शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

नशाखोरी आणि वाईट संगतीमुळे ‘त्यांनी’ रक्ताच्या नात्यालाही संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 7:00 AM

Nagpur News वाईट संगत किंवा नशा माणसाला हैवान बनवते. आपण काय करतो, याचे भान त्याला उरत नाही. तो प्रसंगी रक्ताच्या नात्यालाही संपवायला निघतो. नागपुरातही गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देव्यभिचार, नशाखोरीचे दुष्परिणाम गुन्ह्यांमध्ये होत आहे वाढ

नरेश डोंगरे

नागपूर : वाईट संगत किंवा नशा माणसाला हैवान बनवते. आपण काय करतो, याचे भान त्याला उरत नाही. तो प्रसंगी रक्ताच्या नात्यालाही संपवायला निघतो. अलीकडे अशा घटनांमध्ये सर्वत्र सारखी वाढ होत असून नागपुरातही गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. (Due to drug addiction and bad company, ‘they’ also ended the blood relationship)

एमआयडीसी पोलीस स्टेशन

सोळाव्या वर्षीच तिला मित्रांचा नाद लागला. अमली पदार्थांचे व्यसनही जडले. त्यातून तिने घर सोडले आणि मित्रांसोबत राहू लागली. व्यसनपूर्तीसाठी पैसे मिळेनासे झाल्यामुळे तिने आपल्या आजीचे घर गाठले. मित्राच्या मदतीने आजीची हत्या केली. तिचे सोने तसेच रोख रक्कम घेऊन ती पळून गेली. मात्र, पोलिसांनी तिच्या अखेर मुसक्या आवळल्या.

 वाडी पोलीस स्टेशन

वर्षभरापूर्वी तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले. अल्पवयातच तिने सर्व मर्यादा ओलांडल्या. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर ती प्रियकराला घरात बोलवून त्याच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करू लागली. एक दिवस अचानक बारा वर्षांचा भाऊ घरी धडकला. त्याने बहीण आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत बघितले. तो आता आई-वडिलांना सांगणार म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने छोट्या भावाची हत्या केली.

कपिल नगर पोलीस स्टेशन

दहावीत असलेला तो मित्राच्या वाईट संगतीमुळे मोठ्या माणसासारखा वागू लागला. आई, बहिणीला धमकावू लागला. घरात बहिणीचा मित्र येतो, ही बाब त्याला नेहमी खटकत होती. म्हणून त्याने बहिणीच्या मित्राशी वाद घातला आणि त्याची हत्या केली.

 हुडकेश्वर पोलीस स्टेशन

घरची आर्थिक स्थिती अतिशय चांगली. एकटा मुलगा म्हणून त्याचे लहानपणापासून कोडकौतुक होऊ लागले. त्याला जे पाहिजे ते करण्याची वडिलांनी मुभा दिली. तो जिममध्ये गेला आणि त्याने चांगले पीळदार शरीर कमाविले. नंतर मात्र त्याला व्यसन जडले. तो चक्क इंजेक्शन टोचून घेऊ लागला. व्यसन केल्यानंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडू लागले. एक दिवस त्याने स्वतःच्या वडिलांचीच निर्घृण हत्या केली.

 

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

व्यसनामुळे माणसाचे स्वतःवरचे संतुलन संपते.

अमली पदार्थांचे व्यसन जडल्यामुळे माणसाचा मेंदू चांगले काय, वाईट काय याबाबत फारसा विचार करत नाही. नशापूर्ती हेच एकमेव उद्दिष्ट त्याच्यासमोर असते आणि नशा चढली की त्याचे स्वतःवरचे नियंत्रण संपते. या अवस्थेत तो कोणाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही.

वाईट संगतीचा परिणाम वाईटच

आपण ज्यांच्यासोबत राहतो ते गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यापासून दूरच राहिले पाहिजे. अन्यथा आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते, याचे भान संबंधित व्यक्तीला उरत नाही. वाईट मित्रांच्या संगतीमुळे तो त्यांचे अनुकरण करतो आणि एखादा मोठा गुन्हा करून बसतो.

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी