शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

विषारी विळखा : गटाराचे पाणी थेट नदी, नाल्यात; भूगर्भातील पाणीही विषारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 12:35 IST

हे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे भूगर्भातील जलसाठाही दूषित होत आहे.

ठळक मुद्देनाग, पिवळी व पोहरा नदीसह २२७ नाले दूषित १२७ ठिकाणी सिवरेज सोडले नदीत

गणेश हूड

नागपूर : उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातून निघणारे गटाराचे पाणी थेट नदी व नाल्यात सोडले जात आहे. नागनदी, पिवळी व पोहरा नदीत प्रक्रिया न करता १२७ ठिकाणी सिवरेज लाईन थेट सोडण्यात आल्या आहेत. यामुळे या तीन प्रमुख नद्यांसह २२७ नाले दूषित झाले आहेत. हे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे भूगर्भातील जलसाठाही दूषित होत आहे.

शहरातील सिवरेजची समस्या विचारात घेता २०११ ते २०४१ असा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. मात्र, महापालिकेने त्याची अंमलबजावणीच केलेली नाही. शहरातील सिवरेज लाईन ट्रंक लाईनला जोडलेल्या नाहीत. तसेच शहराच्या सर्व भागात ट्रक लाईनचे जाळे नाही. त्यामुळे सिवरेज लाईन नदी वा नाल्यात सोडण्यात आलेल्या आहेत.

३० टक्के सांडपाण्यावर प्रक्रियाच नाही

- नागपूर शहराची लोकसंख्या जवळपास ३५ लाख आहे. २०२६ मध्ये ती ४० लाखांवर जाईल, तर २०४१ मध्ये ती ६२.६८ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. सध्या नागपूर शहराला ६५८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. यातून ५२५ एमएलडी सांडपाणी निर्माण होते, तर ३८० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर १४५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. २०४१ मध्ये शहराला ११७६ एमएलडी पाणीपुरवठा करावा लागेल. यातूत ७५२.०३ एमएलडी सांडपाणी निर्माण होणार आहे.

२१०० किमी सिवरलाईनची गरज

- टोपोग्राफीनुसार शहरातील सिवरेजची उत्तर, मध्य व दक्षिण अशी तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. तीनही विभागातील सिवरेजचे जाळे ३५०० किलोमीटर आहे. सध्या शहरात १४७५ किलोमीटरचे जाळे आहे, तर २१०० किलोमीटरचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीGovernmentसरकारriverनदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका