शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबत शंका, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 15:56 IST

नागपूरमध्ये भाजपा आमदारांशी संवाद साधल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार टीका केली

नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यांतील हाडवैर सर्वश्रुत आहे आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी विधिमंडळाचे कामकाज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारवर चौफेर टीका केली आहे. मुख्यमंत्री जुना की नवा यात जाणार नाही पण मुख्यमंत्री कर्तबगार पाहिजे. राज्यासमोर असलेल्या प्रश्नांची माहिती आणि ते सोडवण्याची धमक असणारा मुख्यमंत्री राज्याला हवा. सध्याच्या परिस्थितीत मला राज्याची चिंता वाटते. राज्याचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. माात्र सध्याचे मुख्यमंत्री तसे प्रयत्न करतील याबाबत मला शंका वाटते, असे नारायण राणे म्हणाले. नागपूरमध्ये भाजपा आमदारांशी संवाद साधल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री जुना की नवा यात जाणार नाही पण मुख्यमंत्री कर्तबगार पाहिजे. राज्यासमोर असलेल्या प्रश्नांची माहिती आणि ते सोडवण्याची धमन असणारा मुख्यमंत्री राज्याला हवा. महाराष्ट्र अधोगतीकडे गेल्यास सत्ताधारी जबाबदार असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचा अवमान केल्याचाही आरोप नारायण राणेंनी केला. ''राज्यपाल विधिमंडळ परिसरात येतात तेव्हा मुख्यमंत्री स्वागताला जातात, पण ह्या प्रथा परंपरा मुख्यमंत्री डावलत आहेत. मी राज्यपालांचे अभिभाषण आणि त्यावर आभार मानणारे मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचले. राज्यपालांच्या भाषणावर बोलताना अशा प्रकारचे भाषण यापूर्वी एकाही मुख्यमंत्र्याने केले नव्हते. ज्या शैलीतून राज्यपालांना मानसन्मान मिळेल असे भाषण केले पाहिजे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणामधून अत्यंत हलक्या थराची भाषा वापरली गेली, असा आरोप नारायण राणेंनी केला.   राज्यासाठी जनतेचे हित समोर ठेवणारे असे भाषण राज्यपालांनी केले. मात्र त्याला साजेसं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही, असेही ते म्हणाले. शिवसेनेने केवळ सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. पण शिवसेनेचा जन्म हिंदुत्वासाठी झाला होता. आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते ना आघाडी झाली असती,  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फक्त स्वतःच्या साठी मुख्यमंत्री झाले, विचारांना मूठमाती दिली, आसा आरोपही नारायण राणेंनी केला.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा