शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नागपुरात बंददरम्यान उपद्रव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:41 IST

‘भारत बंद‘च्या दरम्यान वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको आणि उपद्रव करून सामाजिक शांतता भंग करू पाहणाऱ्या ६५० पेक्षा जास्त आंदोलकांवर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. शहरातील जरीपटका, सीताबर्डी, पाचपावली, सदर आणि नवीन कामठी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देतोडफोड, दगडफेक , जाळपोळ : ६५० पेक्षा जास्त आरोपी : विविध पोलीस ठाण्यात गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘भारत बंद‘च्या दरम्यान वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको आणि उपद्रव करून सामाजिक शांतता भंग करू पाहणाऱ्या ६५० पेक्षा जास्त आंदोलकांवर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. शहरातील जरीपटका, सीताबर्डी, पाचपावली, सदर आणि नवीन कामठी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.भारत बंद शांततेत सुरू असताना जरीपटक्यातून तरुणांचा घोळका निघाला. सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास कडबी चौकात एसटी बस क्रमांक एमएच ४०/ एक्यू ४३८७ वर या घोळक्यातील काही आरोपींनी दगडफेक केली. त्यामुळे बसच्या काचा फुटून २० हजारांचे नुकसान झाले. बसचालक प्रशांत सनेश्वर यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसानी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. दुसरा असाच एक गुन्हा जरीपटक्यातच दाखल झाला. सकाळी ११ च्या सुमारास इंदोरा चौकात जमावाने रस्ता अडवून दगडफेक केली. त्यामुळे या भागात काही काळ तणाव होता. पोलिसांनी परिस्थिती शिताफीने हाताळली. त्यानंतर रात्री २१ आरोपींविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा केल्याप्रकरणी गुन्ह दाखल केला. कृष्णा खोब्रागडे (समतानगर), आशिष सोमकुंवर (बाराखोली), अखिलेश ऊर्फ डोमा पाटील (इंदोरा), जितेंद्र घोडेस्वार, परेश जामगडे (नवीन नकाशा), शुभम ऊर्फ संदीप, भोला शेंडे, नाना सवाईथुल, मयूर पाटील, सतीश पाटील (भीम चौक), सुरेश कांबळे, अमित सूर्यवंशी, महेंद्र भांगे, गौरव अंबादे, बबलू तिरपुडे, अक्षय गजभिये, राकेश टेंभुर्णे, ऋषभ मेश्राम, पीयूष काळबांधे, संदीप टेंभुर्णे, अक्षय मेश्राम यांचा आरोपींच्या नावात समावेश आहे. सदर, पाचपावली आणि नवीन कामठी पोलीस ठाण्यातही आंदोलकांवर अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले.सीताबर्डीत बसपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हेसोमवारी दुपारी २.३० वाजता संविधान चौकात धरणे आंदोलनादरम्यान बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर बसून वाहतूक रोखली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडसर निर्माण झाला आणि अनेकांची नाहक कुचंबणा झाली. परिणामी सीताबर्डी पोलिसांनी कृष्णा बेले, अनिल गोंडान, नागोराव जयकर, योगेश लांजेवार, महेश सहारे , आनंद सोमकुंवर, गौतम पाटील, रुपेश बागेश्वर, नितीन घोड़ेस्वार, माया शेंडे, नितीन फुलमाळी, चंदू बागडे , जयंत शेंडे, अनिल वाघधरे, प्रफुल्ल बाराहाते, उषा मेश्राम, संदीप शेंडे, उद्धव खड़से आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. उपरोक्त आंदोलकांवर आक्षेपार्ह भाषेचा वापर करून सरकारविरोधी नारेबाजी करण्याचाही आरोप पोलिसांनी लावला आहे.सदरमध्ये वाहनांची तोडफोडसदर परिसरात आरोपी भोला शेंडे आणि त्याच्या साथीदारांनी दुपारी ३ च्या सुमारास रॅली काढली. रस्त्यावर उभी असलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तोडफोड करून आरोपींनी दहशत निर्माण केली. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदnagpurनागपूर