याचे धाडस करणारा महावितरणकर्मचारी आपले कर्तव्य पार पाडताना प्राणाची बाजी लावत लढवय्याप्रमाणे आपले काम करीत असतो. महावितरणकर्मचारी दररोज वीजरुपी आक्राळविक्राळ शत्रूचा सामना शूर लढवय्याप्रमाणे करीत असतो. त्यातल्या त्यात पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. या सर्व गोष्टी विचारात घेऊनच सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य खातरजमा करून महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य निभावित आहे.पावसाळ्याच्या सुरुवातील वीजवितरण यंत्रणेत अनेक बिघाड उद्भवतात, याचा राग ग्राहकांकडून वीज कर्मचाऱ्यांवर काढ़ला जातो, मात्र वीज जाण्यामागील कारणांचा विचारही कुणी करीत नाहीत, रात्री उशिरा वीजपुरवठा खंडित होतो आणि काही वेळेनंतर तो परत सुरळीत होतो, एकीकडे सर्वत्र आधुनिकीकरणाच्या दिशेने काम सुरु असले तरी उघड्या वीजवाहिन्याची यंत्रणा सुरू अथवा बंद करण्यासाठी आजही मनुष्यबळाची गरज आहे, पाऊस सुरु असतेवेळी वीजपुरवठा खंडित झाला म्हणजे कुणीतरी जनमित्र अंधाऱ्या रात्री भर पावसात आपल्या प्राणाची पर्वा न करता वीजखांबावर चढून आपले कर्तव्य बजावित असतो. याशिवाय वीज खांबात वीज प्रवाहित होऊ नये यासाठी वीज खांबांवर चॉकलेटी अथवा पांढºया रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर्स बसविलेली असतात, बहुतांश वेळा अधिक उन अथवा वीज प्रवाहामुळे ही इन्सुलेटर्स गरम होतात आणि त्यावर पावसाच्या पाण्याचा एक थेंब पडला तरी ती फुटतात आणि यामुळे वीज खांबांमध्ये वीज प्रवाहित होऊन जमिनीत जाते अशा वेळी स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित होऊन वीजवाहिनीचा पुरवठा खंडित होतो. तो बंद न झाल्यास प्राणांतिक आणि वित्त हानी होण्याची संभावना अधिक असते. वीजवाहिनीत अकस्मात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास वीज उपकेंद्रातील कर्मचारी नजिकच्या उपकेंद्रासोबत संपर्क साधून तेथील वीजपुरवठ्याची स्थिती जाणून घेतात. वीजपुरवठा सुरळीत झाल्याची योग्य शहानिशा केल्यानंतरच वीजवाहिनीचा वीजपुरवठा सुरू केला जातो, आणि वाहिनी बंद झाली असल्यास संबंधित वाहिनी नादुरुस्त म्हणून जाहीर केली जाते.वाहिनीत झालेला बिघाड शोधणे देखील एकप्रकारे तारेवरची कसरत असते, पाऊस आणि अंधाराची पर्वा न करता शोधमोहिम राबविली जाते, कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व वीज खांबांची तपासणी करावी लागते तर कधी काही खांबांदरम्यान बिघाड सापडतो.आज नागपूर शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे वीजवितरण वाहिन्यांची मोठ्या प्रमाणात क्षती झाली आहे, खोदकाम तुटलेले केबल जोडली असली तरी अनेकदा जोड असलेल्या भागात पाणी साचल्याने ती केबल नादुरुस्त होऊन वीजपुरवठ्यात व्यत्यय येतो, अशा वेळी हा बिघाड नेमका कुठे झाला हे शोधून काढणे जिकरीचे काम असतानाही वादळ-वारा याची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याप्रति सदैव सजग असलेला वीज कर्मचारी प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही ग्राहकाला वीज मिळावी यासाठी झटत असतो. वीजपुरवठा खंडित होताच अनेकदा ग्राहक संबंधित जनमित्र किंवा अभियंत्याला फोन करणे सुरु करतात मात्र अशा वेळी फोनवर बोलण्याऐवजी वीजपुरवठा सुरळीत करायला त्याचे प्राधान्य असल्याने तो फोन घेण्यास असमर्थ असतो.वीज कर्मचाऱ्यांना सहकार्य कराअनेकदा वीज आली नाही म्हणून ग्राहक संतापतात, वीज कर्मचाऱ्यांवर राग काढतात. उपरोक्त सर्व गोष्टी विचारात घेता सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य खातरजमा करून महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य निभावत असतात. यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. तेव्हा त्यांना समजून घ्यावे, वीज कर्मचाऱ्यांवर दोषारोपण करणे टाळावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ग्राहकांनी महावितरणच्या नि:शुल्क कॉलसेंटरला किंवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी