शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

नागपूर जि.प.च्या आमसभेवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:55 IST

संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, कापूस आणि सोयाबीन पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना शासनाने केवळ तीनच तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. दुष्काळाची गंभीरता लक्षात घेता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीवरून जिल्हा परिषदेची बुधवारी होणाऱ्या आमसभेवर दुष्काळाचे सावट घोंगावणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी : केसिंग पाईपचा मुद्दाही गाजणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, कापूस आणि सोयाबीन पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना शासनाने केवळ तीनच तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. दुष्काळाची गंभीरता लक्षात घेता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीवरून जिल्हा परिषदेची बुधवारी होणाऱ्या आमसभेवर दुष्काळाचे सावट घोंगावणार आहे.राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील पावणे दोनशेहून अधिक तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे घोषित केले आहे. यात नागपुरातील काटोल, कळमेश्वर आणि नरखेड या तीन तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळाची गंभीरता नेमकी कशी मोजली आणि दुष्काळ मंडळे कोणत्या निकषांवर स्थापित केली अशा सगळ्या मुद्यांवर विरोधक प्रश्नांची सरबत्ती करणार आहे. याबाबत विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे म्हणाले हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार यंदा विदर्भात ९२ टक्के पाऊस झाला आहे. परंतु प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही. जिल्ह्यात सर्वदूर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचा पूर्णपणे सत्यानाश होण्याची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी बोंडअळीचा फटका असूनसुद्धा सर्वसाधारण शेतकऱ्याने किमान १० क्विंटल कापूस पिकविला होता. यंदा हा आकडा दोन क्विंटलवर येऊन ठेपला आहे. सरकारने तीन तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे. कळमेश्वर आणि काटोल येथे तीव्र आणि नरखेडमध्ये मध्यमस्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारने केवळ तीनच तालुक्यात दुष्काळ का घोषित केला. सरकारने शेतकºयाला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आम्ही या आमसभेदरम्यान करणार आहोत.सोबतच बोअरवेलसाठी लागणाऱ्या केसिंग पाईपसाठी राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त होते. या पाईप्सच्या खरेदीसाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते असे आता निदर्शनास आले आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून जि.प.ने विनापरवाना ही खरेदी केली आहे. ही खरेदी अवैध होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.१८ कोटीच्या वसुलीसंदर्भात ठरावजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एनडीसीसी) जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींचे १८ कोटी रुपये अडकले आहेत. काही सदस्यांनी हा मुद्दा उचलला आहे. यात जिल्हा परिषदेच्या सेसफंडाचे ११.७८ कोटी, तर ग्रामपंचायतींचे सहा कोटी रुपये असल्याची माहिती आहे. यासंदर्भात अर्थ समिती सभापती उकेश चव्हाण यांनी पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते. जि.प.च्या सेसफंडातील ११.७८ कोटी रुपये जि.प. ला परत करावेत यासाठी आमसभेत ठराव घेतला जाणार असल्याची सांगितले जात आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरdroughtदुष्काळ