शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

विषारी विळखा : गटाराचे पाणी थेट नदी, नाल्यात; भूगर्भातील पाणीही विषारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 12:35 IST

हे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे भूगर्भातील जलसाठाही दूषित होत आहे.

ठळक मुद्देनाग, पिवळी व पोहरा नदीसह २२७ नाले दूषित १२७ ठिकाणी सिवरेज सोडले नदीत

गणेश हूड

नागपूर : उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातून निघणारे गटाराचे पाणी थेट नदी व नाल्यात सोडले जात आहे. नागनदी, पिवळी व पोहरा नदीत प्रक्रिया न करता १२७ ठिकाणी सिवरेज लाईन थेट सोडण्यात आल्या आहेत. यामुळे या तीन प्रमुख नद्यांसह २२७ नाले दूषित झाले आहेत. हे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे भूगर्भातील जलसाठाही दूषित होत आहे.

शहरातील सिवरेजची समस्या विचारात घेता २०११ ते २०४१ असा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. मात्र, महापालिकेने त्याची अंमलबजावणीच केलेली नाही. शहरातील सिवरेज लाईन ट्रंक लाईनला जोडलेल्या नाहीत. तसेच शहराच्या सर्व भागात ट्रक लाईनचे जाळे नाही. त्यामुळे सिवरेज लाईन नदी वा नाल्यात सोडण्यात आलेल्या आहेत.

३० टक्के सांडपाण्यावर प्रक्रियाच नाही

- नागपूर शहराची लोकसंख्या जवळपास ३५ लाख आहे. २०२६ मध्ये ती ४० लाखांवर जाईल, तर २०४१ मध्ये ती ६२.६८ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. सध्या नागपूर शहराला ६५८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. यातून ५२५ एमएलडी सांडपाणी निर्माण होते, तर ३८० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर १४५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. २०४१ मध्ये शहराला ११७६ एमएलडी पाणीपुरवठा करावा लागेल. यातूत ७५२.०३ एमएलडी सांडपाणी निर्माण होणार आहे.

२१०० किमी सिवरलाईनची गरज

- टोपोग्राफीनुसार शहरातील सिवरेजची उत्तर, मध्य व दक्षिण अशी तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. तीनही विभागातील सिवरेजचे जाळे ३५०० किलोमीटर आहे. सध्या शहरात १४७५ किलोमीटरचे जाळे आहे, तर २१०० किलोमीटरचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीGovernmentसरकारriverनदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका