शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

भगवत् गीता वाटप : विकासाचा अजेंडा अपयशी, म्हणून भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:13 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तरी गीता वाचली आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांसोबत बोलताना उपस्थित केला.

नागपूर -  शाळा-महाविद्यालयांमध्ये लागू केलेले अभ्यासक्रमच जिथे पूर्णपणे शिकवले जात नाहीत तेथे भगवत् गीतेसारख्या पवित्र ग्रंथाचे अध्ययन करण्याचा अट्टहास साधून काय होणार आहे? अशी विचारणा करून, खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तरी गीता वाचली आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांसोबत बोलताना उपस्थित केला.

महाविद्यालयांमध्ये भगवत् गीतेचे अध्ययन करण्याबाबतच्या सरकारच्या धोरणावर त्यांनी यावेळी हल्ला चढवला. गीतासारख्या पवित्र ग्रंथाचे वाटप करून साय साध्य होणार आहे, हा हिंदुत्ववादाचा एक छुपा अजेंडा सरकार राबवीत आहे. राज्यात अनेक महाविद्यालयांमध्ये नेहमीचाच अभ्यासक्रम पूर्ण केला जात नाही. तेथे गीता वाचण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर कशासाठी केली जात आहे?. विकासाचा अजेंडा २०१९ च्या निवडणुकीत चालणार नाही हे भाजपाच्या लक्षात आल्याने त्यांनी आता हिंदुत्वाचा मोहरा चालवणे सुरू केले आहे. विनोद तावडे यांनी स्वत: कधीतरी गीतेचे वाचन केले आहे काय असा प्रश्न विचारून जयंत पाटील यांनी, जर त्यांनी स्वत: वाचली नसेल तर इतरांना ती वाचायला देण्याचे काही कारण नाही असे म्हटले.

कल्याण-डोंबिवली भागातील खड्डे आणि रस्त्यांच्या दूरवस्थेबद्दल बोलताना त्यांनी, ज्या चार व्यक्तींचे मृत्यू झाले त्याची जबाबदारी सरकारवर असल्याचे मत व्यक्त केले. या भागातील नागरिकांना आपण भाजपाला मत दिले याचा आता खेद होत असावा असेही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेJayant Patilजयंत पाटीलSchoolशाळा