शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

Nagpur : 'आदेश दिल्यानंतर आम्हाला दोष देऊ नका'; उच्च न्यायालय संतापले, केंद्र सरकारला झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:31 IST

चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्र : हायकोर्टाने वन्यजीव सुरक्षेवरून केंद्र सरकारला फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बल्लारशाह- चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्रातील प्राण्यांच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्यास उदासीनता दाखविल्यामुळे केंद्र सरकारला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचा दणका बसला. न्यायालयाने सरकारची कानउघाडणी करताना रेल्वेचा वेग कमी करण्याचा आदेश दिल्यास आम्हाला दोष देऊ नका, असे बजावले.

यासंदर्भात उदयन पाटील व स्वानंद सोनी या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकारला दोन महिन्यापूर्वी नोटीस बजावली. परंतु, त्यांनी अद्याप उत्तर सादर केले नाही. त्यामुळे न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने १० डिसेंबर २०१३ रोजी शक्तिप्रसाद नायक यांच्या प्रकरणामध्ये रेल्वेमुळे वन्यजीवांचा अपघात होऊ नये याकरिता, वनक्षेत्रातून धावणाऱ्या रेल्वेंचा वेग कमी करण्यात यावा, वन्यजीवांना रेल्वेलाइनपासून दूर ठेवण्यासाठी जोरात भोंगा वाजविण्यात यावा यासह विविध निर्देश दिले होते. परंतु, केंद्र सरकार या निर्देशांचे पालन करीत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक वन्यजीवांना रेल्वे अपघातात प्राण गमवावे लागत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

दोन आठवड्यात मागितल्या सूचना

रेल्वेमुळे वन्यजीवांचा अपघात होऊ नये याकरिता कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यासंदर्भातील सूचनांसह याचिकेतील इतर मुद्यांवर येत्या दोन आठवड्यात उत्तर सादर करा, असे निर्देश न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले. तसेच, वन्यजीवांच्या सुरक्षेविषयी सरकारने संवेदनशील असायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व अजित कडेठाणकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ अॅड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली.

१३० वन्यजीवांनी गमावले प्राण

बल्लारशाह-चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातामुळे २००१ ते २०२१ या २० वर्षात १३० वन्यजीव ठार झाले. त्यामध्ये वाघ, गरुड, अजगर, बिबट, तरस यासह शेड्युल-१ श्रेणीतील इतर अनेक प्राण्यांचा समावेश आहे.

ही रेल्वे लाईन २५० किलोमीटर लांब आहे. त्यापैकी ६० किलोमीटर लाईन संवेदनशील वनक्षेत्रातून जाते. या लाईनवर रोज २४ प्रवासी रेल्वे व अनेक मालवाहू रेल्वे धावतात, अशी माहिती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला दिली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वेHigh Courtउच्च न्यायालय