शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

नागपुरात बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 01:34 IST

नागपूर शहर रेड झोनमधून बाहेर काढण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण मनपा आयुक्तांच्या मागणीनंतर शहराला पुन्हा रेड झोनमध्ये टाकल्यानंतर दुकाने सुरू करण्यावर निर्बंध आले. शुक्रवारी मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धंतोली, सीताबर्डी, सक्करदरा, इतवारी आणि शहराच्या विविध भागातील दुकाने बंद केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बाजारपेठा सुरू झाल्या तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागपुरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देखरेदी-विक्री नियमित सुरू करा : विविध व्यापारी संघटनांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर शहर रेड झोनमधून बाहेर काढण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण मनपा आयुक्तांच्या मागणीनंतर शहराला पुन्हा रेड झोनमध्ये टाकल्यानंतर दुकाने सुरू करण्यावर निर्बंध आले. शुक्रवारी मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धंतोली, सीताबर्डी, सक्करदरा, इतवारी आणि शहराच्या विविध भागातील दुकाने बंद केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बाजारपेठा सुरू झाल्या तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागपुरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे. बाजारपेठा बंद असल्याने अर्थव्यवस्था ढासळली. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाली. पण ती पुन्हा बंद झाल्याने व्यापारी नाराज झाले आहेत. बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच व्यापार रुळावर येईल आणि कार्यरत कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.महाल-केळीबाग रोड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, महाल, केळीबाग आणि बडकस चौक भागात ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. पण लॉकडाऊननंतर संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. बाजारपेठा उघडल्यानंतरही खरेदीसाठी लोकांची मानसिकता तयार होणार नाही. त्याला वेळ लागेल. ग्राहकांच्या सोयीसाठी शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करण्यास व्यापारी तयार आहेत. आता मार्केट नियम आणि अटींसह उघडण्यास परवानगी द्यावी. रेडिमेड स्टोअर्सचे विश्वास जैन म्हणाले, सीताबर्डी आणि धरमपेठ भागात दुकाने उघडण्याची मनपाने परवानगी द्यावी. मार्केट सुरू झाल्यास ग्राहकही सावधता बाळगून खरेदीसाठी घराबाहेर पडतील. सध्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आवश्यक वस्तू मिळत नसल्याने ग्राहकही त्रस्त आहेत.सक्करदरा दुकानदार असोसिएशनचे पदाधिकारी शीतल खानोरकर म्हणाले, सक्करदरासह विविध भागातील दुकाने सुरू करण्यास मनपाने मान्यता द्यावी. नियमांचे पालन करून दुकानांचे संचालन करण्यास व्यापारी तयार आहेत. जवळपास दोन महिन्यापासून ठप्प असलेल्या व्यापाराला संजीवनी देण्याचे काम मनपाने केल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आतातरी दुकाने सुरू करण्यास मनपाने संधी द्यावी. कॉस्मेटिक वस्तूंचे व्यापारी रोशन चावला म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंप्रमाणे दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या कॉस्मेटिक वस्तूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. या वस्तू कालाबाह्य होण्याचा कालावधी कमी असल्याने बंद दुकानात ठेवता येत नाही. दोन महिन्यांपासून दुकाने बंद आहेत. बºयाच वस्तू खराब झाल्या आहे. त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आता दुकाने सुरू करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे.