शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

मराठी- हिंदी भाषकात भांडणे लावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:52 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळा विदर्भ देण्याची येथील हिंदी भाषकाची मागणी असल्याचे वक्तव्य केले. मुळात शरद पवारांनी मराठी व अमराठी असा वाद निर्माण करून भांडणे लावू नये व विदर्भाची विभागणी करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आ. वामनराव चटप यांच्यासह विदर्भवादी नेत्यांनी दिला.

ठळक मुद्देविदर्भवाद्यांचा शरद पवारांना इशारा : पवारांची भूमिका अतार्किक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळा विदर्भ देण्याची येथील हिंदी भाषकाची मागणी असल्याचे वक्तव्य केले. मुळात शरद पवारांनी मराठी व अमराठी असा वाद निर्माण करून भांडणे लावू नये व विदर्भाची विभागणी करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आ. वामनराव चटप यांच्यासह विदर्भवादी नेत्यांनी दिला. त्यांची ही भूमिका अतार्किक असून विदर्भाची मागणी पवारांच्या जन्मापूर्वीची आहे, अशी टीकाही चटप यांनी केली.चटप म्हणाले, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन राज्य निर्माण केली तेव्हा पवार बोलले नाही. आंध्रप्रदेशच्या विधानसभेने तेलंगणाच्या निर्मितीचा प्रस्ताव फेटाळला व त्यानंतरही तेलंगणाची निर्मिती झाली, तेव्हाही बोलण्याचे धाडस केले नाही. फक्त विदर्भाचा मुद्दा आला की सार्वमत घेण्याची भाषा करतात. अशी सोईस्कर भूमिका घेणे पवारांनी थांबवावे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भातील चार जिल्ह्यात विदर्भाच्या मुद्यावर मतदान घेतले. त्यावेळी ९२ टक्के लोकांनी विदर्भाला पाठिंबा दिला. मतदान करणाºयांमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते आघाडीवर होते. निदान स्वत:च्या पक्षातील लोकांच्या भावनांचा तरी पवारांनी आदर करावा, असा चिमटाही त्यांनी घेतला.डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, विदर्भातील लोक भाषा, धर्माचा भेद मानत नाहीत. पवारांनी असे वक्तव्य करून भेदभाव पसरविण्याचे काम केले आहे. विदर्भ देणारच नाही, अशी भूमिका असंवैधानिक असल्याचे त्यांनी सांगितले. राम नेवले यांनीही पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली. या वेळी विजया धोटे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अरुण मुनघाटे, मुकेश मासुरकर, अरुण केदार, श्याम वाघ, भय्यालाल माकडे, दीपक गोतमारे, अभ्युदय गोसे आदी उपस्थित होते.अ‍ॅड. गोविंद भेंडारकर व मासुरकर यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा चंद्रपूर येथील राष्ट्रवादीचे नेते व प्रदेश प्रतिनिधी अ‍ॅड. गोविंद भेंडारकर तसेच गडचिरोली येथील राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुनघाटे यांनी या वेळी शरद पवार यांच्या विदर्भ विरोधी भूमिकेमुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. अ‍ॅड. भेंडारकर हे १३ वर्षांपासून राष्ट्रवादीत सक्रिय आहेत. ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले असून २०१४ मध्ये त्यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढविली होती. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीचे ते सदस्य आहेत. या वेळी अ‍ॅड. भेंडारकर म्हणाले, जनतेला विदर्भ हवा आहे. मात्र, शरद पवार यांनी भाषेवरून विदर्भात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पवार विदर्भात येतात तेव्हा सोयीस्कर बोलतात. तिकडे गेले की बदलतात. विदर्भातील आत्महत्या, नक्षलवाद, बेरोजगारी या विषयांवर ते का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. मुनघाटे यांनीही पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारagitationआंदोलन