शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निवडणूक म्हणजे प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय : लुडविग स्ट्रेईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:41 PM

नवे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत बेलफिल्ड विद्यापीठ, जर्मनीचे तत्त्वज्ञ प्रा. लुडविग स्ट्रेईट यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २००० वर्षापूर्वी ग्रीकमध्ये लोकशाहीचा उदय झाला असे मानले जाते. त्या काळात तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव नव्हता, मात्र लोकशाहीची मूल्ये महत्त्वाची होती. आज मात्र लोकांना अपेक्षित असलेली लोकशाही जगात कुठेही दिसत नाही. निवडणूक प्रक्रिया आज केवळ एखाद्या पक्षाचा व त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय झाला आहे. लोकांसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे सोडून स्वत:ची प्रतिमा उंचावण्यातच राजकारण्यांचा वेळ जातो. त्यासाठी तंत्रज्ञानाचा हवा तसा वापर व हवा तेवढा पैसा खर्च केला जातो. ही लोकशाहीची पडझड आहे. नवे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत बेलफिल्ड विद्यापीठ, जर्मनीचे तत्त्वज्ञ प्रा. लुडविग स्ट्रेईट यांनी व्यक्त केले.सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट (सिरी) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय  परिषदेत मार्गदर्शनासाठी आलेले प्रा. लुडविग यांनी लोकमतशी बोलताना आपले विचार व्यक्त केले. त्यांनी २००० ते २००१ या काळात विविध देशातील वर्तमान परिस्थितीच्या अभ्यासावरून आपले विचार मांडले. ‘कॉम्प्लेक्सीटी, अ‍ॅक्सेलरेशन, ग्लोबलायझेशन : चॅलेंजेस फॉर डेमोक्रसी’ हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. लोकशाहीचा उदय झाला तेव्हा प्रक्रिया हळुवार चालत होत्या. लोकांकडे वेळ होता. मात्र पुढे राष्ट्रांमधील तणाव वाढत गेला, युद्ध होत गेले व त्यातून तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. नवनवे तंत्रज्ञान विकसित होत गेले. आज तंत्रज्ञानाने जग एकमेकांशी जुळले, मात्र यातून गुंतागुंत वाढीला लागली. जग प्रचंड गतिमान झाले असून कुणाकडे ही गुंतागुंत सोडविण्यासाठी वेळ नाही. सरकारचेही तसेच. आधी आर्थिक धोरण म्हणजे भविष्याची गुंतवणूक असायची. आज दर महिन्याला आर्थिक धोरणे बदलली जातात. यातून आर्थिक मंदीसारखे प्रश्न सातत्याने निर्माण होत आहेत. यालाच अ‍ॅक्सेलरेशन म्हणतात. त्यातून जगभरात समस्या निर्माण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.लोकांचे सरकार हा आभास असल्यासारखे वाटते. लोकशाहीच्या देशातील लोक नाखूश आहेत, कारण ते योग्य पद्धतीने चालविली जात नाही. चीनमध्ये लोकशाही नाही, मात्र तो देश विकास करीत असून गरिबी कमी झाली आहे. सिंगापूरचा अनुभवही तसाच आहे. लोकांना हुकूमशाही ऐवजी लोकशाहीच महत्त्वाची वाटते, मात्र निवडणूक प्रक्रिया बदलावी असा विचार समोर येत आहे. त्यामुळे लोकशाही एक मोठा बदल घडण्याची वाट पाहतेय, असे वाटते. भविष्यात याचे परिणाम दिसतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर