शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

‘नर्सरी अ‍ॅक्ट’ची प्रभावी अंमलबजावणी हवी; अमोल तोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 08:05 IST

महाराष्ट्र व देशातही नर्सरी अ‍ॅक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. हे काम वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून होऊ शकेल, अशी अपेक्षा ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलकडून अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नर्सरीमध्ये चुकीच्या पद्धतीने संत्र्यांची कलमे तयार होत आहेत. रोगयुक्त कलम तयार होत असल्याने झाडे खराब होताहेत. परिणामी संत्र्याचे उत्पादन दीड लाख मेट्रिक टनावरून १ लाख २० हजार टनावर आले आहे. ३० हजार मेट्रिक टनाचे उत्पादन घटले आहे, ही चिंतेची बाब आहे. तेव्हा संत्र्याचे रोगमुक्त कलम तयार करण्यासाठी आणि झाडे खराब होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र व देशातही नर्सरी अ‍ॅक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. हे काम वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून होऊ शकेल, अशी अपेक्षा ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडिया (भारतीय संत्रा उत्पादक संघ)चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे यांनी व्यक्त केली. ऑरेंज ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय संत्रा उत्पादक संघ ही संस्था केंद्र सरकारच्या कृषी विभागाने स्वत: तयार केली आहे. त्यामुळे या संघाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे ते नॉलेज पार्टनर आहे.या पार्श्वभूमीवर अमोल तोटे यांनी लोकमतशी संवाद साधला. ते म्हणाले, संत्र्याची निर्यात होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने चांगले पाऊल टाकले आहे. ४ डिसेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारने निर्यात धोरण जाहीर केले. त्यात निर्यात होणाऱ्या ४० फळांच्या यादीत संत्र्याचाही समावेश केला. यामध्ये नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निर्यातीच्या दृष्टीने केंद्र सरकारने चांगले पाऊल उचलले आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाकडूनही आता संत्रा उत्पादकांना कशी मदत होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. संत्र्याच्या निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात नाहीत. वरुड येथील युनिट वगळता पॅकेजिंग लाईनची सुविधा ही आऊटडेटेड झाली आहे. ती सुधारण्याची गरज आहे. यामध्ये खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढेल, यादृष्टीने शासनाने प्रयत्न करावे.संत्र्याचे कर्ज दर २००६ पासून रिव्हाईज झालेले नाही. पूर्वी ४२ रुपये प्रती झाड प्रती वर्ष असे कर्ज मिळायचे. परंतु भारतीय संत्रा उत्पादक संघाच्या रेट्यामुळे आता ते २३० रुपये प्रती झाड झाले आहे. अमरावती येथील बँका ३०० रुपये प्रती झाडप्रमाणे कर्ज देतातही परंतु नागपुराील बँका देत नाहीत अशी परिस्थिती आहे. संत्र्यासाठी प्रती झाड किमान ९०० रुपये कर्ज मिळायला हवे.वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही तोटे यांनी स्पष्ट केले.

जगभरातील शास्त्रज्ञ व संत्रा तज्ज्ञांचे मार्गदर्शनवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जगभरातील विविध तंत्रज्ञ अवगत व्हावे, यासाठी जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञ व तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. या संत्रा महोत्सवात १० देशातील १७ तज्ज्ञ सहभागी होतील. यामध्ये डॉ. सुली ब्रीटो सिल्वा (ब्राझील), डॉ. गिलबर्टो टोझाट्टी (ब्राझील), डॉ. क्वॉन सांग (दक्षिण कोरिया), डॉ. एन. हुआ (व्हिएतनाम), डॉ. सिद्धरामे गौडा (अमेरिका, फ्लोरिडा), डॉ. बालाजी आगलावे (अमेरिका, फ्लोरिडा), डॉ. त्शेरिंग पेंन्जॉर (भूतान), प्रो. केझॉन्ग त्शेरिंग (भूतान), डॉ. शांता कार्की (नेपाळ), डॉ. उमेश आचार्य (नेपाळ), डॉ. इब्राहीम ओर्टास (तुर्की), डॉ. तुरगुट यिशीलोगलू (तुर्की), डॉ. डब्ल्यू.डी. लेस्ली (श्रीलंका), डॉ. जी. एन. अरुणाथिलाका (श्रीलंका), डॉ. पॅट्रीक झू (चीन), डॉ. होर फेन (कम्बोडिया) डॉ. काँग वॉऊशिम (कम्बोडिया) यांचा समावेश आहे.

 या महोत्सवात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जगभरातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती अवगत केली जाईल, तेव्हा त्यांनी याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा. आपल्या सूचनाही सादर कराव्या, असे तोटे यांनी सांगितले.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल