शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावर ड्रोन हल्ल्याचा धोका : गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:10 IST

सद्यस्थितीत राज्यात अडीच लाख अनोंदणीकृत ड्रोन आहेत. याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याबाबत सरकार विचार करीत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ठळक मुद्देराज्यात अडीच लाख अनोंदणीकृत ड्रोन, सरकार सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजवर देशात हल्ला करताना दहशतवाद्यांनी नवनवीन प्रकार अवलंबिले, तर गत काही महिन्यांमध्ये जगभरात ड्रोन हल्ले वाढले आहेत. त्यामुळे भविष्यात दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ल्याचा धोका आहे. तेव्हा अशा हल्ल्याचा सामना करण्यासाठी नव्याने क्षमतेची निर्मिती करावी लागणार आहे. सद्यस्थितीत राज्यात अडीच लाख अनोंदणीकृत ड्रोन आहेत. याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याबाबत सरकार विचार करीत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.शनिवारी प्रेस क्लब येथे आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. गृहमंत्री देशमुख म्हणाले की, सन १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटात प्रथमच आरडीएक्सचा वापर दहशतवाद्यांनी केला. यानंतर २००० मध्ये संसदेवरील हल्ला व सन २००८ मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यात नवनवीन प्रकार दहशतवाद्यांनी उपयोगात आणले. आता जगभरात सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्याचा वापर दहशतवादी करू लागले आहेत. त्यादृष्टीने शासन उपाययोजना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आ. प्रकाश गजभिये, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, राहुल पांडे, ब्रह्माशंकर त्रिपाठी, शिरीष बोरकर उपस्थित होते.राज्यात ८ हजार पोलिसांची भर्ती करणारगेल्या पाच वर्षात पोलीस भर्ती बंद होती. परंतु पोलिसांची भर्ती पुन्हा सुरू होणार. राज्यात ८ हजार पोलिसींची भर्ती केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच मागील पाच वर्षात नागपुरात गुन्हेगारी प्रचंड वाढली. क्राईम कॅपीटल म्हणून नागपूर शहर ओळखले जाऊ लागले. नागपूरला पुन्हा गुन्हेमुक्त शहर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरेगाव भीमा दंगलीत जवळचे लोक अडकण्याची केंद्राला भीतीकेंद्र शासनाने राज्य शासनाला विश्वासात न घेता परस्पर कोरेगाव भीमा येथील दंगलीचा तपास एनआयएकडे सोपविला. केंद्राची ही कृती घटनाबाह्य आहे. याबाबत विधी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असून त्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. एसआयटी गठित करण्याबाबत विविध संघटनांची मागणी होती. त्यावर विचार सुरू असतानाच केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे, त्या सरकारला महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या व्यक्ती अडकू शकतात ही भीती असल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले, असा चिमटाही त्यांनी काढला.स्कॉलरशीप घोटाळ्याबाबतची माहिती घेऊसमाजकल्याण विभागातील स्कॉलरशीप घोटाळ्याबाबत गठित एसआयटीच्या निर्देशामुळे सामान्य विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळणे कठीण झाले आहे. यासंदर्भात गृहमंत्री देशमुख यांना विचारणा केली असता यासंदर्भात माहिती घेतली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखTerror Attackदहशतवादी हल्ला