शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपन्या दोन तास अतिदक्ष राहणार : महापारेषणने जारी केले दिशानिर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 21:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी वीज बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले असले तरी राज्यातील वीज कंपन्या मात्र पूर्ण दिवसभर सतर्क राहणार आहेत.

ठळक मुद्देस्ट्रीट लाईट सुरू ठेवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी वीज बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले असले तरी राज्यातील वीज कंपन्या मात्र पूर्ण दिवसभर सतर्क राहणार आहेत. महापारेषणने यासंदर्भात दिशानिर्देश जारी करीत रात्री ८ ते १० वाजेपर्यंतची वेळ अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने यादरम्यान वीज उत्पादन व वितरण कंपन्यांना विशेष दक्षता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.महापारेषणने स्पष्ट केले आहे की, ग्रीड फेल होऊ नये म्हणून हायड्रो प्रोजेक्टमधून पूर्ण क्षमतेने उत्पादन करावे लागेल. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. कंपनीने मनपासह सर्व स्थानिक संस्थांना पथदिवे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. कंपनीचे प्रबंध निदेशक दिनेश वाघमारे यांनी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करीत आपापल्या घरातील लाईटशिवाय सर्व उपकरणेसुरू ठेवण्यास सांगितले आहे. रुग्णालयातील लाईट बंद न करण्याचेही आवाहन केले आहे. राज्यातील ग्रीडची फ्रिक्वेन्सी मेन्टेन ठेवणे आवश्यक आहे. यासाठी कंपनीने तयारी केली आहे. दोन तास सर्व वीज कंपन्या अतिदक्षता बाळगतील.वीज बंद हाऊ देणार नाही : ऊर्जामंत्री राऊतऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा एकदा नागरिकांना लाईट बंद न करता दिवे जाळण्याचे आवाहन केले आहे. ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, अचानक विजेची मागणी कमी झाल्यास ग्रीड फेल होऊ शकतो. हवामान खराब झाल्याने ब्रेकडाऊन झाल्यास मागणीवर परिणाम पडतो. परंतु देशभरात पहिल्यांदाच एकाच वेळी सर्वजन वीज बंद केल्याने ग्रीडवर परिणाम पडू शकतो. राज्यातील वीज कंपन्यांचे अधिकारी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कामाला लागले आहेत. कुठल्याही परिस्थितीत ग्रीड फेल होऊ देणार नाही. वीज बंद होऊ देणार नाही.