शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 9:34 PM

सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई असूनही नागरिकांनी त्रास सहन केला. दोन दिवसाच्या पावसात मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाला. लोकांच्या घरात पाणी शिरले. नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. आयुक्त फोन उचलत नाही. प्रभागातील अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. सभागृहाच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता येतात. मागील चार महिन्यात सभागृहच झाले नाही. व्हावे अशी प्रशासनाची इच्छा नसल्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल मनपातील गटनेत्यांनी उपस्थित केला आहे.कोरोनाचे कारण पुढे करून २० जूनला होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याची माहिती सोमवारी निगम सचिवांनी महापौर कार्यालयाला पाठविलेल्या पत्रातून दिली. यामुळे मनपातील सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मागील चार महिन्यात सभागृह झाले नाही. प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. नागरिकांच्या समस्या सोडविता येत नाही. राज्यातील काही महापालिकांच्या सभा झाल्या. मग नागपूर मनपाची सभा का नाही. प्रशासनाला असाच कारभार करावयाचा असेल तर मनपा बरखास्त करून नगरसेवकांना घरी बसवावे, अशा शब्दात नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.प्रशासनाची भूमिका लोकशाहीला घातकमनपाची सर्वसाधारण सभा फेब्रुवारी महिन्यात झाली. गेल्या चार महिन्यात सर्वसाधारण सभा झालेली नाही. प्रभागातील विकास कामे, पावसाळ्यातील उपाययोजना, पुढील वर्षाचा अर्थसंकल्प, अर्धवट कामे मार्गी लागावीत, नगरसेवकांना प्रभागातील समस्या मांडता याव्यात, यासाठी २० जूनला सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. कोरोना संसर्गाचा विचार करता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवण्यासाठी सुरेश भट सभागृहात ही सभा घेतली जाणार आहे. असे असूनही मनपा प्रशासनाची सभा रद्द करण्याची भूमिका लोकशाहीला घातक आहे.संदीप जाधव, सत्तापक्ष नेता, मनपा...तर मनपाच बरखास्त करा!शासन दिशानिर्देशांचे पालन करून मनपाची सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. असे असतानाही मनपा प्रशासनाकडून सभा रद्द होत असेल, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना कोणतीही कामे करता येत नसतील तर मनपाच बरखास्त करा, मनपा आयुक्तांची भूमिका लोकशाहीला घातक आहे.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, मनपानागरिकांच्या समस्या कशा सोडवणार?प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या तक्रारी नगरसेवक प्रशासनाकडे मनपा प्रशासनाकडे मांडतात. परंतु मागील चार महिन्यापासून नगरसेवकांचे फोन उचलले जात नाही. अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. दुसरीकडे नागरिकांच्या रोषाला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यात सभागृह रद्द होत असेल तर नगरसेवक तक्रारी कुणाकडे करणार?दुनेश्वर पेठे, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका