शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:19 IST

९ ते १५ ऑगस्ट या सात दिवसांत ५०७२ रुग्णांची नोंद व १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपचारात उशीर झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

ठळक मुद्देसात दिवसात कोरोनाचे पाच हजार रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाचा व मृत्यूचा वेग कमालीचा वाढत चालला आहे. ९ ते १५ ऑगस्ट या सात दिवसांत ५०७२ रुग्णांची नोंद व १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपचारात उशीर झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. त्यांच्यानुसार, बहुतांश रुग्ण प्रकृती जास्त बिघडल्यावर रुग्णालयात येतात. तोपर्यंत रुग्णांना श्वास घेण्यास त्रास सुरू होतो आणि तेथूनच ऑर्गन फेल्युअरची साखळी सुरू होते. हीच साखळी पुढे मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे.

कोरोनाविषयी अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी बहुतांश लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. सर्दी, खोकला आणि ताप असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, जेव्हा श्वास घेण्यास त्रास सुरू होतो, तेव्हा रुग्ण डॉक्टरकडे जातो. तोपर्यंत कोरोनाचा हल्ला फुफ्फुसांवर झालेला असतो. रुग्णाचा अहवाल येईपर्यंत त्याच्या फुफ्फुसाचे लोब खराब झालेले असतात. फुफ्फुस निकामी झाल्यानंतर यकृत, मूत्रपिंड यासारखे महत्त्वाचे अवयव निकामी होण्यास सुरुवात होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला जाणवताच रुग्णांनी थेट वैद्यकीय सल्ला घेऊन कोरोनाची तपासणी करावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

८० ते ८५ टक्के रुग्ण घेतात उशिरा उपचाररुग्णालयात दाखल होणारे ८० ते ८५ टक्के रुग्ण हे माईल्ड ताप, सर्दी, खोकला येऊन गेल्यावर जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा रुग्णालयात दाखल होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, तोपर्यंत कोरोनाची लागण होऊन जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटलेला असतो. आजार गंभीर झालेला असतो.

- तर वाचू शकतात प्राणरोगप्रतिकारक शक्ती उत्तम असली, तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो. पण, कोरोनामुळे अवयव निकामी होण्यास सुरुवात होण्यापूर्वीच उपचारास सुरुवात केल्यास प्राण वाचू शकतात. यामुळे रुग्णाला लक्षणे दिसताच वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्याकोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा दरम्यान सौम्य ताप जरी असल्यास किंवा सर्दी, खोकल्याची लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जितक्या लवकर कोविडचे निदान होऊन उपचाराला सुरुवात होईल, तितक्या लवकर जीवाचा धोका कमी होऊ शकतो. विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा व हृदयविकाराचे आजार असलेल्या रुग्णांनी, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.-डॉ. पी.पी. जोशी, प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, एम्स

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस