शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे १० किमी रस्त्यासाठी पाऊण तासाचा वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्हीआयपी रोड समजल्या जाणाऱ्या नागपूर-कळमेश्वर मार्गावरून प्रवास हा आता जीवघेणा झाला आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : व्हीआयपी रोड समजल्या जाणाऱ्या नागपूर-कळमेश्वर मार्गावरून प्रवास हा आता जीवघेणा झाला आहे. या मार्गावर आजवर अनेक अपघात झाले. यात काहींचा जीव गेला तर काहींना अपंगत्व आले. मात्र प्रशासन अद्यापही या मार्गाची दशा बदलविण्यास तयार नाही. नागपूरवरून जुन्या काटोल नाक्यापासून तर कळमेश्वर न.प.क्षेत्रात प्रवेश करेपर्यंत या मार्गावरून जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो. जागोजागी उखडलेल्या या रस्त्यामुळे व मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकी वाहनचालकाचा कधी तोल जाईल, याचा नेम नाही. सध्या १५ मिनिटात गाठता येणारे हे १० कि.मी.च्या अंतरासाठी ४० ते ४५ मिनिटाचा वेळ लागतो. यात चालकाला अतिरिक्त इंधनाचा भारही सोसावा लागतो. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या मार्गाला आता राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र या मार्गावरून जाताना एखाद्या अविकसित खेड्यातून प्रवास केल्याची अनुभुती येते.

वरुड, काटोलपर्यंत होणारी सर्व मोठी वाहतूक याच मार्गावरून होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी याच मार्गावरून जावे लागते. यासोबतच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना मतदार संघात जातांना याच मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही असे असताना या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे इतके दुर्लक्ष का हा प्रश्न नेहमीच केला जातो.

धोक्याचा प्रवास

वरुड-काटोलला जाणारी जड वाहने याच मार्गावरून जातात. त्यामुळे अरुंद रस्ता यातच दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे ओव्हरटेकच्या स्पर्धेत या मार्गावर अपघात वाढले आहे. गत १५ दिवसापूर्वी खड्डा वाचविण्याच्या नादात दहेगाव येथे झालेल्या कार अपघातात तीन लोकांचा जीव गेला. काही दिवसापूर्वीच या फेटरी परिसरात वलणी येथील पटवाºयाचा अपघाती मृत्यू झाला.

शैक्षणिक संस्थामुळे मोठी वर्दळ

नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्गालगत गत १० वर्षात मोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या झाल्या आहे. यात पाचहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये, पब्लिक स्कूल आणि खासगी शिक्षण संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे नागपूर शहरातून विद्यार्थ्यांना सकाळी त्यांच्या महाविद्यालयात वा शाळेत सोडण्यासाठी या मार्गावर कॉलेज आणि स्कूल बसची मोठी गर्दी असते. यातच या रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग गाठत गंतव्यस्थळापर्यंत पोहण्यासाठी चालकांमध्ये नेहमीच स्पर्धा दिसून येते. त्यामुळे सकाळच्यावेळी या मार्गावरून दुचाकीचा प्रवास नेहमीच धोक्याचा ठरतो.

कळमेश्वर-नागपूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त आहे. या मार्गावर अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात अनेकांचा जीव गेला. मात्र अधिकाऱ्यांचे अद्यापही डोळे बंद आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना या मार्गावरून सुखकर प्रवास करण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल?

-बाबा कोढे, प्रवासी

नागपूर-कळमेश्वर मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या महामार्गाची देखभाल दुरुस्ती वा इतर कोणत्याही प्रश्नाबाबत कार्यकारी अभियंता बोरकरच हेच योग्य ते सांगू शकतील.

- हृषिकेश राऊत, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर