शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उत्तरेकडे धुक्याची चादर, विदर्भात थंडीचा जाेर वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 12:39 IST

सह्याद्री व सातपुडा रांगामधून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जाेर वाढण्याची शक्यता

नागपूर : उत्तर भारताच्या पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम राजस्थान राज्यात सध्या घनदाट धुक्याची चादर पसरली आहे. या दिशेकडून सह्याद्री व सातपुडा रांगामधून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जाेर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात अति थंडी जाणवणार असून, नागपूरसह विदर्भात मात्र तीव्रता कमी राहण्याचा अंदाज आहे.

सध्या नागपूर शहरातही पहाटेच्या प्रहरात हलके धुके दाटलेले आहे. दरम्यान, २४ तासांत रात्रीच्या तापमानात सूक्ष्म अंशाची वाढ हाेऊन ते १२.९ अंश नाेंदविण्यात आले. इतर जिल्ह्यातही रात्रीचा पारा काही अंशाने वाढला. मंगळवारी १०.५ अंशांवर असलेल्या गाेंदियात तापमान ११.८ अंशांवर गेले. यवतमाळमध्ये सर्वात कमी ११.५ अंश तापमानाची नाेंद झाली आहे. अमरावती, बुलढाणा व यवतमाळ वगळता इतर जिल्ह्यांत तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही चढाव दिसून आला. अकाेल्यात सर्वाधिक ३३.२ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूर व गाेंदिया वगळता इतर सर्व जिल्ह्यांत पारा ३१ अंशाच्या वर पाेहोचला आहे. गुरुवारपासून दाेन्ही तापमानात काही अंशांची घट हाेण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते श्रीलंका किनारपट्टीवरून कन्याकुमारीच्या टाेकापर्यंत वळले आहे. यामुळे तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकमध्ये मध्य पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रावर या वातावरणाचा प्रभाव जाणवणार नाही. केवळ दक्षिण महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात हलके ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :weatherहवामानVidarbhaविदर्भ