शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मजुरांअभावी शेतीची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : सध्या कुही तालुक्यात हरभऱ्याच्या पिकाची कापणी, कापसाची वेचणी आणि मिरचीच्या ताेडणीसाठी माेठ्या प्रमाणात मजुरांची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : सध्या कुही तालुक्यात हरभऱ्याच्या पिकाची कापणी, कापसाची वेचणी आणि मिरचीच्या ताेडणीसाठी माेठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासत आहे. मजूर पुरेशा प्रमाणात व वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना दुसऱ्या गावामधून वाढीव मजुरी देत मजूर आणावे लागत असून, त्यांच्या वाहतुकीचाही अतिरिक्त खर्च करावा लागताे.

गाेसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील काही गावाचे पुनर्वसन करण्यात आले. नवीन ठिकाणी तसेच तालुक्यात उद्याेग नसल्याने शेतीवर उपजीविका करण्यावाचून गत्यंतर नाही. असे असतानाही शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाही. अलीकडच्या काळात तालुक्यात हिरव्या मिरचीचे पीक घेतले जाते. मिरची ताेडण्यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांची नियमित गरज भासते. सध्या मिरचीच्या ताेडणीसाेबतच हरभऱ्याचे पीक कापणीला आला व काहींच्या शेतातील कापूस वेचणीला आला आहे. याही कामासाठी गावात मजूर मिळेनासे झाले आहे. गावात मजूर मिळत नसल्याने त्यांना पुनर्वसित गावामधून मजूर आणावे लागतात आणि सायंकाळी काम आटाेपल्यानंतर त्यांना वाहनाने त्यांच्या गावांमध्ये साेडावे लागते.

वाढीव मजुरी देऊनही वेळेवर मजूर मिळत नसल्याने प्रसंगी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. शेतमालाला बाजारात समाधानकारक भाव मिळत नसल्याने पदरी ताेटाच पडत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे, मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याेग्य काळजी घ्यावी, अशी मागणीही केली जात आहे.

....

धाेकादायक वाहतूक

मजुरांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जाताे. ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत दाटीवाटीने मजूर बसतात. त्यात महिला मजुरांची संख्या अधिक असते. राेडवरील खड्ड्यांमुळे किंवा अनियंत्रित वेगामुळे ट्राॅली उलटून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध प्रवासी वाहतुकीला बंदी असल्याने पाेलिसांनी ट्रॅक्टर पकडल्यास पाेलिसांना चिरीमिरी देऊन कारवाई टाळावी लागते. याचा भुर्दंडही शेतकऱ्यांनाच सहन करावा लागताे.

...

उत्पादनखर्चात वाढ

यावर्षी बाेंडअळी व बाेंडसडमुळे कापसाच्या तर मरराेग व घाटेअळीच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट आली आहे. या किडी व राेगाच्या तावडीतून पिकांना वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागल्याने आधीच उत्पादनखर्च वाढला आहे. त्यातच महिलांची मजुरी प्रति दिवस २०० रुपयावरून २५० रुपयावर गेल्याने तसेच त्यांच्या वाहतुकीवर अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने यात आणखी भर पडली आहे.