शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

‘स्वच्छ भारत’साठी आता ‘इकोफ्रेंडली’ थूकदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 10:35 IST

जागोजागी थुंकणाऱ्या बहाद्दारांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका प्रचंड असतो. अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून नागपुरातील बहिणभावाने एक अनोखे संशोधन केले व चक्क खिशात मावणारे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले आहे.

ठळक मुद्देबहीण-भावाची कमाल‘पिचकारी’बहाद्दरांना डोळ्यासमोर ठेवून संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविण्यात येत असताना खर्रा, तंबाखू, पान खाऊन रस्त्यांवर ‘पिचकारी’ मारणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे, अशीच अनेकांची मानसिकता असते. मात्र रस्ता असो, कार्यालय असो किंवा अगदी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, जागोजागी थुंकणाऱ्या अशा बहाद्दारांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका प्रचंड असतो. अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून नागपुरातील बहिणभावाने एक अनोखे संशोधन केले व चक्क खिशात मावणारे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले आहे. रितू व प्रतीक मल्होत्रा असे या नवसंशोधकांचे नाव असून कमी वयात त्यांनी एक अनोखा आदर्शदेखील निर्माण केला आहे.वैद्यकीय तज्ज्ञांकडूनदेखील थुंकण्याचे प्रमाण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक रोगांच्या जंतूंचा थुंकीवाटेच प्रसार होतो. थूकदान घेऊन फिरण्याचा तर धावपळीच्या युगात प्रश्नच येत नाही. मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनदेखील थुंकण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अशा स्थितीत आपण नेमके काय करू शकतो, या विचारातून मल्होत्रा भावंडांना ही संकल्पना सुचली. दोघांनीही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तांत्रिक अभ्यास व संशोधन करुन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ‘इझिस्पीट’ नावाचे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले. अगदी सहजतेने खिशात मावेल अशा पद्धतीचे हे ‘पॅकेट’ असून त्यात विशिष्ट घटकांचा उपयोग करण्यात आला आहे. ज्यावेळी थुकायचे असेल तेव्हा हे ‘पॅकेट’ खिशातून काढायचे व थुकायचे इतकेच वापरणाऱ्याला करायचे आहे. यात विशिष्ट पद्धतीचे ‘अ‍ॅबसॉर्ब मटेरियल’ वापरण्यात आले आहे. यामुळे थुंकी या ‘मटेरियल’मध्ये शोषल्या जाते व काही वेळातच त्याचे रुपांतर ‘क्रिस्टल्स’मध्ये होते. त्यामुळे खिसा ओला होण्याचा किंवा ‘पॅकेट’मधून दुर्गंध येण्याची शक्यताच राहत नाही. एका ‘पॅकेट’मध्ये २५ वेळा थुंकता येते व त्याला यातील घटकांचे विघटन सहज शक्य आहे.

कुठलाही जंतूसंसर्ग नाहीरितू व प्रतीक मल्होत्रा यांनी खिशात मावू शकेल व कारमध्येदेखील वापरता येईल, असे ‘पॅेकेट’ व ‘कंटेनर’ स्वरूपातील ‘थूकदान’ तयार केले आहेत. थुंकी जमिनीवर पडल्यानंतर त्यातील तापमान वाढते व त्यानंतर त्यातून जंतूसंसर्गाचा धोका जास्त वाढतो. परंतु ‘इझिस्पिट’मध्ये वापरण्यात आलेल्या ‘अ‍ॅबसॉर्ब मटेरियल’मुळे तापमान वाढत नाही व त्यातील जंतू नष्ट होतात. विशेष म्हणजे यातून कुठलाही दुर्गंध येत नाही. ‘पॅकेट’ला ‘झिप’ असल्यामुळे थुंकी बाहेर ओघळण्याची कुठलीही शक्यता नाही. ‘कंटेनर’प्रमाणे आता ‘पॅकेट’देखील पेपरपासूनच तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतीक मल्होत्रा याने दिली.

‘स्वच्छ भारत’ला मिळेल बळआम्ही याच्या ‘पेटंट’साठी अर्ज केला आहे. ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविण्यात येत असताना रस्त्यांवर बिनदिक्कतपणे थुंकणारे लोक पाहून आम्ही अस्वस्थ व्हायचो. यातूनच हे संशोधन साकारले. असे मत रितू मल्होत्रा हिने व्यक्त केले. दोघांनाही संशोधनामध्ये प्रतीक हरडे याचेदेखील मौलिक सहकार्य लाभले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान