शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मजुरांअभावी शेतीची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : सध्या कुही तालुक्यात हरभऱ्याच्या पिकाची कापणी, कापसाची वेचणी आणि मिरचीच्या ताेडणीसाठी माेठ्या प्रमाणात मजुरांची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : सध्या कुही तालुक्यात हरभऱ्याच्या पिकाची कापणी, कापसाची वेचणी आणि मिरचीच्या ताेडणीसाठी माेठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासत आहे. मजूर पुरेशा प्रमाणात व वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना दुसऱ्या गावामधून वाढीव मजुरी देत मजूर आणावे लागत असून, त्यांच्या वाहतुकीचाही अतिरिक्त खर्च करावा लागताे.

गाेसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील काही गावाचे पुनर्वसन करण्यात आले. नवीन ठिकाणी तसेच तालुक्यात उद्याेग नसल्याने शेतीवर उपजीविका करण्यावाचून गत्यंतर नाही. असे असतानाही शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाही. अलीकडच्या काळात तालुक्यात हिरव्या मिरचीचे पीक घेतले जाते. मिरची ताेडण्यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांची नियमित गरज भासते. सध्या मिरचीच्या ताेडणीसाेबतच हरभऱ्याचे पीक कापणीला आला व काहींच्या शेतातील कापूस वेचणीला आला आहे. याही कामासाठी गावात मजूर मिळेनासे झाले आहे. गावात मजूर मिळत नसल्याने त्यांना पुनर्वसित गावामधून मजूर आणावे लागतात आणि सायंकाळी काम आटाेपल्यानंतर त्यांना वाहनाने त्यांच्या गावांमध्ये साेडावे लागते.

वाढीव मजुरी देऊनही वेळेवर मजूर मिळत नसल्याने प्रसंगी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. शेतमालाला बाजारात समाधानकारक भाव मिळत नसल्याने पदरी ताेटाच पडत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे, मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याेग्य काळजी घ्यावी, अशी मागणीही केली जात आहे.

....

धाेकादायक वाहतूक

मजुरांच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जाताे. ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत दाटीवाटीने मजूर बसतात. त्यात महिला मजुरांची संख्या अधिक असते. राेडवरील खड्ड्यांमुळे किंवा अनियंत्रित वेगामुळे ट्राॅली उलटून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध प्रवासी वाहतुकीला बंदी असल्याने पाेलिसांनी ट्रॅक्टर पकडल्यास पाेलिसांना चिरीमिरी देऊन कारवाई टाळावी लागते. याचा भुर्दंडही शेतकऱ्यांनाच सहन करावा लागताे.

...

उत्पादनखर्चात वाढ

यावर्षी बाेंडअळी व बाेंडसडमुळे कापसाच्या तर मरराेग व घाटेअळीच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट आली आहे. या किडी व राेगाच्या तावडीतून पिकांना वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागल्याने आधीच उत्पादनखर्च वाढला आहे. त्यातच महिलांची मजुरी प्रति दिवस २०० रुपयावरून २५० रुपयावर गेल्याने तसेच त्यांच्या वाहतुकीवर अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने यात आणखी भर पडली आहे.