शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 01:34 IST

नागपूर शहर रेड झोनमधून बाहेर काढण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण मनपा आयुक्तांच्या मागणीनंतर शहराला पुन्हा रेड झोनमध्ये टाकल्यानंतर दुकाने सुरू करण्यावर निर्बंध आले. शुक्रवारी मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धंतोली, सीताबर्डी, सक्करदरा, इतवारी आणि शहराच्या विविध भागातील दुकाने बंद केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बाजारपेठा सुरू झाल्या तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागपुरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देखरेदी-विक्री नियमित सुरू करा : विविध व्यापारी संघटनांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर शहर रेड झोनमधून बाहेर काढण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण मनपा आयुक्तांच्या मागणीनंतर शहराला पुन्हा रेड झोनमध्ये टाकल्यानंतर दुकाने सुरू करण्यावर निर्बंध आले. शुक्रवारी मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धंतोली, सीताबर्डी, सक्करदरा, इतवारी आणि शहराच्या विविध भागातील दुकाने बंद केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बाजारपेठा सुरू झाल्या तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागपुरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे. बाजारपेठा बंद असल्याने अर्थव्यवस्था ढासळली. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाली. पण ती पुन्हा बंद झाल्याने व्यापारी नाराज झाले आहेत. बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच व्यापार रुळावर येईल आणि कार्यरत कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.महाल-केळीबाग रोड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, महाल, केळीबाग आणि बडकस चौक भागात ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. पण लॉकडाऊननंतर संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. बाजारपेठा उघडल्यानंतरही खरेदीसाठी लोकांची मानसिकता तयार होणार नाही. त्याला वेळ लागेल. ग्राहकांच्या सोयीसाठी शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करण्यास व्यापारी तयार आहेत. आता मार्केट नियम आणि अटींसह उघडण्यास परवानगी द्यावी. रेडिमेड स्टोअर्सचे विश्वास जैन म्हणाले, सीताबर्डी आणि धरमपेठ भागात दुकाने उघडण्याची मनपाने परवानगी द्यावी. मार्केट सुरू झाल्यास ग्राहकही सावधता बाळगून खरेदीसाठी घराबाहेर पडतील. सध्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आवश्यक वस्तू मिळत नसल्याने ग्राहकही त्रस्त आहेत.सक्करदरा दुकानदार असोसिएशनचे पदाधिकारी शीतल खानोरकर म्हणाले, सक्करदरासह विविध भागातील दुकाने सुरू करण्यास मनपाने मान्यता द्यावी. नियमांचे पालन करून दुकानांचे संचालन करण्यास व्यापारी तयार आहेत. जवळपास दोन महिन्यापासून ठप्प असलेल्या व्यापाराला संजीवनी देण्याचे काम मनपाने केल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आतातरी दुकाने सुरू करण्यास मनपाने संधी द्यावी. कॉस्मेटिक वस्तूंचे व्यापारी रोशन चावला म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंप्रमाणे दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या कॉस्मेटिक वस्तूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. या वस्तू कालाबाह्य होण्याचा कालावधी कमी असल्याने बंद दुकानात ठेवता येत नाही. दोन महिन्यांपासून दुकाने बंद आहेत. बºयाच वस्तू खराब झाल्या आहे. त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आता दुकाने सुरू करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे.