शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

एसआयटीच्या प्रश्नांनाही निवडणूक आयोग उत्तर देईना; आलंदचे आमदार बी. आर. पाटील यांचा 'व्होट चोरी'चा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:27 IST

Nagpur : पाटील म्हणाले, मतदाराची नावे वगळण्यासाठी स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे बोगस अर्ज सादर करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना बोगस नावांनी फोन करून नावे वगळण्यास आपली संमती असल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्नाटकातील अलंद विधानसभा मतदारसंघात ६ हजार मतदारांची नावे परस्पर वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे फसवे अर्ज सादर करण्यात आले. सीआयडीने निवडणूक आयोगाला १८ पत्र पाठविले, पण संपूर्ण माहिती आयोगाकडून दिली गेली नाही. आता राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या प्रश्नांनाही निवडणूक आयोग उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे. यावरून निवडणूक आयोग व्होट चोरांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप कर्नाटक राज्य धोरण व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष व अलंदचे आमदार बी. आर. पाटील यांनी केला. 

शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषदेत आ. बी.आर. पाटील म्हणाले, मतदाराची नावे वगळण्यासाठी स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे बोगस अर्ज सादर करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना बोगस नावांनी फोन करून नावे वगळण्यास आपली संमती असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक अर्ज हा बूथ यादीतील क्र. १ च्या नावाने दाखल करण्यात आला. एका प्रकरणात ३६ सेकंदांत दोन अर्ज रात्री ४ वाजता दाखल झाले.

गोदाबाई यांच्या नावाने १२ मतदारांना वगळण्याचा प्रयत्न झाला. सूर्यकांत यांच्या नावाने ३४ मिनिटांत १२ अर्ज दाखल झाले. यावर निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर दिशाभूल करणार आहे. जर सर्व माहिती आधीच दिली असेल तर कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी ४ फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी व १४ मार्च २०२५ रोजी पुन्हा पुन्हा तीच माहिती मागण्यासाठी का पत्र लिहीत आहेत, सीआयडीने गेल्या १८ महिन्यांत १८ पत्रे लिहूनही, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सुद्धा का तीच माहिती मागावी लागली, आयोगाकडून गंतव्य आयपी, डिव्हाइस पोर्ट आणि ओटीपी ट्रेल्सची माहिती का दिली जात नाही, असे प्रश्न आ. पाटील यांनी उपस्थित केले. यावेळी काँग्रेसचे आ. विकास ठाकरे व पदाधिकारी प्रा. दिनेश बानाबाकोडे उपस्थित होते.

न्यायालयात आव्हान देणार

अलंदमध्ये झालेल्या व्होट चोरीबाबत काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी तीनदा आपल्याशी चर्चा केली आहे. याप्रकरणी न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची आपली तयारी आहे. पक्षाकडून निर्देश प्राप्त होताच आपण पुढील पाऊल उचलू, असेही आ. बी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Election Commission shielding vote thieves, alleges Aland MLA B.R. Patil.

Web Summary : MLA B.R. Patil accuses the Election Commission of protecting 'vote thieves' in Aland, Karnataka. Allegedly, 6,000 voter names were fraudulently removed via automated software. Despite numerous CID requests, the Election Commission hasn't provided complete information, prompting Patil to consider legal action after discussions with Rahul Gandhi.
टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग