शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

नववर्षात वीज महागणार; प्रति युनिट ६ पैसे वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 9:47 AM

नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नागपूरकरांवर महागड्या वीजदराचा भार पडणार आहे. रस्ते रुंद झाल्यामुळे रस्त्यामधील विजेचे खांब हटविण्यासाठी सहा पैसे प्रति युनिट वसूल करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

ठळक मुद्दे वीज खांब हटविण्यासाठी ग्राहकांवर भार

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नागपूरकरांवर महागड्या वीजदराचा भार पडणार आहे. रस्ते रुंद झाल्यामुळे रस्त्यामधील विजेचे खांब हटविण्यासाठी सहा पैसे प्रति युनिट वसूल करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसे पाहता या कामासाठी ग्राहकांनी वर्ष २०११ ते २०१४ पर्यंत नऊ पैसे युनिट चुकते केले आहेत. मनपाच्या विलंबामुळे नागरिकांवर पुन्हा महागड्या विजेचा बोझा पडणार आहे.वर्ष २००१-०२ मध्ये आयआरडीपी अंतर्गत शहरातील रस्ते रुंद केले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब रस्त्यावर आले. त्याला हटविण्यासाठी ९१.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यासोबत मनपा आणि महावितरण यांच्यात खांब हटविण्याची जबाबदारी कुणाची यावर संघर्ष निर्माण झाला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजेच वर्ष २०११ मध्ये महावितरण आणि मनपाने अर्धा-अर्धा खर्च वहन करण्याचे निश्चित केले होते. महावितरणने आपला वाटा देण्यासाठी वर्ष २०१२ ते २०१५ पर्यंत नागपूरकरांकडून वीज बिलाच्या माध्यमातून प्रति युनिट नऊ रुपये दराने पैसे वसूल केले आणि एकूण रक्कम मनपाला दिली. त्या पैशातून मनपाने खांब हटविणे सुरू केले. त्यानंतर मनपाने आर्थिक स्थिती सुदृढ नसल्याचे कारण पुढे करून हात वर केले. अशा स्थितीत ४१ कोटींचे काम झाले आणि अर्धेचे खांब हटले. त्यातील अधिकांश खांब शहराच्या उच्चभू वस्तीतील आहेत. सुमारे ५७ कोटी रुपयांचे काम प्रशासकीय कारवाईत फसले आहे. यावर ओरड सुरू झाल्यानंतर मनपाला जाग आली. महावितरणला कामासाठी लागणाऱ्या पैशाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले आहे.

नागरिकांची चूक काय?रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या खांबामुळे नागरिक त्रस्त आहेत. डिप्टी सिग्नल येथे रस्त्यावरील खांबामुळे झालेल्या अपघातात दोन युवकांचा जीव गेला होता. खांब हटविण्यासाठी पैसे दिल्यानंतरही नागरिकांना जीव का गमवावा लागतो, यावर लोकमतने प्रकाश टाकताना नागरिकांची चूक काय? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे या कामासाठी लागणाऱ्या आपल्या वाट्याचे पैसे देण्यास असमर्थ असल्याचा दावा मनपा वारंवार करीत आहे. नागरिकांनी या कामासाठी पूर्वीच पैसे दिले आहेत, मग पुन्हा पैसे देण्यासाठी नागरिकांवर दबाव का टाकण्यात येत आहे, असा सवाल यानिमित्ताने उभा राहिला आहे.

नव्या सर्वेक्षणात ७६ कोटींचा अंदाजया कामासाठी नव्याने केलेल्या सर्वेक्षणात ७६ कोटी रुपयांचे एस्टिेमेट तयार करण्यात आले आहे. खर्च वाढल्यामुळे त्यात सुमारे २० कोटींची वाढ झाली आहे. महावितरण आणि मनपाला अर्धा-अर्धा अर्थात प्रत्येकी ३८ कोटी रुपये खर्च करायचे आहे. महावितरणकडे नागरिकांकडून वसूल केलेले १९ कोटी रुपये आहेत. पण उर्वरित १९ कोटी रुपये नागरिकांकडून वीज बिलाच्या माध्यमातून पुन्हा वसूल करण्यात येणार असल्याचे महावितरणचे मत आहे. वसुलीच्या परवानगीसाठी महावितरण महाराष्ट्र प्रदेश नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. आयोगाने पूर्वीच परवानगी दिल्याचा कंपनीचा दावा आहे. यामुळे या कामासाठी परवानगी मिळण्यास समस्या येणार नाही. ही रक्कम कंपनी एक वर्षात वसूल करणार आहे. वर्ष २०२० च्या जानेवारी महिन्यात वीजदर सहा पैसे युनिट कमी होईल.व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये शिक्कामोर्तबया प्रकरणात तोडगा काढण्यासाठी महावितरण आणि मनपाने व्हिडिओ कॉन्फरन्सची मदत घेतली. यादरम्यान महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्यात खांब हटविण्यावर विस्तृत चर्चा झाली. कॉन्फरन्समध्ये पैसे गोळा करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

टॅग्स :electricityवीज