शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:19 IST

९ ते १५ ऑगस्ट या सात दिवसांत ५०७२ रुग्णांची नोंद व १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपचारात उशीर झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

ठळक मुद्देसात दिवसात कोरोनाचे पाच हजार रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाचा व मृत्यूचा वेग कमालीचा वाढत चालला आहे. ९ ते १५ ऑगस्ट या सात दिवसांत ५०७२ रुग्णांची नोंद व १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपचारात उशीर झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. त्यांच्यानुसार, बहुतांश रुग्ण प्रकृती जास्त बिघडल्यावर रुग्णालयात येतात. तोपर्यंत रुग्णांना श्वास घेण्यास त्रास सुरू होतो आणि तेथूनच ऑर्गन फेल्युअरची साखळी सुरू होते. हीच साखळी पुढे मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे.

कोरोनाविषयी अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी बहुतांश लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. सर्दी, खोकला आणि ताप असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, जेव्हा श्वास घेण्यास त्रास सुरू होतो, तेव्हा रुग्ण डॉक्टरकडे जातो. तोपर्यंत कोरोनाचा हल्ला फुफ्फुसांवर झालेला असतो. रुग्णाचा अहवाल येईपर्यंत त्याच्या फुफ्फुसाचे लोब खराब झालेले असतात. फुफ्फुस निकामी झाल्यानंतर यकृत, मूत्रपिंड यासारखे महत्त्वाचे अवयव निकामी होण्यास सुरुवात होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला जाणवताच रुग्णांनी थेट वैद्यकीय सल्ला घेऊन कोरोनाची तपासणी करावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

८० ते ८५ टक्के रुग्ण घेतात उशिरा उपचाररुग्णालयात दाखल होणारे ८० ते ८५ टक्के रुग्ण हे माईल्ड ताप, सर्दी, खोकला येऊन गेल्यावर जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा रुग्णालयात दाखल होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, तोपर्यंत कोरोनाची लागण होऊन जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटलेला असतो. आजार गंभीर झालेला असतो.

- तर वाचू शकतात प्राणरोगप्रतिकारक शक्ती उत्तम असली, तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो. पण, कोरोनामुळे अवयव निकामी होण्यास सुरुवात होण्यापूर्वीच उपचारास सुरुवात केल्यास प्राण वाचू शकतात. यामुळे रुग्णाला लक्षणे दिसताच वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्याकोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा दरम्यान सौम्य ताप जरी असल्यास किंवा सर्दी, खोकल्याची लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जितक्या लवकर कोविडचे निदान होऊन उपचाराला सुरुवात होईल, तितक्या लवकर जीवाचा धोका कमी होऊ शकतो. विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा व हृदयविकाराचे आजार असलेल्या रुग्णांनी, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.-डॉ. पी.पी. जोशी, प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, एम्स

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस