शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक विषमतेची दरी वाढतेय, कोट्यवधी नागरिकांचे मासिक उत्पन्न १० हजारांपेक्षाही कमी - प्रो. अरुणकुमार

By नरेश डोंगरे | Updated: November 25, 2023 22:25 IST

'पीस' या सामाजिक संघटनेच्या वतीने विनोबा विचार केंद्रात 'देश मे बेहताशा बढती आर्थिक विषमता' या विषयावर प्रो. अरुण कुमार यांच्या व्याख्यानाचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते.

 नागपूर : देशातील कोट्यवधी नागरिकांचे मासिक उत्पन्न १० हजारांपेक्षाही कमी आहे. तर, दुसरीकडे मुठभर लोकांचे उत्पन्न लाखो - करोडोंमध्ये आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात अशी प्रचंड आर्थिक विषमता निर्माण झाली असल्याचे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी व्याख्याते आणि ख्यातनाम अर्थतज्ज्ञ प्रो. अरुण कुमार यांनी मांडले.

'पीस' या सामाजिक संघटनेच्या वतीने विनोबा विचार केंद्रात 'देश मे बेहताशा बढती आर्थिक विषमता' या विषयावर प्रो. अरुण कुमार यांच्या व्याख्यानाचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून अमरावतीच्या रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे आणि विशेष अतिथी म्हणून जस्टीस (निवृत्त) बी. जी. कोळसे पाटील उपस्थित होते.

देशातील शेतकरी, मजूर, मध्यमवर्गीय व्यापारी-उद्योजक, भांडवलदार यांच्या उत्पन्नाचे विस्तृत विश्लेषण करून अरुण कुमार यांनी सरकारचे धोरण सर्वसामान्यांची आर्थिक कंबरमोड कशी करत आहे, त्यावर भाष्य केले. गरज नसताना काळे धन बाहेर काढण्याच्या आणि टेरर फंडिंगच्या नावाखाली सरकारने नोटबंदी केली. त्याचे तर काही झाले नाही मात्र नोटबंदीमुळे आमची अर्थव्यवस्था कोलमडली. ते होत नाही तर जीएसटी लादला. यामुळे छोटे व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांच्यावर नाहक आर्थिक बोझा वाढला. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणूस, कष्टकरी जनतेचे होते नव्हते सारेच हिसकावून घेतल्यासारखे झाले.

शिक्षणाचे धोरण, तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि वैश्वीकिकरण, बेरोजगारीचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, एका नोकरीसाठी शेकडो उमेदवार धडपडताना दिसतात. उच्चशिक्षित तरुण चपराशाची नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतात. वारंवार प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसल्याने हे तरुण नैराश्याने ग्रस्त होतात. अनेक जण व्यसनाधीन होतात तर काही जण गुन्हेगारीकडे वळतात. यांत्रिकीकरणावर जोर दिला जात आहे. त्यामुळे ४ जणांचे काम एक जण करतो. अर्थात तीन जण बेरोजगार झाले आहे. ४५ वर्षांतील सर्वात निचांकी स्तर बेरोजगारीचा आला आहे. भविष्यात तंत्रज्ञानाचेही दुष्परिणाम समोर येण्याची भीती त्यांनी वर्तविली.

देशातील २५ कोटी लोकांना घरापासून ५ किलोमीटर अंतरापर्यंत आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. या सर्व बाबी देशात प्रचंड आर्थिक विषमता वाढविणाऱ्या आहेत. एकूणच चुकीच्या धोरणांमुळे गरीब अधिक गरीब, तर श्रीमंत अधिक श्रीमंत बनत असल्याचेही प्रो. अरुणकुमार म्हणाले.

यावेळी बी.जी. कोळसे पाटील यांनी मानव केंद्रित विकास केवळ स्वप्नासारखा असल्याचे म्हटले. अर्थव्यवस्था मोजक्या भांडवलदारांच्या हातात असल्याचे सांगून त्यांनी सरकारी शाळा बंद पडण्याची पार्श्वभूमी विशद केली. या बंद पडलेल्या शाळा अंबानी, अदाणी यांच्या हातात देण्याचे धोरण आखले जात आहे. जर या शाळा त्यांच्या हातात गेल्या तर गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचे काय होणार, याची कल्पनाच केलेली बरी, असे म्हटले. तर, डॉ. देशपांडे यांनी आधीच्या वक्त्यांचा धागा पकडून सर्व साधन सुविधा असूनही विदर्भाचा विकास झाला नाही, त्याला हेच धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले.

प्रारंभी कार्यक्रमाची रूपरेषा 'पीस'चे शाम पांढरीपांडे यांनी मांडली. पाहुण्यांचा परिचय प्रकाश मेघे यांनी, स्वागत पत्रकार विवेक देशपांडे आणि शामला सन्याल यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी केले. 

 

टॅग्स :nagpurनागपूरEconomyअर्थव्यवस्था