शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

निवडणूक विभाग तीन दिवसापासून जागाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 9:29 PM

लोकशाहीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन गेल्या काही दिवसंपासून दिवसरात्र राबत आहेत. तीन दिवसांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच २४ तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच दिवस-रात्र राबताहेतमतदानाच्या दिवशी संपूर्ण रात्र काढली जागून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन गेल्या काही दिवसंपासून दिवसरात्र राबत आहेत. तीन दिवसांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच २४ तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष.निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली. तेव्हापासून निवडणूक विभागाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. परंतु मंगळवारपासून निवडणूक विभागाची धावपळ वाढली. साहित्य वाटपाच्या दिवसापासून जागरण सुरु झाले. मतदानाचा दिवस तर सर्वात महत्त्वाचा ठरला. नागपूर लोकसभेतील २०१६ आणि रामटेक येथील २३६४ असे एकूण ४४२९ मतदान केंद्रातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सर्व ईव्हीएम मशीन सील करून ते आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. येथे प्रत्येक ईव्हीएमची मोजणी झाली. किती बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट नेण्यात आले, त्या प्रत्येकाची मोजणी झाली. किती खराब झाले. त्या परत आलेत का? या सगळ्यांची बूथनिहाय मोजणी केली. त्यानंतर प्रत्येक मशीन विधानसभानिहाय कंटेनरमध्ये सीआयपीएफच्या सुरक्षेत कळमना येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आले. यासंपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांपासून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व कक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचे जागरण होत आहेच. परंतु निवडणूक विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारीही रात्रभर जागत आहेत. निवडणूक विभागातील गुरुवारी कामावर आलेले अनेक अधिकारी तर आज शुक्रवारी दुपारपर्यंत कार्यालयातच होते, हे विशेष.आमचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने राबत आहे. त्यांची झोप झालेली नाही. मतदानाचे साहित्य वाटपापासून तर त्यांच्यावर कामाचा अधिकच ताण आहे. आज थोडे कामापासून मोकळे झाले. त्यांनी पुरेशी झोप घेण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना सवलत दिली जाईल.अश्विन मुदगलजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, तथा जिल्हाधिकारी३८ ठिकाणी सुरु होते ६ नंतरही मतदाननिवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु ६ वाजता मतदान केंद्रावर रांगेत असलेली शेवटची व्यक्ती मतदान करेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार होती. त्यानुसार नागपूर शहरात एकूण ३८ ठिकाणी सायंकाळी ६ नंतरही लोकं रांगेत होते. त्यांची एकूण मतदानाची प्रक्रिया ७ ते ७.३० पर्यंत चालली.विधानसभानिहाय ६ नंतर सुरु असलेले मतदान केंद्रविधानसभा मतदान केंद्रउत्तर नागपूर १३पूर्व नागपूर ४मध्य नागपूर ३दक्षिण नागपूर ९पश्चिम नागपूर ४दक्षिण-पश्चिम नागपूर - ५----------------------------एकूण ३८

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019