शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

डॉ. विकास आमटे म्हणतात, आनंदवनने दिली आयुष्याची श्रीमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 11:38 IST

अशा सर्व क्षेत्रातील नामवंतांच्या मनात बाबा आमटे व आनंदवनच्या सेवेविषयी प्रचंड आदर आहे. बाबांनी आमच्यासाठी काही केले नाही, पण हा सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती आहे, अशी भावना डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे मुलाखतीत मिश्किल संवादातून उलगडला सेवेचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आनंदवनात आतापर्यंत ११ लाखाहून अधिक कुष्ठरोग्यांवर उपचार आणि सेवा करण्यात आली. आजही १६०० रुग्ण बेडवर आहेत आणि चार रुग्ण दररोज दाखल होतात. समाजाने दुर्लक्षित केलेल्या या कुष्ठरुग्णांच्या सेवेपेक्षा त्यांना आत्मनिर्भर आणि सन्मानित जीवन देण्यासाठी बाबांनी कार्य केले.आजही अंध, अपंग, कुष्ठरोगी, परित्यक्त्या असे ३० लाख लोक वेगवेगळ्या प्रकल्पाशी जुळलेले आहेत. म्हणूनच सामाजिक, राजकीय, उद्योग, चित्रपट, साहित्यिक अशा सर्व क्षेत्रातील नामवंतांच्या मनात बाबा आमटे व आनंदवनच्या सेवेविषयी प्रचंड आदर आहे. बाबांनी आमच्यासाठी काही केले नाही, पण हा सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती आहे, अशी भावना डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.चिटणवीस सेंटरच्यावतीने ‘कलावंतांच्या मनातील मान्यवर’ या उपक्रमात रविवारी आनंदवनातील बाबा आमटेंचा सेवेचा वारसा चालविणारे डॉ. विकास आमटे यांची मुलाखत घेण्यात आली. रवींद्र दुरुगकर यांची संकल्पना असलेल्या कार्यक्रमात अंजली दुरुगकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी अतिशय मिश्किल उत्तरातून त्यांनी हा सेवेचा प्रवास उलगडला. त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. कुष्ठरोग्यांसोबत राहत असल्याने बालपणी आम्हाला मित्र नव्हते. शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून आनंदवनच्याच शाळेत आमचे प्राथमिक शिक्षण झाले. नागपूरला शिकताना दोन नावाजलेल्या सामाजिक संस्थांमध्ये फार काळ आमचा टिकाव लागला नाही. एका व्यक्तीच्या घरी भाड्याने राहत असताना आमच्याबद्दल कळल्यानंतर आम्हा दोन्ही भावडांना बाहेर काढत अख्खं घर धुवून काढल्याचा प्रसंग त्यांनी नमूद केला. बाबा आमच्या घरातील शेवटचे ब्राह्मण असल्याचे सांगत. त्याकाळच्या महार समाजाप्रमाणे आम्हाला अस्पृश्याप्रमाणे जगणे वाट्याला आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.बाबांसोबत आमची आजी, आई या आयांनी आनंदवन चालविल्याचे ते म्हणाले. आम्ही लहानपणापासून बाबांचे हे सेवाकार्य पाहत आलो. याच कार्यात मन रमले. पुढे डॉक्टर झाल्यानंतर दोन्ही भावंडांनी याच कार्यात वाहून घेतल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भारती व त्यांच्या लग्नाचा किस्सा त्यांनी मिश्किलपणे यावेळी सांगितला. आमटे कुटुंबाची तिसरी पिढीही याच सेवेत सहभागी झाली आहे. यवतमाळ, हेमलकसा, सोमनाथ अशा ठिकाणी २८ प्रकल्प सुरू असून, कधी काळी समाजाचा दुर्लक्षित भाग मानले जाणारे कुष्ठरुग्ण आज आत्मनिर्भर होऊन इतर वंचितांसाठी कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.ही पिढी रोडमॅप ठेवून कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अनेक बऱ्यावाईट प्रसंगांचा त्यांनी उल्लेख केला. आनंदवनला बाबा तुरुंग म्हणायचे, मी या तुरुंगाचा जेलर आहे. त्यामुळे सत्कारापेक्षा सत्कार्य महत्त्वाचे आहे. एका दैनिकाचे पत्रकार बाबांना भेटायला आनंदवनात आले आणि येथील कार्य पाहून ‘तुम्हारे हाथो मे सेवा खुशबू है’, असे बाबांना म्हणाले. या प्रेरणेने हेच पत्रकार पुढे ओशो झाल्याचा उल्लेख करीत सुगंध असेल तर तो दरवळेल व लोकांना कळेलच, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे अमित गोन्नाडे यांनी डॉ. आमटे यांचे तैलचित्र रंगविले तर प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मोरे यांनी त्यांचे व्यंगचित्र रेखाटले. याप्रसंगी कवी मधुप पांडेय व डब्लूसीएलचे एस.पी. सिंह यांनी डॉ. आमटेंवर कविता सादर केली तर लेखिका डॉ. भारती सुदामे व नाट्यकर्मी संजय भाकरे यांनी त्यांच्याविषयीच्या भावना मांडल्या. मुलाखतीदरम्यान सचिन ढोमणे, सुरभी ढोमणे व इतर संगीत कलावंतांनी गजलांचे सादरीकरण केले.

टॅग्स :Socialसामाजिक